शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

जिल्ह्यातील चार तालुक्यात क्षारपडचे प्रमाण वाढले -शेतकऱ्यांमध्ये जागृतीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 00:06 IST

उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर होत असल्याने, जमिनीतील मुख्य पोषक तत्त्वेच नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. भविष्यात शेती क्षारपड होण्याची शक्यता दिसत आहे.

ठळक मुद्देरासायनिक खतांचा परिणाम : जमिनीतील पोषक तत्त्वे होताहेत गायब

सांगली : उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर होत असल्याने, जमिनीतील मुख्य पोषक तत्त्वेच नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. भविष्यात शेती क्षारपड होण्याची शक्यता दिसत आहे. मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर आणि रासायनिक खतांच्या जादा वापरामुळे चार तालुक्यांतील जमीन क्षारपड झाली आहे.

पीक चांगले राहण्याकरिता आता रासायनिक खतांचा भरमसाट वापर करतात. त्यामुळे शेतजमिनीचा पोतच खालावत आहे. सोबतच जमिनीतील अत्यंत सुपीक आणि पोषक तत्त्वे नष्ट होत आहेत. पशुधन घटल्याने शेणखत उपलब्ध होत नाही. त्यामुळेही रासायनिक खतांचा वापर वाढला आहे.शासकीय माती परीक्षण प्रयोगशाळेतर्फे जिल्ह्यातील तीन लाख ११ हजार ११७ शेतकऱ्यांना माती परीक्षण करुन जमिनीच्या आरोग्यपत्रिका दिल्या आहेत. पलूस, वाळवा, मिरज, तासगाव तालुक्यातील जवळपास एक लाखाहून शेतकºयांची एकर जमीन अधिक पाणी आणि रासायनिक खतांच्या जादा वापरामुळे क्षारपड झाली आहे.

आटपाडी, तासगाव, शिराळा, पलूस, मिरज, वाळवा, खानापूर, कवठेमहांकाळ, कडेगाव, जत या दहा तालुक्यातील जमिनीमध्ये नत्र कमी आहे. आटपाडी तालुक्यातील जमिनीमध्ये स्फूरद मध्यम, पालाश भरपूर आणि सेंद्रिय कर्बचे प्रमाण कमी आहे. तासगाव तालुक्यातील जमिनीमध्ये स्फूरद , पालाश भरपूर, तर सेंद्रिय कर्ब मध्यम आहे. शिराळा तालुक्यातील जमिनीमध्ये स्फूरद भरपूर, तर पालाश, सेंद्रिय कर्ब मध्यम आहे. पलूस तालुक्यातील जमिनीमध्ये स्फूरद, पालाश भरपूर, तर सेंद्रिय कर्ब मध्यम आहे.

मिरज तालुक्यातील जमिनीमध्ये स्फूरद, पालाश भरपूर असून सेंद्रिय कर्ब मध्यम आहे. वाळवा तालुक्यात नत्र कमी, तर स्फूरद, पालाश, सेंद्रिय कर्ब भरपूर आहे. खानापूर तालुक्यात स्फूरद भरपूर, तर पालाश, सेंद्रिय कर्ब मध्यम आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील जमिनीमध्ये स्फूरद भरपूर, तर पालाश, सेंद्रिय कर्ब मध्यम आहे. कडेगाव तालुक्यात स्फूरद भरपूर आणि पालाश, सेंद्रिय कर्ब मध्यम आहे, तर जत तालुक्यात स्फूरद मध्यम, पालाश भरपूर व सेंद्रिय कर्ब कमी असल्याचे कृषी अधिकाºयांनी सांगितले.कीटकनाशक फवारणीमुळे होणारे नुकसान...शेतकरी रासायनिक खतांचा वापर अधिक प्रमाणात करतात. त्यामुळे सुपीक शेतजमीन आता क्षारपड होण्याच्या मार्गावर आहे. महागड्या कीटकनाशकांचा वापर होऊ लागला आहे. यामुळे उपयोगी वनस्पती व जमिनीतील पोषक तत्त्वे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, असे कृषितज्ज्ञांनी सांगितले आहे.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी