शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

सांगली जिल्ह्यातील सर्व पक्षीय साखर सम्राटांची शेतकऱ्यांविरोधात गट्टी - महेश खराडे 

By अशोक डोंबाळे | Updated: November 21, 2023 18:06 IST

शेतकऱ्यांच्या उद्रेकाची वाट न पाहता कारखानदारांनी दराची कोंडी फोडावी

सांगली : जिल्ह्यातील सर्व पक्षीय साखर सम्राटांनी शेतकऱ्यांच्या विरोधात गट्टी केली आहे. गेली तीन आठवडे ऊसदराचे आंदोलन सुरू असून एक ही कारखानदार कोंडी फोडायला तयार नाही. साखर सम्राटांनी शेतकऱ्यांच्या सहन शक्तीचा अंत बघू नये, असा इशारा स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला.खराडे म्हणाले, यंदाच्या उसाला प्रति टन पहिली उचल तीन हजार ५०० रुपये आणि गत वर्षी गळितास गेलेल्या उसाचा दुसरा हप्ता ४०० रुपये द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू आहे.यासाठी साखर आयुक्तांना निवेदन दिले, मोर्चा काढला. त्यानंतर साखर कारखानदारांना निवेदन दिली आहेत. त्याच्या कारखान्यासमोर ढोल वाजविला, ऐन दिवाळीत त्यांना खर्डा भाकरी दिली. रस्ता रोको आंदोलन केले. ऊस वाहतूक करणाऱ्या गाड्या अडविल्या, ऊस तोडी बंद पाडल्या. याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. मात्र, त्या बैठकीत ऊसदराबद्दल कोणताच तोडगा काढला नाही. कारखानदार काही बोलायलाच तयार नाहीत. कारखानदारांची हाताची घडी तोंडावर बोट आहे. पक्षीय राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांविरोधात कारखानदार एकत्र आले आहेत.शेतकऱ्यांना वाढीव काही द्यायचेच नाही, यासाठी कारखानदारांची गट्टी झालेली आहे. त्यामुळे ऊसदरांची कोंडी फुटायला तयार नाहीत. कारखाने शेतकऱ्यांच्या मालकीचे असूनही भिकाऱ्यासारखे दरासाठी कारखानदारांकडे विनंती करत आहे, तरीही कारखानदार दर जाहीर करत नाहीत. कारखानदारांनी शेतकऱ्यांचा अंत न पाहता ऊसदराची कोंडी फोडावी, अन्यथा आंदोलन गंभीर वळणावर जाईल. त्यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा खराडे यांनी दिला.

कारखानदारांची बैठक कधी होणार?साखर कारखानदारांच्या व्यवस्थापकांची बैठक दिवाळीत झाली. यावेळी कारखानदाराचे व्यवस्थापक निर्णय घेऊ शकत नाहीत, त्यामुळे अध्यक्षांची बैठक चार दिवसांत घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आश्वासन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले होते. व्यवस्थापकांबरोबरची बैठक होऊन आठ दिवस झाले तरीही कारखाना अध्यक्षांची बैठक बोलविली नाही, ती तातडीने घेण्याची मागणीही महेश खराडे यांनी केली आहे.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखाने