शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

आमदार गाडगीळांच्या आश्वासनानंतर महापूर नियंत्रण कृती समितीचे उपोषण मागे, मुख्यमंत्री बैठक घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 13:25 IST

पूरप्रश्नावर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे. या प्रश्नावर समितीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेण्यासाठी तयार

सांगली : कृष्णा नदीच्या पुरापासून सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांची सुटका होण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी मी पुढाकार घेणार आहे. तसेच या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक घेण्याचे आश्वासन आमदार सुधीर गाडगीळ यांनी सांगलीत आंदोलकांना दिले. त्यानंतर मंगळवारी सायंकाळी साखळी उपोषण आंदोलकांनी मागे घेतले.कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पुराच्या प्रश्नावर महापालिका, जलसंपदा विभाग काहीच उपाययोजना करत नाही. पुणे येथे उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतील मुद्द्यांची अंमलबजावणीही प्रशासन करत नाही. या प्रश्नाकडे राज्य शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी सांगलीतील गणपती मंदिरासमोर सोमवारपासून साखळी उपोषण सुरू होते. मंगळवारी आ. गाडगीळ यांनी आंदोलकांना कृष्णा नदीचा महापूर रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल.पूरप्रश्नावर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे. या प्रश्नावर समितीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेण्यासाठी ते तयार आहेत. साखळी उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती त्यांनी आंदोलकांना केली. या आश्वासनानंतर आंदोलन काही काळासाठी स्थगित करत आहोत, अशी माहिती कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील व निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण यांनी दिली.मंगळवारच्या आंदोलनात प्रदीप वायचळ, सतीश रांजणे, संजय कोरे, दत्तात्रय जगदाळे, आप्पासो कदम, वीरचंद पाटील, बंडू होगले, वैभव शिरट्टी, संभाजी शिंदे, बाबालाल शहा, सुरेश हरळीकर, दिनकर पवार, सदाशिव मिठारी, बबलू साळसकर, मोहन जामदार, अमरसिंग माने आदी उपस्थित होते.

आपत्ती व्यवस्थापनाचा निधी अन्यत्र खर्च : प्रभाकर केंगारमहापालिका नैसर्गिक आपत्तीचा निधी अन्यत्र खर्च करत आहेत. नैसर्गिक नाले बुजविले जात असूनही त्यांच्यावर कारवाई होत नाही. जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांचे पदच रिक्त असल्यामुळे तेथील कामकाजही ठप्प आहे. याकडेही शासनाने लक्ष देण्याची गरज आहे, असे मत निवृत्त अभियंता प्रभाकर केंगार यांनी व्यक्त केले.

मेधा पाटकर यांचा आंदोलनास पाठिंबा

नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी सांगलीतील आंदोलकांशी चर्चा करून आपण सुरू केलेल्या आंदोलनास माझा पाठिंबा आहे. पूरग्रस्तांचा प्रश्न मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर मांडण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीमध्ये अलमट्टीसह पश्चिम महाराष्ट्रातील धरणे १५ ऑक्टोबरपर्यंत १०० टक्के भरू नयेत, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येईल, असे आश्वासन पाटकर यांनी आंदोलकांना दिले.

टॅग्स :SangliसांगलीfloodपूरEknath Shindeएकनाथ शिंदेSudhir Gadgilसुधीर गाडगीळ