शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सांगली : अण्णा हजारें दिल्लीतील लढ्याचे रणशिंग फुंकणार, २० जानेवारीला आटपाडीत सभा : कल्पना इनामदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 13:25 IST

लोकपाल आणि लोकायुक्त यांची नियुक्ती करण्याबरोबरच शेतीमालाच्या हमीभावासह विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे दि. २३ मार्च रोजी दिल्ली येथे सत्याग्रह करणार आहेत. या आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, यासाठी त्यांची महाराष्ट्रातील पहिली सभा दि. २० जानेवारी रोजी आटपाडी येथे घेण्यात येणार आहे, अशी माहिती समाजसेविका कल्पना इनामदार यांनी दिली.

ठळक मुद्दे शेतीमालाच्या हमीभावासाठी हजारे दि. २३ मार्च रोजी दिल्ली येथे सत्याग्रह करणार लोकपाल, लोकायुक्त यांची नियुक्ती करण्याची मागणी आटपाडी येथे दि. २० जानेवारी रोजी महाराष्ट्रातील पहिली सभा दुसरा केजरीवाल होणार नाही!

आटपाडी : लोकपाल आणि लोकायुक्त यांची नियुक्ती करण्याबरोबरच शेतीमालाच्या हमीभावासह विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे दि. २३ मार्च रोजी दिल्ली येथे सत्याग्रह करणार आहेत. या आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, यासाठी त्यांची महाराष्ट्रातील पहिली सभा दि. २० जानेवारी रोजी आटपाडी येथे घेण्यात येणार आहे, अशी माहिती समाजसेविका कल्पना इनामदार यांनी दिली.इनामदार म्हणाल्या की, प्रत्येक राज्यातील कृषिमूल्य आयोग अभ्यास करुन कृषिमूल्य निर्धारित करुन राज्यातील कृषिमूल्य अधिकारी केंद्र व केंद्रीय कृषिमूल्य आयोग व केंद्र सरकार यांच्याकडे पाठवितात. पण आजपर्यंत केंद्र सरकारने यावर अंमलबजावणी केलेली नाही. त्यासाठी अण्णासाहेब हजारे सत्याग्रह करणार आहेत.

शेतकऱ्यांच्या मूलभूत समस्या, शेतीमालाला हमीभाव, विजेची कायमस्वरुपी समस्या सोडविणे, पाण्याची कायमस्वरुपी समस्या सोडविणे, शेतकऱ्यांना ५ हजार रुपये पेन्शन देण्यात यावी, निवडणुकांमध्ये सुधारणा करण्यात यावी, सरकारने शेतकऱ्यांचा १०० टक्के माल हमीभावाने खरेदी करावा या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. येथील बचत धामच्या पटांगणात ही सभा होणार आहे.

दुसरा केजरीवाल होणार नाही!अण्णा हजारे यांच्या दिल्लीतील आंदोलनात सामील झालेले अरविंद केजरीवाल पुढे राजकारणात जाऊन दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. आता यापुढे अण्णा हजारे यांच्या आंदोलनात सामील होण्यासाठी कार्यकर्त्यांना, पुढे राजकारणात जाणार नाही, असे प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे. प्रामाणिकपणे केवळ समाजसेवा करण्याची इच्छा असलेल्यांनीच प्रतिज्ञापत्रासाठी संपर्क साधावा, असे आवाहन कल्पना इनामदार यांनी केले.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेSangliसांगली