शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

बी.कॉम.च्या सर्वच प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच झाल्या होत्या व्हायरल, शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षेतील प्रकार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2023 16:05 IST

व्हायरल प्रश्नपत्रिका कोणत्या महाविद्यालयातून बाहेर पडली, हे वाॅटरमार्कच्या आधारे शोधणे सहजशक्य आहे, पण त्यासाठी कष्ट घेतले जात नाहीत.

सांगली : शिवाजी विद्यापीठाच्या बी.कॉम. तृतीय वर्षाच्या सर्वच प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर व्हायरल झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शेवटचा पेपर फुटल्याचे कारण देत पुन्हा घेण्यात आला, पण सर्वच विषयांबाबतीत हा धक्कादायक प्रकार घडल्याचे शिक्षकांनी सांगितले.दि. २५ ते ३१ मे या कालावधीत या परीक्षा झाल्या. दुपारी अडीच वाजता पेपर सुरू व्हायचा, पण ११-१२ वाजताच प्रश्नपत्रिका मोबाइलवर उपलब्ध होत होती. परीक्षेदिवशीच काही विद्यार्थ्यांकडून शिक्षकांना प्रश्नांची उत्तरे विचारण्यात येत होती, त्यावरून प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याचे स्पष्ट झाले. शिक्षकांनी विचारणा केली असता विद्यार्थ्यांनी मोबाइलवर प्रश्नपत्रिका मिळाल्याचे सांगितले. व्हायरल प्रश्नपत्रिका डमी असेल म्हणून काही शिक्षकांनी दुर्लक्ष केले, पण पेपर संपल्यावर तोच पेपर व्हायरल झाला असल्याचे स्पष्ट झाले.बुधवारी दुपारी अडीच वाजता शेवटचा ॲडव्हान्स अकाउंटन्सी टॅक्सेशनचा पेपर सुरू झाल्यानंतर तासाभराने रद्द करण्यात आला. पेपर फुटल्याने हा निर्णय घ्यावा लागला. नव्या प्रश्नपत्रिकेसह पुन्हा परीक्षा घेण्यात आली. त्यासाठी सायंकाळी साडेपाचपर्यंतचा अतिरिक्त वेळ देण्यात आला. अन्य सर्वच पेपर याच पद्धतीने फुटले होते, पण ते गांभीर्याने घेण्यात आले नाहीत.

अशी असते प्रश्नपत्रिकेची प्रक्रियाविद्यापीठाकडून प्रत्येक महाविद्यालयाला परीक्षेच्या काही तास अगोदर पीडीएफ स्वरूपात प्रश्नपत्रिका मेलवर दिली जाते. मेल ओपन करण्यासाठी प्राचार्यांकडे कोड दिलेला असतो. त्याआधारे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नजरेखाली प्रश्नपत्रिका डाऊनलोड करून घेतली जाते. जितके परीक्षार्थी, तितक्या प्रिंट काढल्या जातात. कॅमेऱ्यासमोरच पाकिटात सील केल्या जातात. परीक्षेच्या वेळेत संबंधित वर्गांना पाठविल्या जातात.

कसा फुटतो पेपर?मेलवरून डाऊनलोड करून घेतलेल्या प्रश्नपत्रिकेची प्रिंट काढताना तिला पाय फुटतात. एखाद्या कर्मचाऱ्याकडून मोबाइलवर फोटो काढून व्हायरल केली जाते. प्रश्नपत्रिकेच्या प्रत्येक पानावर त्या-त्या महाविद्यालयाची ओळख सांगणारा वॉटरमार्क असतो. व्हायरल प्रश्नपत्रिका कोणत्या महाविद्यालयातून बाहेर पडली, हे वाॅटरमार्कच्या आधारे शोधणे सहजशक्य आहे, पण त्यासाठी कष्ट घेतले जात नाहीत.

पेपरफुटीचे प्रकार विद्यापीठाकडून गांभीर्याने घेतले जात नसल्याचे दिसते. यामुळे प्रामाणिक आणि हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना नोकऱ्यांच्या शर्यतीत मागच्या रांगेत उभे केले जाईल. यासंदर्भात कुलगुरूंना निवेदन देणार असून, चौकशीची मागणी करणार आहोत. - रावसाहेब हल्लोळे, अध्यक्ष, काेचिंग क्लासेस टीचर्स असोसिएशन

टॅग्स :Sangliसांगलीexamपरीक्षा