शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
2
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
3
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
4
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
5
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
6
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
7
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये फक्त ४९ दिवसच विवाह मुहूर्त; खरोखरंच करावी लागणार लगीन 'घाई'
8
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
9
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
10
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
11
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
12
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
13
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
14
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
15
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
16
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
17
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
18
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
19
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
20
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास

अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ जाहीर करावे : के. चंद्रशेखर राव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 12:55 IST

अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य शोषित, वंचित आणि कष्टकऱ्यांची व्यथा-वेदना मांडणारे

इस्लामपूर/वाटेगाव (सांगली) : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य शोषित, वंचित आणि कष्टकऱ्यांची व्यथा-वेदना मांडणारे होते. त्यामुळेच त्यांना लोकशाहीर ही पदवी मिळाली. रशियन महासत्तेने त्यांना भारताचा ‘मॅक्सिम ग्रॉर्की’ असे संबोधले होते. अण्णाभाऊंसारख्या महान व्यक्तिमत्त्वाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर करावा, असे आवाहन तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केले.वाटेगाव (ता. वाळवा) येथे के. सी. आर. यांच्या भारत राष्ट्र समितीच्यावतीने अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयाेजित करण्यात आला हाेता. यावेळी राव यांनी स्मारकातील अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. अण्णाभाऊंच्या स्नुषा सावित्रीबाई साठे अध्यक्षस्थानी होत्या.मुख्यमंत्री राव म्हणाले, अण्णाभाऊंनी समाजवाद आणि साम्यवादाची सांगड घालत भांडवलशाही व्यवस्थेवर प्रहार केले. त्यांचे साहित्य वैश्विक दर्जाचे होते. रशियन सरकारने त्यांना बोलावून घेत त्यांचा सन्मान केला. मात्र, भारतात त्यांचा सन्मान झाला नाही, याची खंत वाटते. महाराष्ट्र सरकारने अण्णाभाऊंच्या साहित्याचा इतर भारतीय भाषांमध्ये अनुवाद करावा.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करावी. तेलंगणा सरकारसुद्धा असा प्रस्ताव पाठवेल. मी व्यक्तीश: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा करून अण्णाभाऊंना ‘भारतरत्न’ पुरस्कार द्यावा यासाठी पाठपुरावा करेन. देशाचा मूल निवासी असलेल्या राज्यातील मातंग समाजाला बीआरएसकडून योग्य ते प्रतिनिधित्व देऊ.सचिन साठे म्हणाले, राज्यातील मातंग समाजाची अवस्था वाईट आहे. आमच्या समाजाचा वापर करून अनेकांनी आपला राजकीय उद्धार करून घेतला. आता केसीआर यांचे नेतृत्व मिळाल्याने मातंग समाजाच्या प्रगतीची दारे खुली झाली आहेत. मातंग समाजाला विधानसभेत आणि लोकसभेत योग्य ते प्रतिनिधित्व मिळावे. यावेळी राज्यप्रमुख शंकर धोंडगे, कबीर मौलाना, बी. जी. देशमुख, भगीरथ भालके, माजी खासदार हरीभाऊ राठोड यांच्यासह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

९ ऑगस्टला इस्लामपुरात मेळावाराज्यातील शेतकरी चळवळीतील अभ्यासू नेते आणि देशभरातील शेतकरी संघटनांच्या शिखर संस्थेचे (सिफा) राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी मंगळवारी साखराळे (ता. वाळवा) येथील आपल्या निवासस्थानी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला. यावेळी पाटील यांनीही ९ ऑगस्ट रोजी इस्लामपूर येथे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत जाहीर मेळावा घेणार असल्याचे जाहीर केले.

टॅग्स :SangliसांगलीK Chandrashekar Raoके चंद्रशेखर राव