शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

Sangli: आरफळचे पाणी दहा दिवसांत पलूस तालुक्यात सोडणार

By अशोक डोंबाळे | Updated: February 13, 2024 14:41 IST

‘जलसंपदा’च्या अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

सांगली : आरफळ, टेंभू उपसा सिंचन योजनेतून दहा दिवसांत पलूस तालुक्यातील गावांना पाणी देण्याबाबत नियोजन करण्यात येईल. अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी ठेकेदारांना सूचना दिल्या आहेत, अशी माहिती सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी शेतकऱ्यांना दिली आहे.बांबवडे, मोराळे, आंधळी, सांडगेवाडी परिसराला पाणी मिळत नसल्यामुळे तेथील पिके वाळू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर पलूस तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने सांगलीतील वारणाली येथील अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी खासदार संजय पाटील, सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे आदींसह शेतकरी उपस्थित होते.या बैठकीमध्ये शेतकऱ्यांनी उन्हाळ्याच्या तीव्र झळांमुळे जमिनीतील पाणीपातळी खालावली आहे. विहिरी, कूपनलिकांनी तळ गाठल्यामुळे रब्बीची गहू, हरभरा, ज्वारी, मका, द्राक्षबागा वाळू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बांबवडे, मोराळे, आंधळी, सांडगेवाडीतील शेतकऱ्यांना आरफळ, टेंभू उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडण्याची मागणी केली. यावेळी अधीक्षक अभियंता पाटाेळे यांनी येत्या दहा दिवसांत आरफळ योजनेचे पाणी पलूस वितरिकामध्ये पाणी सोडण्यात येईल. तसेच टेंभू योजनेचे अपूर्ण कामही तातडीने पूर्ण करून पाणी देण्यात येईल, असे आश्वासन शेतकऱ्यांना त्यांनी दिले.यावेळी बांबवडेचे विक्रम संकपाळ, दादासाहेब पवार, पांडुरंग संकपाळ, आंधळीचे मानसिंग जाधव, मोराळेचे बाळासाहेब पाटील, जनार्दन पाटील, सांडगेवाडीचे सुनील सूर्यवंशी, अरुण शिंदे, लालासाहेब पवार आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टेंभू योजनेतून पाणी द्यातारळी धरणातून आरफळ योजनेस जोडणारी ७० मीटर अपूर्ण पाइपलाइनचे काम तत्काळ पूर्ण करण्याची गरज आहे. तांत्रिक अडचणी असल्यास तारळी धरणातील पाणी कृष्णा नदीमध्ये सोडून टेंभू योजनेच्या उपसा सिंचन पंपाद्वारे आरफळ योजनेच्या पलूस वितरिकेमध्ये सोडण्याची गरज आहे. ‘जलसंपदा’च्या या निर्णयामुळे पलूस तालुक्यातील आठ गावांच्या शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे, असेही शेतकऱ्यांनी ‘जलसंपदा’च्या अधिकाऱ्यांकडे मागणी केली.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीFarmerशेतकरी