शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

वसंतदादा घराण्याच्या हाती २० वर्षांनंतर पुन्हा बंडाचा झेंडा

By अविनाश कोळी | Updated: April 24, 2024 12:23 IST

दादा घराण्यातील बंडाची ही दुसरी घटना सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेत आली

अविनाश कोळीसांगली : विधानसभेच्या २००४ च्या निवडणुकीत वसंतदादांचे नातू मदन पाटील यांनी काँग्रेस आघाडीविरोधात प्रथमच बंडखोरीची नोंद केली होती. वसंतदादा घराण्यात त्यापूर्वी कुणीही पक्ष किंवा आघाडीविरोधात बंड केले नव्हते. त्यानंतर २० वर्षांनी पुन्हा लोकसभा निवडणुकीत वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांनी आघाडीविरोधात पुन्हा बंड पुकारले आहे. दादा घराण्यातील बंडाची ही दुसरी घटना सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेत आली आहे.सांगली लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीत सोमवारी विशाल पाटील यांचे बंड कायम राहिले. त्यांच्या बंडामुळे वीस वर्षांपूर्वीच्या सांगली विधानसभा निवडणुकीच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत यंदाच्या घटना व २००४ च्या घटनांमध्ये बरेच साम्य आहे. मदन पाटील त्यावेळी राष्ट्रवादीत होते. आघाडीच्या जागावाटपात ही जागा काँग्रेसला गेली. त्यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत पक्षाच्या नावाचा फलक काढून टाकला होता.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीकडून ही जागा उद्धवसेनेला सोडण्यात आल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या फलकाला पांढरा रंग फासला होता. २००४ प्रमाणेच बंडखोरी थांबविण्यासाठी मनधरणीच्या कहाण्या यंदाही नोंदल्या गेल्या. वसंतदादा घराण्यातील व्यक्तींनी २००४ पूर्वी पक्षीय आदेश पाळले होते. पक्षाचे दोरही याच घराण्याकडे असल्यामुळे बंड करण्याची वेळ कधीही दादा घराण्यावर आली नव्हती.

२००४ नंतर राजकीय समीकरणे बदलत गेली. विधानसभेच्या निवडणुकीत बंड करून मदन पाटील यांनी अपक्ष म्हणून नव्या चिन्हासह निवडणूक लढविली. तशीच परिस्थिती २०२४च्या लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांच्याबाबतीत निर्माण झाली आहे. त्यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवार म्हणून शड्डू ठोकला आहे.. त्यांनाही नव्या चिन्हासह ही निवडणूक लढवावी लागत आहे.

लोकसभेला प्रथमच बंडखोरीसांगली लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात कधीही काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्याची नोंद नाही. या मतदारसंघावर सर्वाधिक काळ काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. २०१९च्या निवडणुकीतही काँग्रेसला जागा मिळाली नसल्याने विशाल पाटील बंडखोरीच्या तयारीत होते. मात्र, येथील जागा ज्या पक्षाला गेली, त्या स्वाभिमानी शेतकरी पक्षाने त्यांनाच उमेदवारी दिल्याने वादावर पडदा पडला होता.२००४ च्या बंडखोरीला यशसांगली लोकसभेच्या इतिहासात आजवर २००९ व १९९६च्या लढतीतच अपक्ष उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिला. या मतदारसंघातून कधीही अपक्ष उमेदवार निवडून आलेला नाही. २००४च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीही सांगली विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासात कधीही अपक्ष विजयी झाला नव्हता. मदन पाटील यांच्या माध्यमातून ही परंपरा मोडीत निघाली होती. मात्र, २००४ नंतरच्या निवडणुकांत अपक्ष उमेदवारांना यश मिळालेले नाही.

टॅग्स :Sangliसांगलीsangli-pcसांगलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४vishal patilविशाल पाटीलVasantdada Patilवसंतदादा पाटील