शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

ना रिफ्लेक्टर, ना दिशादर्शक फलक; सांगली-कोल्हापूर रस्त्यावरील अंकली पुलावरून प्रवास म्हणजे मृत्यूची सापशिडीच

By संतोष भिसे | Updated: November 29, 2024 15:41 IST

पुलावरील रस्ता झुडपांनी भरला

संतोष भिसेसांगली : सांगली-कोल्हापूर रस्त्यावर कृष्णा नदीवरील अंकली (ता. मिरज) पुलावर बुधवारी मध्यरात्री खेडेकर कुटुंबावर काळ कोसळला. अपघात घडलेले ठिकाण धोकादायक आणि जीवघेणे असेच आहे. या रस्त्यावरील वाहतुकीची घनता पाहता हा पूल अपघातांचे केंद्र ठरला आहे. किंबहुना अंकली येथील महामार्ग चौकापासून जयसिंगपूर शहरापर्यंतचा रस्ता वाहनचालकांसाठी प्रचंड धोकादायक आणि डोकेदुखीचा ठरला आहे.बुधवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात प्रसाद भालचंद्र खेडेकर (वय ३६), प्रेरणा प्रसाद खेडेकर (३५, दोघेही रा. मारुती रस्ता, गावभाग, सांगली) आणि वैष्णवी संतोष नार्वेकर (२१, रा. आकाशवाणी केंद्राजवळ, सांगली) यांचा मृत्यू ओढवला. जयसिंगपूरकडून सांगलीकडे येताना नदीच्या पुलावरून त्यांची चारचाकी नदीपात्रात कोसळली. गाडी कोसळलेले पात्र पूर्णत: कोरडे आहे. तसेच तेथे दगड किंवा पुलाचे बांधकाम असा कोणताही भाग नाही. गाडी सुमारे ३० फूट उंचीवरून खाली आदळल्याने जोराचा मार लागून तिघांचा मृत्यू झाला. गाडी जेथून नदीपात्रात कोसळली, तो रस्त्याचा भाग धोकादायक आणि तीव्र वळणाचा आहे. गाडी कोसळलेल्या ठिकाणी कठडा नाही. जयसिंगपूरहून वेगाने आलेली मोटार या मोकळ्या जागेतून थेट खाली गेली.

अवघ्या एका फुटाने मृत्यूने गाठलेगाडी कोसळली त्या जागेवरून अवघ्या एका फुटावर सिमेंटचा सुरक्षा कठडा सुरू होतो. अनियंत्रित झालेली गाडी फूटभर अंतर जरी पुढे आली असती, तरी कठड्याला धडकून रस्त्यावरच राहिली असती. तिघांचेही जीव वाचले असते. पण तसे होऊ शकले नाही.

पथकर नाका चौक म्हणजे मृत्यूचा सापळाचपथकर नाक्याजवळील हा चौक म्हणजे मृत्यूचा सापळाच आहे. सांगली-जयसिंगपूर, जयसिंगपूर- सांगली आणि जयसिंगपूर-सांगली बायपास हे तीन रस्ते येथे एकत्र येतात. बायपास रस्त्यावरून सांगलीकडे येणारे वाहन चढणीमुळे वेगाने असते. त्याला दिशादर्शनासाठी कोणताही फलक लावलेला नाही. गोंधळलेला चालक थेट सांगली-जयसिंगपूर रस्त्यावर येण्याचा धोका असतो. चौकातील रस्ता अत्यंत खराब असून सर्वत्र धूळ पसरलेली असते. येथे गतिरोधक, मार्गदर्शक फलक किंवा सिग्नल नाहीत. पुरेसे पथदिवेही नाहीत. भरीस भर म्हणून छोट्या व्यावसायिकांनी रस्त्याकडेला दुकाने थाटली आहेत.

पुलावरील रस्ता झुडपांनी भरलासांगली ते जयसिंगपूर आणि जयसिंगपूर ते सांगली हे पुलावरील दोन्ही रस्ते झाडीझुडपांनी भरले आहेत. झुडपांमुळे त्यांची रुंदी कमी झाली आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंना भरावावर मोठ्या प्रमाणात झुडपांचे साम्राज्य आहे. त्यामध्ये रस्ता हरवून जातो. धोकादायक वळणांवर रिफ्लेक्टर किंवा फलक नाहीत. पुलावरील कठड्यांचा रंगही निघून चालला आहे. दररोज ४० हजारांहून अधिक वाहने धावणाऱ्या या रस्त्याच्या सुरक्षिततेकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे. परराज्यातून किंवा परजिल्ह्यातून आलेला चालक या पुलावरून प्रवास करताना हमखास गोंधळतो.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरAccidentअपघातroad transportरस्ते वाहतूक