शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सांगली जिल्ह्यातील सर्व पक्षीय साखर सम्राटांची शेतकऱ्यांविरोधात गट्टी - महेश खराडे 

By अशोक डोंबाळे | Updated: November 21, 2023 18:06 IST

शेतकऱ्यांच्या उद्रेकाची वाट न पाहता कारखानदारांनी दराची कोंडी फोडावी

सांगली : जिल्ह्यातील सर्व पक्षीय साखर सम्राटांनी शेतकऱ्यांच्या विरोधात गट्टी केली आहे. गेली तीन आठवडे ऊसदराचे आंदोलन सुरू असून एक ही कारखानदार कोंडी फोडायला तयार नाही. साखर सम्राटांनी शेतकऱ्यांच्या सहन शक्तीचा अंत बघू नये, असा इशारा स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला.खराडे म्हणाले, यंदाच्या उसाला प्रति टन पहिली उचल तीन हजार ५०० रुपये आणि गत वर्षी गळितास गेलेल्या उसाचा दुसरा हप्ता ४०० रुपये द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू आहे.यासाठी साखर आयुक्तांना निवेदन दिले, मोर्चा काढला. त्यानंतर साखर कारखानदारांना निवेदन दिली आहेत. त्याच्या कारखान्यासमोर ढोल वाजविला, ऐन दिवाळीत त्यांना खर्डा भाकरी दिली. रस्ता रोको आंदोलन केले. ऊस वाहतूक करणाऱ्या गाड्या अडविल्या, ऊस तोडी बंद पाडल्या. याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. मात्र, त्या बैठकीत ऊसदराबद्दल कोणताच तोडगा काढला नाही. कारखानदार काही बोलायलाच तयार नाहीत. कारखानदारांची हाताची घडी तोंडावर बोट आहे. पक्षीय राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांविरोधात कारखानदार एकत्र आले आहेत.शेतकऱ्यांना वाढीव काही द्यायचेच नाही, यासाठी कारखानदारांची गट्टी झालेली आहे. त्यामुळे ऊसदरांची कोंडी फुटायला तयार नाहीत. कारखाने शेतकऱ्यांच्या मालकीचे असूनही भिकाऱ्यासारखे दरासाठी कारखानदारांकडे विनंती करत आहे, तरीही कारखानदार दर जाहीर करत नाहीत. कारखानदारांनी शेतकऱ्यांचा अंत न पाहता ऊसदराची कोंडी फोडावी, अन्यथा आंदोलन गंभीर वळणावर जाईल. त्यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा खराडे यांनी दिला.

कारखानदारांची बैठक कधी होणार?साखर कारखानदारांच्या व्यवस्थापकांची बैठक दिवाळीत झाली. यावेळी कारखानदाराचे व्यवस्थापक निर्णय घेऊ शकत नाहीत, त्यामुळे अध्यक्षांची बैठक चार दिवसांत घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आश्वासन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले होते. व्यवस्थापकांबरोबरची बैठक होऊन आठ दिवस झाले तरीही कारखाना अध्यक्षांची बैठक बोलविली नाही, ती तातडीने घेण्याची मागणीही महेश खराडे यांनी केली आहे.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखाने