शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

विधानसभा निवडणुकीनंतर सांगली जिल्ह्यात २८६५४ मतदार वाढले; पुरुष की महिला, सर्वाधिक संख्या कोणाची.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 17:52 IST

ऑनलाईन नोंदणीमुळे मतदार संख्या वाढली

सांगली : विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात मागील चार महिन्यांत तब्बल २८ हजार ६५४ मतदारांची वाढ झाली आहे. यात सर्वाधिक महिला मतदार १७ हजार १०३ वाढले आहेत. विधानसभेवेळी जिल्ह्यात २५ लाख ३६ हजार ६५ मतदार होते. यामध्ये २८ हजार ६५४ मतदारांची वाढ होऊन जुलै २०२५ पर्यंत २५ लाख ६४ हजार ७१९ मतदार नोंदणी झाली आहे. मतदार नोंदणी ही निरंतन चालणारी प्रक्रिया असल्याने निवडणूक विभागाकडून नवमतदारांची नोंदणी, स्थलांतरित, मयत मतदारांनी नावे यादीतून काढून टाकणे ही नियमित कामे केली जात आहेत.गतवर्षी जिल्ह्यात झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मतदार जागृती अभियान राबविण्यात आले. त्यामुळे १८ ते १९ वयोगटातील नवमतदारांची संख्या लक्षणीय वाढली. तसेच २० ते २९, २९ ते ४० या वयोगटातील मतदारही वाढले. विधानसभा निवडणुकीवेळी जिल्ह्यात २५ लाख ३६ हजार ६५ मतदार होते. यामध्ये २८ हजार ६५४ मतदार वाढले आहेत. यामध्ये पुरुष मतदार ११ हजार ५५४ आणि महिला मतदार १७ हजार १०३ वाढले आहेत. या नवीन मतदारांना आगामी जिल्हा परिषद, महापालिका आणि नगरपालिका निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

जिल्ह्यात गेल्या दहा महिन्यांत वाढलेले मतदार

विधानसभा मतदारसंघ - नोव्हेंबर २०२४ / जुलै २०२५ मिरज - ३४३८७६  / ३४९३१७            सांगली - ३५६४१० / ३६१७५२इस्लामपूर - २८०८५६ / २८३०६२            शिराळा - ३०७०१२ /  ३०९४७३पलूस-कडेगाव - २९२८६६ / २९४२६७खानापूर -  ३५०९९६ / ३५५२६२तासगाव-कवठेमहांकाळ - ३१२६८६ / ३१५८६८            जत - २९१३६३ / २९५७१८एकूण -  २५३६०६५ / २५६४७१९

युवा मतदारांची वाढविधानसभेला १५० तृतीयपंथी मतदार होते. गेल्या आठ महिन्यांत तीन तृतीयपंथी मतदार कमी होऊन सध्या १४७ संख्या झाली आहे. तसेच वाढलेल्या मतदानात बहुतांशी युवा मतदारांचा समावेश आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना झालेली ही वाढ पुन्हा चर्चेचा विषय झाली आहे.

मतदार नोंदणी ही निरंतन चालणारी प्रक्रिया असल्याने निवडणूक विभागाकडून नवमतदारांची नोंदणी, स्थलांतरित, मयत मतदारांनी नावे यादीतून काढून टाकणे ही नियमित कामे केली जात आहेत. मतदार नोंदणी अखंडित चालूच आहे. यामुळेच मतदार संख्या वाढल्याचे दिसत आहे. - नीता शिंदे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक), सांगली