शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
5
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
6
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
7
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
8
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
9
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
10
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
11
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
12
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
13
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
14
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
15
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
16
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
17
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
18
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
19
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
20
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले

आमदार गाडगीळांच्या आश्वासनानंतर महापूर नियंत्रण कृती समितीचे उपोषण मागे, मुख्यमंत्री बैठक घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 13:25 IST

पूरप्रश्नावर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे. या प्रश्नावर समितीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेण्यासाठी तयार

सांगली : कृष्णा नदीच्या पुरापासून सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांची सुटका होण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी मी पुढाकार घेणार आहे. तसेच या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक घेण्याचे आश्वासन आमदार सुधीर गाडगीळ यांनी सांगलीत आंदोलकांना दिले. त्यानंतर मंगळवारी सायंकाळी साखळी उपोषण आंदोलकांनी मागे घेतले.कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पुराच्या प्रश्नावर महापालिका, जलसंपदा विभाग काहीच उपाययोजना करत नाही. पुणे येथे उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतील मुद्द्यांची अंमलबजावणीही प्रशासन करत नाही. या प्रश्नाकडे राज्य शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी सांगलीतील गणपती मंदिरासमोर सोमवारपासून साखळी उपोषण सुरू होते. मंगळवारी आ. गाडगीळ यांनी आंदोलकांना कृष्णा नदीचा महापूर रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल.पूरप्रश्नावर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे. या प्रश्नावर समितीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेण्यासाठी ते तयार आहेत. साखळी उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती त्यांनी आंदोलकांना केली. या आश्वासनानंतर आंदोलन काही काळासाठी स्थगित करत आहोत, अशी माहिती कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील व निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण यांनी दिली.मंगळवारच्या आंदोलनात प्रदीप वायचळ, सतीश रांजणे, संजय कोरे, दत्तात्रय जगदाळे, आप्पासो कदम, वीरचंद पाटील, बंडू होगले, वैभव शिरट्टी, संभाजी शिंदे, बाबालाल शहा, सुरेश हरळीकर, दिनकर पवार, सदाशिव मिठारी, बबलू साळसकर, मोहन जामदार, अमरसिंग माने आदी उपस्थित होते.

आपत्ती व्यवस्थापनाचा निधी अन्यत्र खर्च : प्रभाकर केंगारमहापालिका नैसर्गिक आपत्तीचा निधी अन्यत्र खर्च करत आहेत. नैसर्गिक नाले बुजविले जात असूनही त्यांच्यावर कारवाई होत नाही. जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांचे पदच रिक्त असल्यामुळे तेथील कामकाजही ठप्प आहे. याकडेही शासनाने लक्ष देण्याची गरज आहे, असे मत निवृत्त अभियंता प्रभाकर केंगार यांनी व्यक्त केले.

मेधा पाटकर यांचा आंदोलनास पाठिंबा

नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी सांगलीतील आंदोलकांशी चर्चा करून आपण सुरू केलेल्या आंदोलनास माझा पाठिंबा आहे. पूरग्रस्तांचा प्रश्न मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर मांडण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीमध्ये अलमट्टीसह पश्चिम महाराष्ट्रातील धरणे १५ ऑक्टोबरपर्यंत १०० टक्के भरू नयेत, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येईल, असे आश्वासन पाटकर यांनी आंदोलकांना दिले.

टॅग्स :SangliसांगलीfloodपूरEknath Shindeएकनाथ शिंदेSudhir Gadgilसुधीर गाडगीळ