शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

जिल्ह्यातील चार तालुक्यात क्षारपडचे प्रमाण वाढले -शेतकऱ्यांमध्ये जागृतीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 00:06 IST

उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर होत असल्याने, जमिनीतील मुख्य पोषक तत्त्वेच नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. भविष्यात शेती क्षारपड होण्याची शक्यता दिसत आहे.

ठळक मुद्देरासायनिक खतांचा परिणाम : जमिनीतील पोषक तत्त्वे होताहेत गायब

सांगली : उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर होत असल्याने, जमिनीतील मुख्य पोषक तत्त्वेच नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. भविष्यात शेती क्षारपड होण्याची शक्यता दिसत आहे. मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर आणि रासायनिक खतांच्या जादा वापरामुळे चार तालुक्यांतील जमीन क्षारपड झाली आहे.

पीक चांगले राहण्याकरिता आता रासायनिक खतांचा भरमसाट वापर करतात. त्यामुळे शेतजमिनीचा पोतच खालावत आहे. सोबतच जमिनीतील अत्यंत सुपीक आणि पोषक तत्त्वे नष्ट होत आहेत. पशुधन घटल्याने शेणखत उपलब्ध होत नाही. त्यामुळेही रासायनिक खतांचा वापर वाढला आहे.शासकीय माती परीक्षण प्रयोगशाळेतर्फे जिल्ह्यातील तीन लाख ११ हजार ११७ शेतकऱ्यांना माती परीक्षण करुन जमिनीच्या आरोग्यपत्रिका दिल्या आहेत. पलूस, वाळवा, मिरज, तासगाव तालुक्यातील जवळपास एक लाखाहून शेतकºयांची एकर जमीन अधिक पाणी आणि रासायनिक खतांच्या जादा वापरामुळे क्षारपड झाली आहे.

आटपाडी, तासगाव, शिराळा, पलूस, मिरज, वाळवा, खानापूर, कवठेमहांकाळ, कडेगाव, जत या दहा तालुक्यातील जमिनीमध्ये नत्र कमी आहे. आटपाडी तालुक्यातील जमिनीमध्ये स्फूरद मध्यम, पालाश भरपूर आणि सेंद्रिय कर्बचे प्रमाण कमी आहे. तासगाव तालुक्यातील जमिनीमध्ये स्फूरद , पालाश भरपूर, तर सेंद्रिय कर्ब मध्यम आहे. शिराळा तालुक्यातील जमिनीमध्ये स्फूरद भरपूर, तर पालाश, सेंद्रिय कर्ब मध्यम आहे. पलूस तालुक्यातील जमिनीमध्ये स्फूरद, पालाश भरपूर, तर सेंद्रिय कर्ब मध्यम आहे.

मिरज तालुक्यातील जमिनीमध्ये स्फूरद, पालाश भरपूर असून सेंद्रिय कर्ब मध्यम आहे. वाळवा तालुक्यात नत्र कमी, तर स्फूरद, पालाश, सेंद्रिय कर्ब भरपूर आहे. खानापूर तालुक्यात स्फूरद भरपूर, तर पालाश, सेंद्रिय कर्ब मध्यम आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील जमिनीमध्ये स्फूरद भरपूर, तर पालाश, सेंद्रिय कर्ब मध्यम आहे. कडेगाव तालुक्यात स्फूरद भरपूर आणि पालाश, सेंद्रिय कर्ब मध्यम आहे, तर जत तालुक्यात स्फूरद मध्यम, पालाश भरपूर व सेंद्रिय कर्ब कमी असल्याचे कृषी अधिकाºयांनी सांगितले.कीटकनाशक फवारणीमुळे होणारे नुकसान...शेतकरी रासायनिक खतांचा वापर अधिक प्रमाणात करतात. त्यामुळे सुपीक शेतजमीन आता क्षारपड होण्याच्या मार्गावर आहे. महागड्या कीटकनाशकांचा वापर होऊ लागला आहे. यामुळे उपयोगी वनस्पती व जमिनीतील पोषक तत्त्वे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, असे कृषितज्ज्ञांनी सांगितले आहे.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी