शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ जाहीर करावे : के. चंद्रशेखर राव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 12:55 IST

अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य शोषित, वंचित आणि कष्टकऱ्यांची व्यथा-वेदना मांडणारे

इस्लामपूर/वाटेगाव (सांगली) : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य शोषित, वंचित आणि कष्टकऱ्यांची व्यथा-वेदना मांडणारे होते. त्यामुळेच त्यांना लोकशाहीर ही पदवी मिळाली. रशियन महासत्तेने त्यांना भारताचा ‘मॅक्सिम ग्रॉर्की’ असे संबोधले होते. अण्णाभाऊंसारख्या महान व्यक्तिमत्त्वाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर करावा, असे आवाहन तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केले.वाटेगाव (ता. वाळवा) येथे के. सी. आर. यांच्या भारत राष्ट्र समितीच्यावतीने अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयाेजित करण्यात आला हाेता. यावेळी राव यांनी स्मारकातील अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. अण्णाभाऊंच्या स्नुषा सावित्रीबाई साठे अध्यक्षस्थानी होत्या.मुख्यमंत्री राव म्हणाले, अण्णाभाऊंनी समाजवाद आणि साम्यवादाची सांगड घालत भांडवलशाही व्यवस्थेवर प्रहार केले. त्यांचे साहित्य वैश्विक दर्जाचे होते. रशियन सरकारने त्यांना बोलावून घेत त्यांचा सन्मान केला. मात्र, भारतात त्यांचा सन्मान झाला नाही, याची खंत वाटते. महाराष्ट्र सरकारने अण्णाभाऊंच्या साहित्याचा इतर भारतीय भाषांमध्ये अनुवाद करावा.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करावी. तेलंगणा सरकारसुद्धा असा प्रस्ताव पाठवेल. मी व्यक्तीश: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा करून अण्णाभाऊंना ‘भारतरत्न’ पुरस्कार द्यावा यासाठी पाठपुरावा करेन. देशाचा मूल निवासी असलेल्या राज्यातील मातंग समाजाला बीआरएसकडून योग्य ते प्रतिनिधित्व देऊ.सचिन साठे म्हणाले, राज्यातील मातंग समाजाची अवस्था वाईट आहे. आमच्या समाजाचा वापर करून अनेकांनी आपला राजकीय उद्धार करून घेतला. आता केसीआर यांचे नेतृत्व मिळाल्याने मातंग समाजाच्या प्रगतीची दारे खुली झाली आहेत. मातंग समाजाला विधानसभेत आणि लोकसभेत योग्य ते प्रतिनिधित्व मिळावे. यावेळी राज्यप्रमुख शंकर धोंडगे, कबीर मौलाना, बी. जी. देशमुख, भगीरथ भालके, माजी खासदार हरीभाऊ राठोड यांच्यासह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

९ ऑगस्टला इस्लामपुरात मेळावाराज्यातील शेतकरी चळवळीतील अभ्यासू नेते आणि देशभरातील शेतकरी संघटनांच्या शिखर संस्थेचे (सिफा) राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी मंगळवारी साखराळे (ता. वाळवा) येथील आपल्या निवासस्थानी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला. यावेळी पाटील यांनीही ९ ऑगस्ट रोजी इस्लामपूर येथे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत जाहीर मेळावा घेणार असल्याचे जाहीर केले.

टॅग्स :SangliसांगलीK Chandrashekar Raoके चंद्रशेखर राव