शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
3
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
4
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
5
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
6
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
7
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
8
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
9
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
10
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
11
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
12
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
13
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
14
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
15
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
16
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
17
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
18
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
19
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
20
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!

ना रिफ्लेक्टर, ना दिशादर्शक फलक; सांगली-कोल्हापूर रस्त्यावरील अंकली पुलावरून प्रवास म्हणजे मृत्यूची सापशिडीच

By संतोष भिसे | Updated: November 29, 2024 15:41 IST

पुलावरील रस्ता झुडपांनी भरला

संतोष भिसेसांगली : सांगली-कोल्हापूर रस्त्यावर कृष्णा नदीवरील अंकली (ता. मिरज) पुलावर बुधवारी मध्यरात्री खेडेकर कुटुंबावर काळ कोसळला. अपघात घडलेले ठिकाण धोकादायक आणि जीवघेणे असेच आहे. या रस्त्यावरील वाहतुकीची घनता पाहता हा पूल अपघातांचे केंद्र ठरला आहे. किंबहुना अंकली येथील महामार्ग चौकापासून जयसिंगपूर शहरापर्यंतचा रस्ता वाहनचालकांसाठी प्रचंड धोकादायक आणि डोकेदुखीचा ठरला आहे.बुधवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात प्रसाद भालचंद्र खेडेकर (वय ३६), प्रेरणा प्रसाद खेडेकर (३५, दोघेही रा. मारुती रस्ता, गावभाग, सांगली) आणि वैष्णवी संतोष नार्वेकर (२१, रा. आकाशवाणी केंद्राजवळ, सांगली) यांचा मृत्यू ओढवला. जयसिंगपूरकडून सांगलीकडे येताना नदीच्या पुलावरून त्यांची चारचाकी नदीपात्रात कोसळली. गाडी कोसळलेले पात्र पूर्णत: कोरडे आहे. तसेच तेथे दगड किंवा पुलाचे बांधकाम असा कोणताही भाग नाही. गाडी सुमारे ३० फूट उंचीवरून खाली आदळल्याने जोराचा मार लागून तिघांचा मृत्यू झाला. गाडी जेथून नदीपात्रात कोसळली, तो रस्त्याचा भाग धोकादायक आणि तीव्र वळणाचा आहे. गाडी कोसळलेल्या ठिकाणी कठडा नाही. जयसिंगपूरहून वेगाने आलेली मोटार या मोकळ्या जागेतून थेट खाली गेली.

अवघ्या एका फुटाने मृत्यूने गाठलेगाडी कोसळली त्या जागेवरून अवघ्या एका फुटावर सिमेंटचा सुरक्षा कठडा सुरू होतो. अनियंत्रित झालेली गाडी फूटभर अंतर जरी पुढे आली असती, तरी कठड्याला धडकून रस्त्यावरच राहिली असती. तिघांचेही जीव वाचले असते. पण तसे होऊ शकले नाही.

पथकर नाका चौक म्हणजे मृत्यूचा सापळाचपथकर नाक्याजवळील हा चौक म्हणजे मृत्यूचा सापळाच आहे. सांगली-जयसिंगपूर, जयसिंगपूर- सांगली आणि जयसिंगपूर-सांगली बायपास हे तीन रस्ते येथे एकत्र येतात. बायपास रस्त्यावरून सांगलीकडे येणारे वाहन चढणीमुळे वेगाने असते. त्याला दिशादर्शनासाठी कोणताही फलक लावलेला नाही. गोंधळलेला चालक थेट सांगली-जयसिंगपूर रस्त्यावर येण्याचा धोका असतो. चौकातील रस्ता अत्यंत खराब असून सर्वत्र धूळ पसरलेली असते. येथे गतिरोधक, मार्गदर्शक फलक किंवा सिग्नल नाहीत. पुरेसे पथदिवेही नाहीत. भरीस भर म्हणून छोट्या व्यावसायिकांनी रस्त्याकडेला दुकाने थाटली आहेत.

पुलावरील रस्ता झुडपांनी भरलासांगली ते जयसिंगपूर आणि जयसिंगपूर ते सांगली हे पुलावरील दोन्ही रस्ते झाडीझुडपांनी भरले आहेत. झुडपांमुळे त्यांची रुंदी कमी झाली आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंना भरावावर मोठ्या प्रमाणात झुडपांचे साम्राज्य आहे. त्यामध्ये रस्ता हरवून जातो. धोकादायक वळणांवर रिफ्लेक्टर किंवा फलक नाहीत. पुलावरील कठड्यांचा रंगही निघून चालला आहे. दररोज ४० हजारांहून अधिक वाहने धावणाऱ्या या रस्त्याच्या सुरक्षिततेकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे. परराज्यातून किंवा परजिल्ह्यातून आलेला चालक या पुलावरून प्रवास करताना हमखास गोंधळतो.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरAccidentअपघातroad transportरस्ते वाहतूक