शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
2
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
4
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
5
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
6
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
7
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
8
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
9
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
10
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
11
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
12
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
13
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
14
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
15
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
16
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
17
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
18
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
19
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
20
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
Daily Top 2Weekly Top 5

आमदार गाडगीळांच्या आश्वासनानंतर महापूर नियंत्रण कृती समितीचे उपोषण मागे, मुख्यमंत्री बैठक घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 13:25 IST

पूरप्रश्नावर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे. या प्रश्नावर समितीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेण्यासाठी तयार

सांगली : कृष्णा नदीच्या पुरापासून सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांची सुटका होण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी मी पुढाकार घेणार आहे. तसेच या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक घेण्याचे आश्वासन आमदार सुधीर गाडगीळ यांनी सांगलीत आंदोलकांना दिले. त्यानंतर मंगळवारी सायंकाळी साखळी उपोषण आंदोलकांनी मागे घेतले.कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पुराच्या प्रश्नावर महापालिका, जलसंपदा विभाग काहीच उपाययोजना करत नाही. पुणे येथे उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतील मुद्द्यांची अंमलबजावणीही प्रशासन करत नाही. या प्रश्नाकडे राज्य शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी सांगलीतील गणपती मंदिरासमोर सोमवारपासून साखळी उपोषण सुरू होते. मंगळवारी आ. गाडगीळ यांनी आंदोलकांना कृष्णा नदीचा महापूर रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल.पूरप्रश्नावर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे. या प्रश्नावर समितीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेण्यासाठी ते तयार आहेत. साखळी उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती त्यांनी आंदोलकांना केली. या आश्वासनानंतर आंदोलन काही काळासाठी स्थगित करत आहोत, अशी माहिती कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील व निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण यांनी दिली.मंगळवारच्या आंदोलनात प्रदीप वायचळ, सतीश रांजणे, संजय कोरे, दत्तात्रय जगदाळे, आप्पासो कदम, वीरचंद पाटील, बंडू होगले, वैभव शिरट्टी, संभाजी शिंदे, बाबालाल शहा, सुरेश हरळीकर, दिनकर पवार, सदाशिव मिठारी, बबलू साळसकर, मोहन जामदार, अमरसिंग माने आदी उपस्थित होते.

आपत्ती व्यवस्थापनाचा निधी अन्यत्र खर्च : प्रभाकर केंगारमहापालिका नैसर्गिक आपत्तीचा निधी अन्यत्र खर्च करत आहेत. नैसर्गिक नाले बुजविले जात असूनही त्यांच्यावर कारवाई होत नाही. जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांचे पदच रिक्त असल्यामुळे तेथील कामकाजही ठप्प आहे. याकडेही शासनाने लक्ष देण्याची गरज आहे, असे मत निवृत्त अभियंता प्रभाकर केंगार यांनी व्यक्त केले.

मेधा पाटकर यांचा आंदोलनास पाठिंबा

नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी सांगलीतील आंदोलकांशी चर्चा करून आपण सुरू केलेल्या आंदोलनास माझा पाठिंबा आहे. पूरग्रस्तांचा प्रश्न मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर मांडण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीमध्ये अलमट्टीसह पश्चिम महाराष्ट्रातील धरणे १५ ऑक्टोबरपर्यंत १०० टक्के भरू नयेत, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येईल, असे आश्वासन पाटकर यांनी आंदोलकांना दिले.

टॅग्स :SangliसांगलीfloodपूरEknath Shindeएकनाथ शिंदेSudhir Gadgilसुधीर गाडगीळ