टाकळीतील गटारीचे काम पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर उपोषण मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:29 IST2021-09-21T04:29:31+5:302021-09-21T04:29:31+5:30
टाकळी येथे महामार्गाचे काम सुरू आहे. गावातून जाणाऱ्या रस्त्याचे काम सहा महिन्यांपासून रखडले आहे. रस्ता खोदण्यात आल्याने खडीवरून वाहने ...

टाकळीतील गटारीचे काम पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर उपोषण मागे
टाकळी येथे महामार्गाचे काम सुरू आहे. गावातून जाणाऱ्या रस्त्याचे काम सहा महिन्यांपासून रखडले आहे. रस्ता खोदण्यात आल्याने खडीवरून वाहने घसरून अपघात झाले आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुरू गटारीचे कामही चार महिन्यांपासून रखडले आहे. गटारीसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. ते काम आराखड्यानुसार झाले नसून रस्त्याच्या एका बाजूला तीन फूट व एका बाजूला पाच फूट गटार बांधण्यात आले आहे. त्यामुळे या कामाची चौकशी करावी, अशी मागणी करीत टाकळी ग्रामपंचायत सदस्य सुनील गुळवणे यांनी बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. उपअभियंता अण्णासाहेब वाघ यांनी ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी लिंबाजी पवार यांच्याशी चर्चा केली. आठ दिवसात काम पूर्ण करण्याचे गुळवणे यांना आश्वासन दिले. त्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी गटारीची लांबी वाढवण्याची मागणी पंचायत समिती सदस्य किरण बंडगर, सुनील पाटील, सचिन पाटील, अभिजीत पाटील, धनराज सातपुते व राजकुमार पाटील यांनी केली.