शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

दोन कारखान्यातील अंतराची अट रद्द करा, अन्यथा उसाला ५००० दर द्या - रघुनाथदादा पाटील 

By अशोक डोंबाळे | Updated: August 29, 2023 15:59 IST

शेतकरी संघटनेचा येत्या रविवारी पंढरपूरमध्ये शेतकरी मेळावा

सांगली : पश्चिम महाराष्ट्राच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या उसाला चांगला दर मिळायचा असेल तर केंद्र आणि राज्य सरकारने दोन साखर कारखान्यांमधील अंतराची अट तातडीने रद्द केली पाहिजे. जर सरकारला अंतराची अट रद्द करता येत नसेल तर उसाला प्रति टन पाच हजार रुपये दर पाहिजे. या प्रश्नावर रस्त्यावर आल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही. म्हणूनच धोरणात्मक लढा उभारण्यासाठी दि. ३ सप्टेंबर रोजी माजी खासदार शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर येथे शेतकरी मेळावा आयोजित केला आहे, अशी माहिती शेतकरी संघटना अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी दिली.रघुनाथदादा पाटील म्हणाले, सर्व शेतकऱ्यांना सर्व कर्जातून व वीज बिलातून मुक्त करणे हे शरद जोशींचे स्वप्न होते. पण ते स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. त्यांचे स्वप्न सत्यात आणण्यासाठी आमचा लढा राज्यात चालू असणार आहे. दोन साखर कारखान्यांमधील अंतराची अट रद्द करण्याची गरज आहे. सरकारला ही अंतराची अट रद्द करता येत नसेल तर उसाला प्रति टन पाच हजार रुपये दर दिलाच पाहिजे.

कांद्यावरील निर्यात शुल्कात वाढ करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आत्महत्येच्या दारात उभे केले आहे. कांद्याला प्रति किलो ५० रुपये दर द्या नाहीतर सर्व शेतीमालावरील निर्यात बंदी उठवा. भारतीय संविधानात नसलेला वन्य प्राणी संरक्षण कायदा हा शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीचा आहे. शेतीचे नुकसान करणाऱ्या प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वन्यप्राणी संरक्षण कायदा रद्द करणे. शेतीचा जोडधंदा दूध व्यवसाय उत्पादन खर्च पाहता म्हशीच्या दुधाला पेट्रोल प्रमाणे व गायीच्या दुधाला डिझेल प्रमाणे भाव मिळाला पाहिजे.या मेळाव्यात शेतकरी संघटना अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, कार्याध्यक्ष कालिदास आपेट, क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेड अध्यक्ष शिवाजी नांदखिले, उपाध्यक्ष ॲड. अजित काळे, भारत राष्ट्र समितीचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक बी. जे. देशमुख, सहसमन्वयक भगीरथ भालके मार्गदर्शन करणार आहेत.

कुळांना, आदिवासींना जमीनचे मालकी हक्क द्यावेतकुळांना व आदिवासींना जमीन मालकीचे हक्क सरकारने द्यावेत. तेलंगणा सरकारचा पॅटर्न महाराष्ट्रात लागू करावा. नदीचा व कालव्यांचा आकारण्यात येणारा पाझर कर सरकारच्या पाटबंधारे विभाग तत्काळ रद्द करावा, आदी विषयांवर या शेतकरी मेळाव्यात धोरणात्मक निर्णय घेऊन आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी