शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
4
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
5
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
6
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
7
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
8
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
9
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
11
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
12
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
13
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
14
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
15
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
16
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
17
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
18
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
19
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
20
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर

Sangli: खराब रस्त्यामुळे गेला माजी सैनिकाचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 18:02 IST

कुंभारमळा-मानेवस्ती रस्त्याची वाताहत, रस्त्याच्या प्रश्नावर निवडणुक झाली..पण रस्ता नाही झाला

कवठेमहांकाळ : अग्रण धुळगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील माजी सैनिक बाबासाहेब लक्ष्मण माने (वय ७२) यांना कुंभारमळा ते माने वस्ती हा दोन ते तीन किलोमीटरचा रस्ता सुस्थितीत नसल्याने आपले प्राण गमावावे लागले. घरातून बैलगाडीतून रस्त्यापर्यंत त्यांना आणले; परंतु रस्त्यापर्यंत येईपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली. हा प्रकार गुरुवारी (दि. १५) रात्रीच्या सुमारास घडला.अग्रण धुळगावमधील माजी सैनिक बाबासाहेब माने यांनी भारतीय सैन्यात १८ वर्षे सेवा बजावली. त्यानंतर १९८६ मध्ये ते सैन्यातून सेवामुक्त झाले. निवृत्तीनंतर ते शेती, घर बघत होते. गुरुवारी रात्री १०च्या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला. हृदयविकाराचा त्रास होत असताना माने यांना घरापर्यंत कोणतेही वाहन केवळ चांगला रस्ता नसल्याने पोहोचू शकत नसल्याने प्राण गमवावे लागले. उपचारासाठी त्यांना सांगली येथे खासगी रुग्णालयात दाखल करावयाचे होते.दरम्यान बुधवारी सायंकाळी ४ च्या दरम्यान झालेल्या मोठ्या पावसाने कुंभारमळा ते माने वस्ती रस्त्याची वाताहत झाली होती. त्यामुळे या रस्त्यावरून त्यांना उपचारासाठी नेणे आव्हानात्मक बनले होते. एकीकडे माने यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी कुटुंबाची झुंज सुरू होती आणि दुसरीकडे माने यांची हृदयविकाराचा त्रासातून मुक्त होण्यासाठी धडपड सुरू होती.अग्रण धुळगावपासून कवठेमहांकाळ मार्गावर कुंभार मळा आहे. कुंभार मळ्यातून सुमारे दोन ते तीन किलाेमीटर अंतरावर माने वस्ती आहे. नागरिकांना पावसाळ्यात पायपीट करावी लागते, कारण रस्ता पुर्णपणे चिखलमय होतो.

रस्त्याच्या प्रश्नावर निवडणुक झाली.. पण रस्ता नाही झाला..एक दोन वर्षांपूर्वी अग्रण धुळगावची ग्रामपंचायत निवडणूक झाली होती. त्या निवडणुकीत सत्ताधारी व विरोधकांनी येथील मतदान मिळविण्यासाठी या रस्त्याचा प्रश्न अग्रस्थानी ठेवून मतदान मागितले होते. मात्र निवडणूक होऊन काही वर्षे पूर्ण झाली; पण या रस्त्याची स्थिती ‘जैसे थे’च आहे.अखेर घडलेही तसेच..अग्रण धुळगाव येथील बाबासाहेब माने हे आपल्या शेतीवर व मायभूमीवर खूप प्रेम करीत होते. या रस्त्याच्या स्थितीला कंटाळून माने यांचे पुत्र दिनकर व बंधू विनोद कुटुंबासह दुसरीकडे राहण्यास गेले. वडिलांनीही आपल्याकडे यावे असा त्यांचा हट्ट हाेता. मात्र बाबासाहेब त्यांना म्हणाले ‘जीव गेला तरी चालेल; पण मी माझी शेती व मायभूमी सोडणार नाही’, अखेर घडलेही तसेच.

टॅग्स :SangliसांगलीHeart Attackहृदयविकाराचा झटकाroad transportरस्ते वाहतूक