शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

Sangli: शेकडो एकराखालील क्षेत्र वाकुर्डे कालव्याच्या निकृष्ट कामाने नापीक, भूसंपादनाच्या भरपाईचाही प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2024 17:15 IST

पाणीगळतीचा प्रश्न गंभीर 

विकास शहाशिराळा : वाकुर्डे योजनेतील टप्पा १ व २ अंशतः कार्यान्वित करण्यात आला आहे. हात्तेगाव पाझर तलावातून पाणीउपसा करून वाकुर्डे बुद्रूक येथील करमजाई तलावात सोडण्यात आले आहे. येथून कऱ्हाड तालुक्यातील चौदा गावांमधील २२०० हेक्टर तसेच शिराळा तालुक्यातील ८३० हेक्टर आणि वाकुर्डे मानकरवाडी रेड बंदिस्त पाइपलाइनमधून २६२७ हेक्टर असे ५,६५७ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. यामध्ये वाकुर्डे रेड हा १० किलोमीटर लांबीचा कालवा पूर्ण झाला आहे. मात्र, अद्याप शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळालेला नाही. उलट कालव्याच्या निकृष्ट कामामुळे शेती नापीक झाली आहे.वाकुर्डे ते रेड हा १० किलोमीटर लांबीचा कालवा पूर्ण झाला आहे. मात्र, काम निकृष्ट झाल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होते. तसेच कालव्याच्या खुदाईतून निघालेले दगड, मुरूम ठेकेदाराने न हलविल्यामुळे ते क्षेत्रही नापीक झाले आहे. याबाबत २०१७ पासून या भागातील शेतकरी शासन आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे दाद मागत आहेत. मात्र, त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. पडवळवाडी, नळवा वस्ती, माळ वस्ती, नारजी वस्ती, तरसे वस्ती, रामोशी वस्ती, पारगावकर वस्ती, धाकली अंत्री, जोतिबा मंदिर ते मानकरवाडी परिसरातील कालव्याचे काम निकृष्ट झाल्याचे शेतकरी त्रस्त आहेत.कालव्यातून पाण्याच्या गळतीमुळे उताराला असणाऱ्या ५०० एकर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. येथे कोणतेही पीक घेता येत नाही. धूळवाफेने भाताची पेरणी होत नाही. कालव्यासाठी ज्या जमिनी गेल्या त्याचा मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अनेकदा आंदाेलन केले आहे.याबाबत आमदार मानसिंगराव नाईक, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक तसेच शासकीय अधिकारी, शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी नुकसानभरपाईची प्रक्रिया अंतिम टप्प्यांमध्ये असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीनंतर वाकुर्डे बुद्रूक योजनेबरोबरच इतर योजनांचा भूसंपादनाचा मोबदला मिळणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, अद्याप हा प्रश्न सुटलेला नाही.लवकरात लवकर कार्यवाही होणे गरजेचे कालव्याच्या गळतीमुळे झालेले पिकांचे नुकसान तसेच शेतामध्ये पडलेला मुरूम आणि दगडाच्या भरावामुळे शेतकऱ्यांना पीकच घेता आलेले नाही. या दाेन्ही नुकसानभरपाईबाबत शेतकऱ्यांची यादी तयार आहे. यादीनुसार व पिकानुसार तपशील सादर करून नुकसानभरपाई मिळवून देण्याबाबत पाटबंधारे विभागाने पाठपुरावा करणे गरजेचे आहे. मुरूम आणि दगडाची विल्हेवाट लावण्याबाबत प्रांताधिकारी व तहसीलदारांकडे अहवाल पाठवून लवकरात लवकर कार्यवाही हाेणे गरजेचे आहे.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी