शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

संतप्त धरणग्रस्त आंदोलक घुसले इस्लामपूर तहसील कार्यालयात, पोलिसांची उडाली तारांबळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 15:30 IST

'ही जनता मालक म्हणून इथे येऊन न्यायासाठी बसली आहे प्रशासन जनतेसाठी चालते हे लक्षात ठेवा'

युनूस शेखइस्लामपूर : गेल्या ४० वर्षांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी १६१ मोर्चे काढून अनेक आंदोलने करणाऱ्या वारणा धरणग्रस्त आणि चांदोली प्रकल्पग्रस्त कुटुंबांनी आज दुसऱ्या दिवशी थेट तहसील कार्यालयात घुसून प्रशासन आणि शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलकांच्या या आक्रमक भूमिकेमुळे पोलिसांचीही तारांबळ उडाली होती. आंदोलकांच्या गर्दीने तळमजला पूर्ण भरून गेला होता. घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.सोमवारी थकीत कबजेपट्टीच्या नोटीसा मागे घ्याव्यात यासह इतर मागण्यासाठी धरणग्रस्त संघटनेचे नेते गौरव नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली दिवसभर भर उन्हात बसून आंदोलन केले. सायंकाळपर्यंत यावर अधिकाऱ्यांच्या बैठकीत तोडगा न निघाल्याने धरणे आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. याचवेळी नायकवडी यांनी आंदोलनाची रूपरेषा जाहीर करत प्रशासनाला जागे केले होते.आज, मंगळवारी सर्व आंदोलक पुन्हा तहसील कार्यालयासमोर एकत्र जमले. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे. सकाळी आंदोलनाला सुरुवात करताना पुन्हा महिलांनी संघर्ष गाणी गात वातावरण तापवले यातच उन्हाचा चटका तीव्र होऊ लागल्याने प्रशासन लक्ष देत नाही तर आत घुसण्याचा गनिमी कावा यशस्वी करत तहसील कार्यालयातील तळ मजल्यावर ठिय्या मारत ताबा घेतला.माजी मंत्री सदाभाऊ खोत, भाजपचे नेते सम्राट महाडिक, विक्रम पाटील,संतोष घनवट यांनी आंदोलस्थळी येऊन पाठिंबा जाहीर केला. खोत म्हणाले, सरकार कधी सावकार होऊ शकत नाही मात्र महाविकास आघाडीचे सरकारने १२ टक्के व्याजासह या नोटीसा पाठवून अन्याय केला आहे. सरकार असले काय आणि नसले काय, मला फरक पडत नाही. सरकार कुणाचेही असुदे. या न्याय मागण्यासाठी आलेल्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करू नका अन्यथा त्या अधिकाऱ्यांना इथे ठेवणार नाही. ही जनता मालक म्हणून इथे येऊन न्यायासाठी बसली आहे प्रशासन जनतेसाठी चालते हे लक्षात ठेवा. आंदोलकांना न्याय मिळेपर्यंत तुमच्या पाठीशी राहू.सम्राट महाडिक म्हणाले, फडणवीस सरकारचा शासन निर्णय रद्द करून महाघोटाळे सरकारने नवीन निर्णय घेत या अन्यायी नोटीसा पाठवल्या आहेत. अधिकाऱ्यांनी शक्य त्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात अन्यथा त्यांना बाहेर पडू देणार नाही.विक्रम पाटील म्हणाले, भूसंपादन अधिकारी लाटकर हे मनमानी कारभार करत आहेत. धरणग्रस्तांना तुच्छतेची वागणूक देतात.त्यांच्यावर कारवाई करावी. फडणवीस सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी करून या आंदोलकांना न्याय द्यावा. यावेळी घोषणाबाजी करत आंदोलकांनी कार्यालय परिसर दुमदुमून सोडला होता.

..अन्यथा कारवाई करावी लागेलआंदोलक कार्यालयाच्या प्रवेशद्वारातून आत जाताना गोंधळ उडाला. यावेळी पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली. तहसीलदार प्रदीप उबाळे यांनी या घटनेची गंभीर दखल घेत आंदोलकांनी शांततेत आंदोलन करावे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आम्हाला कारवाई करावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

टॅग्स :Sangliसांगलीislampur-acइस्लामपूर