शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

कृषी पदवीधराची धडपड; दुष्काळी आटपाडीत फुलविला 'स्ट्रॉबेरी'चा मळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 15:39 IST

सांगली : दुष्काळी आटपाडीमध्ये पारंपरिक शेतीमध्ये पीक बदल करत अक्षय सागर यांनी स्ट्रॉबेरी लागवडीचे धाडस केले आहे. केशर आंब्याच्या ...

सांगली : दुष्काळी आटपाडीमध्ये पारंपरिक शेतीमध्ये पीक बदल करत अक्षय सागर यांनी स्ट्रॉबेरी लागवडीचे धाडस केले आहे. केशर आंब्याच्या बागेत आंतरपीक म्हणून स्ट्रॉबेरी घेतली असून उत्तम पद्धतीचे पीक आले आहे.

कृषी पदवीधर असलेल्या अक्षय सागर यांनी आटपाडी येथील सागरमळ्यात ३५ गुंठ्यात मल्चिंग व ठिबक सिंचनावर बेड पद्धतीने ‘आर वन’ जातीची स्ट्रॉबेरी लावली आहे. त्यांनी दि. २५ ऑक्टोबरला महाबळेश्वरातील शेतकऱ्यांकडून मदर प्लांट (रनर्स ) पासून केलेल्या २२०० स्ट्रॉबेरी रोपांची केशर आंब्यात आंतरपीक म्हणून लागवड केली आहे. शेणखत, रासायनिक खताचा वापर केला असून पीक उत्तम दर्जाचे आहे.

ऑगस्ट ते ऑक्टोबरदरम्यान स्ट्रॉबेरीची लागवड करणे योग्य ठरते. लागण केल्यापासून दीड महिन्यात उत्पन्न सुरू होते. एका रोपास सरासरी एक ते दीड किलो उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. खर्च वजा जाता लाखभर रुपयांचे उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा अक्षय सागर यांनी व्यक्त केली.

लागवड पद्धत

-अधिक चांगला दर्जा मिळवण्याच्या उद्देशाने गादीवाफे तयार करताना शेणखताची मात्रा वाढवली.

-मल्चिंग आणि ठिबक सिंचनाच्या वापरावर लागवड

-दरवर्षी साधारण ऑक्टोबर महिन्यात लागवड

-ऑक्टोबरमध्ये लागवड केल्यानंतर ४५ ते ६० दिवसांत उत्पादन सुरू होते.

उत्पादन खर्च

-३५ गुंठे क्षेत्र

-आर वन वाणाची २२०० रोपे - १० रुपये प्रतिरोप याप्रमाणे २२ हजार रुपये

-मल्चिंग - ५ हजार रुपये

-ट्रॅक्टरद्वारे मशागत - ४ हजार रुपये

-बेड निर्मिती, लागवड, मजुरी - १५ हजार रुपये

-विद्राव्य खते - ५ हजार रुपये

असे मिळते उत्पन्न

ऑक्टोबरमध्ये लागवड केल्यानंतर डिसेंबरपासून उत्पादन सुरू होते. पुढे दीड महिना दिवसाआड ६० ते ९० किलो उत्पादन मिळते. फेब्रुवारी ते मार्चपर्यंत प्रतिदिन सरासरी ४० किलो तर एप्रिलमध्ये उत्पादन कमी होत २० किलोपर्यंत मिळते. स्ट्रॉबेरीच्या दरामध्ये चढउतार प्रचंड असतात. प्रतिकिलो ७० ते २०० रुपयांपर्यंत दर मिळतो. एकूण उत्पादनातील ५० टक्के फळांना १५० रुपये, ३० टक्के फळांना ७० रुपये असा दर मिळतो. एकरात तीन ते चार लाख रुपये उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे, असेही अक्षय सागर यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगलीdroughtदुष्काळFarmerशेतकरी