शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

'शक्तिपीठ' बाधितांच्या सर्व हरकती फेटाळल्या, सांगलीतील शेतकरी मंगळवारी निकालपत्राची करणार होळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 13:32 IST

शेतकऱ्यांकडून १९५० हरकती

सांगली : शक्तिपीठ महामार्गाबाबत महाराष्ट्र शासनाने काढलेल्या अधिसूचनेला घेण्यात आलेल्या हरकती फेटाळण्यात आल्या आहेत तसे निकाल प्रशासनाने दिले असून प्रत्येक बाधित शेतकऱ्यांना प्रति पाठविल्या आहेत. या निकालपत्राची होळी दि. ९ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष उमेश देशमुख यांनी दिली.उमेश देशमुख म्हणाले, शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे, या मागणीसाठी गेल्या दीड वर्षांपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. सरकारने शेतकऱ्यांचे कोणतेही म्हणणे ऐकून न घेता एकतर्फी निर्णय जाहीर केला आहे. शेतकऱ्यांचा विरोध तीव्र असून देखील सरकारने जमीन अधिग्रहणाचे काम चालूच ठेवले आहे. सरकारने भूसंपादनासाठी केवळ २० हजार कोटी रुपयांची तरतूद करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. हरकती सादर करत असताना शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी, त्या बागायती करण्याकरिता केलेला खर्च, त्यातून मिळणारे उत्पन्न, पुढील अनेक पिढ्यांचे होणारे नुकसान आदींचा विचार करून शेतकऱ्यांना भरपाई देण्याची गरज आहे. नदीकाठावरील भागात तयार होणारी पूरसदृश्य परिस्थिती या सर्व नुकसानीचे मुद्दे प्रांताधिकारी यांच्यासमोर मांडलेल्या होत्या. त्यांनी यापैकी कोणत्याही बाबींचा विचार न करता या हरकती फेटाळल्या आहेत. याचा निषेध करून दिलेल्या निकालपत्राच्या प्रतीची मंगळवारी (दि.९) सांगलीजिल्हाधिकारी कार्यालयासमोर होळी करण्यात येणार आहे.यावेळी शक्तिपीठ महामार्ग बाधित शेती बचाव कृती समितीचे महेश खराडे, सतीश साखळकर, प्रवीण पाटील, प्रभाकर तोडकर, उमेश एडके, पैलवान विष्णुपंत पाटील, यशवंत हरगुडे, राजाराम माळी, सतीश माळी, अण्णासाहेब जमदाडे, सुनील पवार, अधिकराव शिंदे, रवींद्र माळी, भीमाना खाडे, एकनाथ कोळी, उत्तम शिंदे, रघुनाथ पाटील, विलास पाटील, भाऊसाहेब लांडगे, मुरलीधर निकम, संतोष लोहार, नितीन झांबरे आदी उपस्थित होते.शेतकऱ्यांकडून १९५० हरकतीशक्तिपीठ महामार्ग बाधित जिल्ह्यातील एक हजार ९५० शेतकऱ्यांच्या हरकती दाखल झाल्या होत्या. त्यापैकी बहुतांशी हरकती मोबदला, शक्तिपीठ महामार्ग नको, अशाच आशयाच्या होत्या. मिरज प्रांताधिकारी यांच्याकडून या सर्व हरकती फेटाळल्या आहेत, अशी माहिती उमेश देशमुख यांनी दिली.