शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ जाहीर करावे : के. चंद्रशेखर राव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 12:55 IST

अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य शोषित, वंचित आणि कष्टकऱ्यांची व्यथा-वेदना मांडणारे

इस्लामपूर/वाटेगाव (सांगली) : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य शोषित, वंचित आणि कष्टकऱ्यांची व्यथा-वेदना मांडणारे होते. त्यामुळेच त्यांना लोकशाहीर ही पदवी मिळाली. रशियन महासत्तेने त्यांना भारताचा ‘मॅक्सिम ग्रॉर्की’ असे संबोधले होते. अण्णाभाऊंसारख्या महान व्यक्तिमत्त्वाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर करावा, असे आवाहन तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केले.वाटेगाव (ता. वाळवा) येथे के. सी. आर. यांच्या भारत राष्ट्र समितीच्यावतीने अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयाेजित करण्यात आला हाेता. यावेळी राव यांनी स्मारकातील अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. अण्णाभाऊंच्या स्नुषा सावित्रीबाई साठे अध्यक्षस्थानी होत्या.मुख्यमंत्री राव म्हणाले, अण्णाभाऊंनी समाजवाद आणि साम्यवादाची सांगड घालत भांडवलशाही व्यवस्थेवर प्रहार केले. त्यांचे साहित्य वैश्विक दर्जाचे होते. रशियन सरकारने त्यांना बोलावून घेत त्यांचा सन्मान केला. मात्र, भारतात त्यांचा सन्मान झाला नाही, याची खंत वाटते. महाराष्ट्र सरकारने अण्णाभाऊंच्या साहित्याचा इतर भारतीय भाषांमध्ये अनुवाद करावा.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करावी. तेलंगणा सरकारसुद्धा असा प्रस्ताव पाठवेल. मी व्यक्तीश: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा करून अण्णाभाऊंना ‘भारतरत्न’ पुरस्कार द्यावा यासाठी पाठपुरावा करेन. देशाचा मूल निवासी असलेल्या राज्यातील मातंग समाजाला बीआरएसकडून योग्य ते प्रतिनिधित्व देऊ.सचिन साठे म्हणाले, राज्यातील मातंग समाजाची अवस्था वाईट आहे. आमच्या समाजाचा वापर करून अनेकांनी आपला राजकीय उद्धार करून घेतला. आता केसीआर यांचे नेतृत्व मिळाल्याने मातंग समाजाच्या प्रगतीची दारे खुली झाली आहेत. मातंग समाजाला विधानसभेत आणि लोकसभेत योग्य ते प्रतिनिधित्व मिळावे. यावेळी राज्यप्रमुख शंकर धोंडगे, कबीर मौलाना, बी. जी. देशमुख, भगीरथ भालके, माजी खासदार हरीभाऊ राठोड यांच्यासह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

९ ऑगस्टला इस्लामपुरात मेळावाराज्यातील शेतकरी चळवळीतील अभ्यासू नेते आणि देशभरातील शेतकरी संघटनांच्या शिखर संस्थेचे (सिफा) राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी मंगळवारी साखराळे (ता. वाळवा) येथील आपल्या निवासस्थानी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला. यावेळी पाटील यांनीही ९ ऑगस्ट रोजी इस्लामपूर येथे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत जाहीर मेळावा घेणार असल्याचे जाहीर केले.

टॅग्स :SangliसांगलीK Chandrashekar Raoके चंद्रशेखर राव