कमी बसफेऱ्यांचा प्रवाशांना मनस्ताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:27 IST2021-09-19T04:27:43+5:302021-09-19T04:27:43+5:30
इस्लामपूर : कोरोना महामारीत एसटी बसेसचे वेळापत्रक ढासळले आहे. सकाळच्या पहिल्या सत्रात सांगलीवरून आष्टा- इस्लामपूर- कराडकडे जाणाऱ्या बसेससाठी प्रवाशांना ...

कमी बसफेऱ्यांचा प्रवाशांना मनस्ताप
इस्लामपूर : कोरोना महामारीत एसटी बसेसचे वेळापत्रक ढासळले आहे. सकाळच्या पहिल्या सत्रात सांगलीवरून आष्टा- इस्लामपूर- कराडकडे जाणाऱ्या बसेससाठी प्रवाशांना तासन्तास तिष्ठत बसावे लागत आहे. सकाळ प्रहरी तुंग येथील बसथांब्यावर एक महिला कारनंदवाडी येथे जाणार होती. या महिलेस बससाठी दीड ते दोन तास थांबावे लागले. त्यामुळे ती संतप्त होऊन चालत गेले असते तर गाव गाठले असतं असे प्रत्येकाला सांगत होती.
जिल्ह्यात कोरोनाचा आकडा दोनशेच्या घरात आला आहे. त्यामुळे सर्व क्षेत्रातील व्यवहार पूर्वपदावर येऊ लागले आहेत. काही विद्यालये व महाविद्यालये सुरू झाली आहेत. शासकीय कर्यालयांत, बँका, खासगी क्षेत्रात कर्मचाऱ्यांची उपस्थिती वाढत आहे. मात्र राज्य परिवहन महामंडळाने स्थानिक बसफेऱ्या सुरू केल्या नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय होत आहे.
आष्टा परिसरातील विद्यार्थी, शिक्षक, कामगार इस्लामपूर, सांगली येथे जातात. सांगलीवरून पुणेकडे जाणाऱ्या सर्व बसेस तुंग येथे थांबत नाहीत. त्यातच स्थानिक गाड्या कमी संख्येने धावतात. त्यामुळे तुंग, बवची आणि इतर थांब्यांवर बसची वाट पाहत तासन्तास थांबावे लागत आहे.
शनिवारी चटई विक्री करणारी महिला बसची वाट पाहत होती. सकाळी सात वाजेपासून ते साडेआठ वाजेपर्यंत कारनंदवाडी येथे जाण्यासाठी तिला बस मिळाली नाही. तिने राज्य परिवहनबद्दल संतापाने उद्गार काढले.