शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

‘टेंभू’च्या ७ हजार ३७० कोटींच्या सुधारित खर्चास प्रशासकीय मान्यता, हिवाळी अधिवेशनात मंजुरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2023 11:50 IST

मंजुरीनंतर जल्लोष अन् राजकीय श्रेयवादही

सांगली/नागपूर : टेंभू उपसा सिंचन योजनेमध्ये खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ, जत तालुक्यातील वंचित ५३ गावांचा नव्याने समावेश झाल्यामुळे योजनेचा सुधारित खर्च सात हजार ३७० कोटींवर गेला आहे. या सुधारित खर्चाला राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी प्रशासकीय मान्यता दिली. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार टेंभू सिंचन योजनेवर आजअखेर तीन हजार ४०० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. तसेच, तीन हजार ७०० कोटी रुपयांच्या खर्चास शासनाची मंजुरी मिळाली आहे. पण, खानापूर तालुक्यातील १५, आटपाडी १३, तासगाव १३, कवठेमहांकाळ ८ आणि जत ४ अशी ५३ गावे टेंभू योजनेच्या पाण्यापासून वंचित राहिली होती. त्यामुळे जलसंपदा विभागाने वंचित ५३ गावांना पाणी देण्यासाठीचा सुधारित सात हजार ४७५ कोटी रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला होता. हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.

१.२१ लाख हेक्टर शेती पाण्याखाली येणारया मंजुरीमुळे सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील तब्बल एक लाख २१ हजार ४७५ हेक्टर शेतीला पाणी मिळणार आहे. यासाठी अतिरिक्त ८ टीएमसी पाणी लागणार आहे. या योजनेंतर्गत माण-खटाव तालुक्यांसाठी २.५ टीएमसी, सांगली जिल्ह्यासाठी ४.५ टीएमसी आणि सांगोला तालुक्यासाठी एक टीएमसी जादा मिळणार आहे. या सुधारित खर्चासह अतिरिक्त आठ टीएमसीच्या पाण्यासही केंद्र आणि राज्य शासनाकडून मंजुरी मिळाली आहे.

मंजुरीनंतर जल्लोष अन् राजकीय श्रेयवादहीटेंभू योजनेच्या खर्चास सुधारित प्रशासकीय मंजुरी गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मिळाल्यानंतर भाजपचे खासदार संजय पाटील, शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्या समर्थकांनी विटा शहरात एकच जल्लोष केला. या दोन्ही नेत्यांच्या आटपाडी, तासगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्येही सोशल माध्यमांवर श्रेयवादाचे राजकारण चांगलेच पेटले होते.

टॅग्स :SangliसांगलीWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन