शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

‘टेंभू’च्या ७ हजार ३७० कोटींच्या सुधारित खर्चास प्रशासकीय मान्यता, हिवाळी अधिवेशनात मंजुरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2023 11:50 IST

मंजुरीनंतर जल्लोष अन् राजकीय श्रेयवादही

सांगली/नागपूर : टेंभू उपसा सिंचन योजनेमध्ये खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ, जत तालुक्यातील वंचित ५३ गावांचा नव्याने समावेश झाल्यामुळे योजनेचा सुधारित खर्च सात हजार ३७० कोटींवर गेला आहे. या सुधारित खर्चाला राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी प्रशासकीय मान्यता दिली. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार टेंभू सिंचन योजनेवर आजअखेर तीन हजार ४०० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. तसेच, तीन हजार ७०० कोटी रुपयांच्या खर्चास शासनाची मंजुरी मिळाली आहे. पण, खानापूर तालुक्यातील १५, आटपाडी १३, तासगाव १३, कवठेमहांकाळ ८ आणि जत ४ अशी ५३ गावे टेंभू योजनेच्या पाण्यापासून वंचित राहिली होती. त्यामुळे जलसंपदा विभागाने वंचित ५३ गावांना पाणी देण्यासाठीचा सुधारित सात हजार ४७५ कोटी रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला होता. हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.

१.२१ लाख हेक्टर शेती पाण्याखाली येणारया मंजुरीमुळे सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील तब्बल एक लाख २१ हजार ४७५ हेक्टर शेतीला पाणी मिळणार आहे. यासाठी अतिरिक्त ८ टीएमसी पाणी लागणार आहे. या योजनेंतर्गत माण-खटाव तालुक्यांसाठी २.५ टीएमसी, सांगली जिल्ह्यासाठी ४.५ टीएमसी आणि सांगोला तालुक्यासाठी एक टीएमसी जादा मिळणार आहे. या सुधारित खर्चासह अतिरिक्त आठ टीएमसीच्या पाण्यासही केंद्र आणि राज्य शासनाकडून मंजुरी मिळाली आहे.

मंजुरीनंतर जल्लोष अन् राजकीय श्रेयवादहीटेंभू योजनेच्या खर्चास सुधारित प्रशासकीय मंजुरी गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मिळाल्यानंतर भाजपचे खासदार संजय पाटील, शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्या समर्थकांनी विटा शहरात एकच जल्लोष केला. या दोन्ही नेत्यांच्या आटपाडी, तासगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्येही सोशल माध्यमांवर श्रेयवादाचे राजकारण चांगलेच पेटले होते.

टॅग्स :SangliसांगलीWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन