शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Sangli: आरफळचे पाणी दहा दिवसांत पलूस तालुक्यात सोडणार

By अशोक डोंबाळे | Updated: February 13, 2024 14:41 IST

‘जलसंपदा’च्या अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

सांगली : आरफळ, टेंभू उपसा सिंचन योजनेतून दहा दिवसांत पलूस तालुक्यातील गावांना पाणी देण्याबाबत नियोजन करण्यात येईल. अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी ठेकेदारांना सूचना दिल्या आहेत, अशी माहिती सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी शेतकऱ्यांना दिली आहे.बांबवडे, मोराळे, आंधळी, सांडगेवाडी परिसराला पाणी मिळत नसल्यामुळे तेथील पिके वाळू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर पलूस तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने सांगलीतील वारणाली येथील अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी खासदार संजय पाटील, सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे आदींसह शेतकरी उपस्थित होते.या बैठकीमध्ये शेतकऱ्यांनी उन्हाळ्याच्या तीव्र झळांमुळे जमिनीतील पाणीपातळी खालावली आहे. विहिरी, कूपनलिकांनी तळ गाठल्यामुळे रब्बीची गहू, हरभरा, ज्वारी, मका, द्राक्षबागा वाळू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बांबवडे, मोराळे, आंधळी, सांडगेवाडीतील शेतकऱ्यांना आरफळ, टेंभू उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडण्याची मागणी केली. यावेळी अधीक्षक अभियंता पाटाेळे यांनी येत्या दहा दिवसांत आरफळ योजनेचे पाणी पलूस वितरिकामध्ये पाणी सोडण्यात येईल. तसेच टेंभू योजनेचे अपूर्ण कामही तातडीने पूर्ण करून पाणी देण्यात येईल, असे आश्वासन शेतकऱ्यांना त्यांनी दिले.यावेळी बांबवडेचे विक्रम संकपाळ, दादासाहेब पवार, पांडुरंग संकपाळ, आंधळीचे मानसिंग जाधव, मोराळेचे बाळासाहेब पाटील, जनार्दन पाटील, सांडगेवाडीचे सुनील सूर्यवंशी, अरुण शिंदे, लालासाहेब पवार आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टेंभू योजनेतून पाणी द्यातारळी धरणातून आरफळ योजनेस जोडणारी ७० मीटर अपूर्ण पाइपलाइनचे काम तत्काळ पूर्ण करण्याची गरज आहे. तांत्रिक अडचणी असल्यास तारळी धरणातील पाणी कृष्णा नदीमध्ये सोडून टेंभू योजनेच्या उपसा सिंचन पंपाद्वारे आरफळ योजनेच्या पलूस वितरिकेमध्ये सोडण्याची गरज आहे. ‘जलसंपदा’च्या या निर्णयामुळे पलूस तालुक्यातील आठ गावांच्या शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे, असेही शेतकऱ्यांनी ‘जलसंपदा’च्या अधिकाऱ्यांकडे मागणी केली.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीFarmerशेतकरी