शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

Lok Sabha Election 2019 साडेतीनशे मतांसाठीही यंदा प्रशासनाची तयारी; शेड्याळ गावात कमी मतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 11:28 PM

सांगली : लोकशाही अधिक सुदृढ होण्यासाठी मतदार यादीत नाव असलेल्या प्रत्येकाने मतदान करावे, यासाठी प्रशासनाने मोहीम राबविली आहे. त्यानुसार ...

सांगली : लोकशाही अधिक सुदृढ होण्यासाठी मतदार यादीत नाव असलेल्या प्रत्येकाने मतदान करावे, यासाठी प्रशासनाने मोहीम राबविली आहे. त्यानुसार मतदान केंद्राची निर्मिती करताना त्याठिकाणी किती मतदार आहेत, यापेक्षा तेथील प्रत्येक मतदाराला मतदान करता येईल, यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे. कमी मतदार असले तरी त्याठिकाणी आवश्यक यंत्रणा राबविण्यात येणार आहेच.या मतदान केंद्रात कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असून, स्थानिक मतदारांना सुविधा तेथेच मतदान करता येणार आहे. सांगली लोकसभा मतदारसंघातील सर्वच भागात कमी मतदार असलेली मतदान केंद्रे आहेत. जत, आटपाडी तालुक्यात अशी केंद्रे आहेत.काय आहे प्रशासनाचे नियोजन...सांगली लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला, तर यात जत व आटपाडी तालुक्यातील काही गावे व वाड्या वस्त्या या दळणवळणाच्यादृष्टीने अडचणीच्या आहेत. या दोन तालुक्यांबरोबरच इतरही तालुक्यात कमी मतदारसंख्या व वाहतुकीसाठीही अडचणीचा भाग आहे. कमी मतदार असलेल्या मतदान केंद्रांची माहिती घेतली असता, जत तालुक्यातील शेड्याळ या गावात सर्वाधिक कमी ३५० मतदार आहेत. जतपासून ४५ किलोमीटरवर असलेल्या शेड्याळला पाच्छापूरमार्गे जावे लागते. तालुक्यात सध्या दुष्काळाचे भयाण स्वरूप असल्याने या गावातही टंचाई परिस्थिती आहेच. अडचणी असतानाही या गावात इतक्या मतदारांसाठीही यंत्रणा उभारली आहे. केंद्र क्रमांक ७८ म्हणून या मतदान केंद्राची नोंद आहे. सुविधा मिळण्यास अडचणी असल्या तरी, मतदानास प्राधान्य दिले जात आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक