शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

शक्तिपीठ महामार्गासाठी मिरज, आटपाडीचे प्रांताधिकारी भूसंपादन करणार, शेतकऱ्यांच्या विरोधानंतरही शासनाचा निर्णय

By संतोष भिसे | Updated: March 9, 2024 15:34 IST

शासनाने निर्धारित केलेल्या गुणांकनानुसार जमिनीची किंमत निश्चित केली जाईल

सांगली : प्रस्तावित नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्गाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला असला, तरी शासनाने भूसंपादनाच्या हालचाली सुरु केल्या आहेत. हा महामार्ग जात असलेल्या मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव आणि खानापूर तालुक्यांसाठी भूसंपादन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तसे राजपत्र गुरुवारी जारी केले. मिरज, तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यांतील भूसंपादनासाठी मिरजेचे प्रांताधिकारी काम पाहतील. खानापूर तालुक्यासाठी आटपाडीचे प्रांताधिकारी भूसंपादन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. ७ मार्चपासूनच त्यांची नियुक्ती झाल्याचे राजपत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. महामार्गासाठी संपादित केल्या जाणाऱ्या जमिनींचे मूल्यांकन निश्चित करण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर असेल. शासनाने निर्धारित केलेल्या गुणांकनानुसार जमिनीची किंमत निश्चित केली जाईल. त्यासाठी तेथील रेडीरेकनर लक्षात घेतला जाईल.रत्नागिरी-नागपूर महामार्गासाठी शेतकऱ्यांसोबत आमनेसामने चर्चा करुन रेडीरेकनरच्या चारपटीपर्यंत किंमती निश्चित केल्या होत्या. त्यामुळे काही शेतकऱ्यांना एकरी एक ते दीड कोटी रुपये मिळाले होते. शक्तिपीठ महामार्गासाठी मात्र इतके पैसे मिळण्याची शक्यता नाही.सोलापूर जिल्ह्यातून जात असलेल्या सुरत चेन्नई महामार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया सध्या सुरु आहे. जमिनींना अत्यल्प भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी टोकाचा विरोध सुरु केला आहे. तेथील शेतकऱ्यांना एकरी अवघ्या एक लाख रुपये भरपाईच्या नोटिसा आल्या आहेत. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. सूरत - चेन्नईचाच निकष शक्तिपीठसाठी लावल्यास सांगली जिल्ह्यातील जमिनींनाही कवडीमोल भाव मिळणार आहे. हा धोका ओळखून महामार्गच रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शासनाकडून मिळणाऱ्या भरपाईच्या पैशांत अन्यत्र तितकीच शेती घेता येत नाही अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे.

खासगी वाटाघाटी कराभूसंपादन अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसोबत खासगी वाटाघाटी करुन जमिनींचे मूल्यांकन करण्याची मागणी महामार्गबाधित शेतकरी संघर्ष समितीने केली आहे. मात्र शासनाने गुणांकनच कमी केल्याने कितीही वाटाघाटी केल्या, तरी दर मात्र कमीच मिळणार आहे.

टॅग्स :Sangliसांगलीhighwayमहामार्गFarmerशेतकरी