शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
2
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
3
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
4
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
5
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
6
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
7
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
8
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
9
कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
10
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
11
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
12
शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी मातेच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य; २०२६ ची होणार स्वप्नवत सुरुवात!
13
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
14
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
15
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
16
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
17
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
18
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
19
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
20
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दोन कारखान्यातील अंतराची अट रद्द करा, अन्यथा उसाला ५००० दर द्या - रघुनाथदादा पाटील 

By अशोक डोंबाळे | Updated: August 29, 2023 15:59 IST

शेतकरी संघटनेचा येत्या रविवारी पंढरपूरमध्ये शेतकरी मेळावा

सांगली : पश्चिम महाराष्ट्राच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या उसाला चांगला दर मिळायचा असेल तर केंद्र आणि राज्य सरकारने दोन साखर कारखान्यांमधील अंतराची अट तातडीने रद्द केली पाहिजे. जर सरकारला अंतराची अट रद्द करता येत नसेल तर उसाला प्रति टन पाच हजार रुपये दर पाहिजे. या प्रश्नावर रस्त्यावर आल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही. म्हणूनच धोरणात्मक लढा उभारण्यासाठी दि. ३ सप्टेंबर रोजी माजी खासदार शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर येथे शेतकरी मेळावा आयोजित केला आहे, अशी माहिती शेतकरी संघटना अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी दिली.रघुनाथदादा पाटील म्हणाले, सर्व शेतकऱ्यांना सर्व कर्जातून व वीज बिलातून मुक्त करणे हे शरद जोशींचे स्वप्न होते. पण ते स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. त्यांचे स्वप्न सत्यात आणण्यासाठी आमचा लढा राज्यात चालू असणार आहे. दोन साखर कारखान्यांमधील अंतराची अट रद्द करण्याची गरज आहे. सरकारला ही अंतराची अट रद्द करता येत नसेल तर उसाला प्रति टन पाच हजार रुपये दर दिलाच पाहिजे.

कांद्यावरील निर्यात शुल्कात वाढ करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आत्महत्येच्या दारात उभे केले आहे. कांद्याला प्रति किलो ५० रुपये दर द्या नाहीतर सर्व शेतीमालावरील निर्यात बंदी उठवा. भारतीय संविधानात नसलेला वन्य प्राणी संरक्षण कायदा हा शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीचा आहे. शेतीचे नुकसान करणाऱ्या प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वन्यप्राणी संरक्षण कायदा रद्द करणे. शेतीचा जोडधंदा दूध व्यवसाय उत्पादन खर्च पाहता म्हशीच्या दुधाला पेट्रोल प्रमाणे व गायीच्या दुधाला डिझेल प्रमाणे भाव मिळाला पाहिजे.या मेळाव्यात शेतकरी संघटना अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, कार्याध्यक्ष कालिदास आपेट, क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेड अध्यक्ष शिवाजी नांदखिले, उपाध्यक्ष ॲड. अजित काळे, भारत राष्ट्र समितीचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक बी. जे. देशमुख, सहसमन्वयक भगीरथ भालके मार्गदर्शन करणार आहेत.

कुळांना, आदिवासींना जमीनचे मालकी हक्क द्यावेतकुळांना व आदिवासींना जमीन मालकीचे हक्क सरकारने द्यावेत. तेलंगणा सरकारचा पॅटर्न महाराष्ट्रात लागू करावा. नदीचा व कालव्यांचा आकारण्यात येणारा पाझर कर सरकारच्या पाटबंधारे विभाग तत्काळ रद्द करावा, आदी विषयांवर या शेतकरी मेळाव्यात धोरणात्मक निर्णय घेऊन आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी