शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

‘अ‍ॅमनेस्टी स्कीम’ पुन्हा केंद्राने लागू करावी : किरण तारळेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 21:25 IST

अपुरे प्रशासकीय नियोजन आणि घाईगडबडीमुळे फसलेली नोटाबंदी व त्यापाठोपाठच्या जीएसटी प्रणालीमुळे देशात उद्योगांसह व्यापार क्षेत्रालाही मंदीला तोंड द्यावे लागत आहे.

ठळक मुद्दे अर्थव्यवस्थेला गती मिळणे शक्यवस्त्रोद्योग साखळीत तर अस्तित्वाची लढाई सुरू आहे

विटा (जि. सांगली) : अपुरे प्रशासकीय नियोजन आणि घाईगडबडीमुळे फसलेली नोटाबंदी व त्यापाठोपाठच्या जीएसटी प्रणालीमुळे देशात उद्योगांसह व्यापार क्षेत्रालाही मंदीला तोंड द्यावे लागत आहे.

वस्त्रोद्योग साखळीत तर अस्तित्वाची लढाई सुरू आहे. रोख व्यापारावर आलेले निर्बंध विचारात घेता, केंद्र शासनाने यापूर्वी काळा पैसा पांढरा करण्यासाठी वापरलेली ‘अ‍ॅमनेस्टी स्कीम’ पुन्हा एकदा लागू करावी, अशी मागणी विटा यंत्रमाग संघाचे अध्यक्ष किरण तारळेकर यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना केली. यामुळे बहुतांशी काळ्या पैशाचे प्रगटीकरण होऊन देशभरात मरगळलेल्या बाजार पेठांबरोबरच अर्थव्यवस्थेला गती मिळू शकेल, असेही त्यांनी सांगितले.

तारळेकर म्हणाले की, केंद्राने अपुऱ्या तयारीने व घाईगडबडीत एक हजार व ५०० रुपयांच्या नोटाबंदीचा निर्णय लागू केला. हा निर्णय घेताना देशात चलनात असलेल्या १५.४१ लाख कोटी रुपयांच्या चलनापैकी फक्त पांढरा पैसा बदलून चलनात येईल व किमान तीन लाख कोटी रुपयांचा काळा पैसा आपोपाप चलनातून बाहेर जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, नोटा बदलून द्यायच्या नियमांतील त्रुटींचा गैरफायदा यंत्रणेने घेतल्याने व भ्रष्ट प्रशासनामुळे बड्या काळ्या पैसेवाल्यांसह देशातील सर्वच चलन बदलले गेले.

रिझर्व्ह बॅँकेच्या घोषणेनुसार ९९.३ टक्के नोटा बदलून दिल्याचे सांगितले जाते. याचा अर्थ नोटाबंदीच्या माध्यमातून काळा पैसा चलनातून बाहेर काढण्याचा केंद्राचा उद्देश फसल्याचे दिसून येत आहे. ते म्हणाले की, या काळ्या पैशाचा वापर देशातील इतर गैरवापराबरोबरच रोखीने चालणाºया दोन नंबरच्या व्यापारासाठी होत होता. नोटाबंदीनंतरही नोटा बदलून मिळाल्याने हा व्यापार सुरूच राहिला आहे. त्यापाठोपाठ जीएसटीमधील संगणक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लागू केलेल्या अनेक तुरतुदींमुळे या दोन नंबरच्या रोखीच्या व्यापारावर बंधन आले.

ही रोखीने चालणारी दोन नंबरच्या व्यापारातील साखळी बहुतांशी बंद झाल्यामुळे व हा पैसा कपाटबंद झाल्याने प्रत्येक ठिकाणच्या उद्योग व व्यापारावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातील उत्पादन क्षेत्रे मंदीमुळे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.उद्योग क्षेत्राला गती देण्यासाठी ‘अ‍ॅमनेस्टी स्कीम’ लागू करावी व काळा पैसा जाहीर करून तो उद्योग-व्यापारामध्ये वापरण्याची संधी द्यावी, असेही तारळेकर यावेळी म्हणाले.

काय आहे अ‍ॅमनेस्टी स्कीम...केंद्र शासनाने यापूर्वी काळा व बेहिशेबी पैसा ठराविक टक्के आयकर भरून पांढरा करण्याची योजना सुरू केली होती. त्या योजनेला सरकारने ‘अ‍ॅमनेस्टी स्कीम’ असे नाव दिले होते. सरकारने ही योजना सुरू केल्यास मरगळलेला व्यापार व अर्थव्यवस्थेला गती मिळणार असल्याचे किरण तारळेकर म्हणाले.

टॅग्स :SangliसांगलीMONEYपैसाblack moneyब्लॅक मनी