शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

Maratha Reservation: आमदार-खासदारांनो राजीनामे द्या, अन्यथा..; मराठा समाजाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 11:49 IST

राजीनामा म्हणजे उपाय नव्हे

सांगली : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे - पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. त्यांची तब्येत खालावत असतानाही शासन याबाबत निर्णय घ्यायला तयार नाही. संविधानाच्या चौकटीत बसूनच आरक्षणाची मागणी होत असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळेच आता आरक्षणासाठी सर्वच लोकप्रतिनिधींनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अन्यथा पुढील निवडणुकीत त्यांना निश्चित फटका बसेल, असा इशाराच सकल मराठा समाजाच्यावतीने लोकप्रतिनिधींना देण्यात आला.रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीला उपस्थित राहण्यासाठी जिल्ह्यातील खासदार, आमदार उपस्थित होते. याचवेळी मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी त्यांची भेट घेत आरक्षणाच्या मुद्यावर त्यांना कोंडीत पकडले. यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे, खा. संजय पाटील, अरूण लाड, गोपीचंद पडळकर, आ. अनिल बाबर, सुमनताई पाटील, डॉ. विश्वजीत कदम, विक्रम सावंत आदी उपस्थित होते.जिल्ह्यात अनेक गावांमध्ये नेत्यांना प्रवेशाला बंदी घालण्यात आली असताना, रविवारी लोकप्रतिनिधींची भेट घेऊन यावर त्यांची भूमिका जाणून घेण्यात आली. यावेळी सर्वांनीच मराठा आरक्षणासाठी आता केवळ आश्वासन न देता त्यासाठी पुढाकार घ्यावा. यासाठी येत्या चार दिवसांचा इशारा देऊन जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी राजीनामा देण्याची मागणी करण्यात आली आणि येथेच माध्यमांसमोर याबाबत घोषणा करण्याचेही आवाहन करण्यात आले. मात्र, सर्वच लोकप्रतिनिधींनी राजीनाम्याचा विषय टाळला.यानंतर मनोज जरांगे - पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून सांगलीत एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलाविण्याचे पत्र सर्वांनी देण्याचे ठरविण्यात आले.सकल मराठा समाजाचे डॉ. संजय पाटील, प्रशांत भोसले, अशोक पाटील, शंभोराज काटकर आदींनी यावेळी आरक्षणाबाबत ठाम भूमिका मांडली.

राजीनामा म्हणजे उपाय नव्हेमाजी मंत्री डॉ. विश्वजित कदम म्हणाले, मी असो अथवा इतर सर्वच लोकप्रतिनिधी केवळ मराठा समाजाच्या नव्हे, तर इतर सर्वांनी यासाठी मतदान केले आहे. निवडून देताना आम्हाला नैतिकता असते. पाच वर्षांसाठी आमची जबाबदारी आहे. आम्ही सर्वजण राजीनामा देताना सर्वांना विश्वासात घेऊ, आम्ही राजीनामा देण्याने प्रश्न सुटणार असेल तर तेही करायला आम्ही तयार आहोत. मात्र, त्यापेक्षा सरकारकडून टिकणारे आरक्षण कसे मिळवता येईल, यासाठी आम्ही प्राधान्य देणार आहोत.

टॅग्स :SangliसांगलीMaratha Reservationमराठा आरक्षणPoliticsराजकारण