शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

कर्नाटकातील हिप्परगी, अलमट्टीतील बेकायदेशीर पाणीसाठ्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; महापूर नियंत्रण समितीचा आरोप 

By अशोक डोंबाळे | Updated: July 13, 2024 18:56 IST

सांगली, कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याविरोधात याचिका दाखल करणार

सांगली : कर्नाटकातील अलमट्टी धरण आणि कृष्णा नदीवरील हिप्परगी बंधाऱ्यामध्ये नियमबाह्य पाण्याचा साठा केला आहे. त्याकडे सांगली व कोल्हापूर जिल्हाधिकारी आणि जलसंपदाचे कार्यकारी अभियंता पूर्ण दुर्लक्ष करीत आहेत. या अधिकाऱ्यांची भूमिका कृष्णा, वारणा, पंचगंगा नद्यांना महापूर येण्याच्यादृष्टीने आहे. म्हणून त्यांना नोटिसा दिल्या असून, भविष्यात त्यांच्याविरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहे, अशी माहिती कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील व सेवानिवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण यांनी शनिवारी सांगलीतील पत्रकार परिषदेत दिली.सर्जेराव पाटील, सेवानिवृत्त अभियंता म्हणाले, कृष्णा महापूर नियंत्रण कृती समिती आणि आंदोलन अंकुश या संघटनांतर्फे ॲड. ओंकार वांगीकर यांनी ही नोटीस दिली आहे. जिल्हा प्रशासन, जलसंपदा विभागाला महापुराच्या संकटाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल कायदेशीर नोटीस दिली आहे. दोन्ही जिल्ह्यांतील जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता यांना वारंवार पत्रे, सूचना पत्रे, इशारा पत्रे दिली आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक व्हिडीओ कॉन्फरन्स घेऊन दोन्ही जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना कर्नाटकातील जलसंपदा विभागाबरोबर व प्रशासनाबरोबर समन्वय ठेवा, अशी सूचना दिली होती. अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधारा येथील पाण्याची पातळी केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ठेवली जात आहे की नाही, याकडे बारकाईने लक्ष ठेवा. तसे आढळले नाही तर तातडीने कर्नाटक प्रशासनाशी संपर्क साधून पाण्याची पातळी कमी करायचा आग्रह धरण्याची सूचना मुख्यमंत्री शिदे यांनी दिली होती. परंतु दोन्ही जिल्ह्यांतील जिल्हा प्रशासन, कार्यकारी अभियंता यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे, असे स्पष्ट दिसत आहे. म्हणूनच कर्नाटकातील अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधाऱ्यात पाणीसाठा नियमबाह्यरीत्या वाढतच आहे. पावसाचे प्रमाण यापुढे वाढत जाणार आहे. साहजिकच कृष्णा खोऱ्यातील कोयना, वारणा, राधानगरीसह सर्वच धरणांतून पाण्याचा विसर्गही वाढवावा लागणार आहे. त्यामुळे महापुराचा सांगली व कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांना फटका बसणार आहे. म्हणून कोल्हापूर, सांगली जिल्हा प्रशासन, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता यांना नोटिसा बजावल्या आहेत. यातूनही त्यांनी महापूर रोखण्यासाठी उपाययोजना केल्या नाही तर त्यांच्याविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात येईल, असा इशाराही महापूर नियंत्रण समितीचे सर्जेराव पाटील यांनी दिला आहे.

१५ ऑगस्टपर्यंत कसोटीचा काळकृष्णा खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात आता पावसाचा जोर हळूहळू वाढत आहे. १५ जुलै ते १५ ऑगस्ट हा अत्यंत कसोटीचा काळ आहे. आतापासूनच जिल्हा प्रशासनाने, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील कार्यकारी अभियंत्यांनी याबाबत तातडीने हालचाल करणे गरजेचे आहे, अशी मागणी सेवानिवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण यांनी केली.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसKarnatakकर्नाटकDamधरणfloodपूर