शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation: आमदार-खासदारांनो राजीनामे द्या, अन्यथा..; मराठा समाजाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 11:49 IST

राजीनामा म्हणजे उपाय नव्हे

सांगली : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे - पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. त्यांची तब्येत खालावत असतानाही शासन याबाबत निर्णय घ्यायला तयार नाही. संविधानाच्या चौकटीत बसूनच आरक्षणाची मागणी होत असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळेच आता आरक्षणासाठी सर्वच लोकप्रतिनिधींनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अन्यथा पुढील निवडणुकीत त्यांना निश्चित फटका बसेल, असा इशाराच सकल मराठा समाजाच्यावतीने लोकप्रतिनिधींना देण्यात आला.रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीला उपस्थित राहण्यासाठी जिल्ह्यातील खासदार, आमदार उपस्थित होते. याचवेळी मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी त्यांची भेट घेत आरक्षणाच्या मुद्यावर त्यांना कोंडीत पकडले. यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे, खा. संजय पाटील, अरूण लाड, गोपीचंद पडळकर, आ. अनिल बाबर, सुमनताई पाटील, डॉ. विश्वजीत कदम, विक्रम सावंत आदी उपस्थित होते.जिल्ह्यात अनेक गावांमध्ये नेत्यांना प्रवेशाला बंदी घालण्यात आली असताना, रविवारी लोकप्रतिनिधींची भेट घेऊन यावर त्यांची भूमिका जाणून घेण्यात आली. यावेळी सर्वांनीच मराठा आरक्षणासाठी आता केवळ आश्वासन न देता त्यासाठी पुढाकार घ्यावा. यासाठी येत्या चार दिवसांचा इशारा देऊन जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी राजीनामा देण्याची मागणी करण्यात आली आणि येथेच माध्यमांसमोर याबाबत घोषणा करण्याचेही आवाहन करण्यात आले. मात्र, सर्वच लोकप्रतिनिधींनी राजीनाम्याचा विषय टाळला.यानंतर मनोज जरांगे - पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून सांगलीत एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलाविण्याचे पत्र सर्वांनी देण्याचे ठरविण्यात आले.सकल मराठा समाजाचे डॉ. संजय पाटील, प्रशांत भोसले, अशोक पाटील, शंभोराज काटकर आदींनी यावेळी आरक्षणाबाबत ठाम भूमिका मांडली.

राजीनामा म्हणजे उपाय नव्हेमाजी मंत्री डॉ. विश्वजित कदम म्हणाले, मी असो अथवा इतर सर्वच लोकप्रतिनिधी केवळ मराठा समाजाच्या नव्हे, तर इतर सर्वांनी यासाठी मतदान केले आहे. निवडून देताना आम्हाला नैतिकता असते. पाच वर्षांसाठी आमची जबाबदारी आहे. आम्ही सर्वजण राजीनामा देताना सर्वांना विश्वासात घेऊ, आम्ही राजीनामा देण्याने प्रश्न सुटणार असेल तर तेही करायला आम्ही तयार आहोत. मात्र, त्यापेक्षा सरकारकडून टिकणारे आरक्षण कसे मिळवता येईल, यासाठी आम्ही प्राधान्य देणार आहोत.

टॅग्स :SangliसांगलीMaratha Reservationमराठा आरक्षणPoliticsराजकारण