शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
7
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
8
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
9
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
10
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
11
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
12
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
13
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
14
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
15
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
16
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
17
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
18
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
19
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
20
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल

Sangli: जनावरांच्या बाजार बंदवरुन वादाला सुरुवात, गोसेवा आयोगाच्या आदेशास सभापतींचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 19:15 IST

त्यांना अधिकार कोणी दिला ? 

मिरज : महाराष्ट्र गोसेवा आयोगाने ३ ते ८ जूनपर्यंत राज्यात सर्व पशू बाजार बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. गोसेवा आयोगाचे आदेश लागू नसल्याची भूमिका बाजार समितीने घेतल्याने यावरुन संघर्ष उभा राहिला आहे. दुसरीकडे बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पशू बाजार बंद झाल्यास कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प होण्याची चिन्हे आहेत.राज्य गोसेवा आयोगाने सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांना ३ जून ते ८ जूनपर्यंत गोवंशाची बेकायदा कत्तल रोखण्यासाठी जनावरांचे बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात कोणत्याही गावात जनावरांचा बाजार भरवू नये, असे आयोगाने परिपत्रकात म्हटले आहे. राज्यात गायी व बैलांच्या कत्तलीवर बंदी घातली आहे. मात्र, आयोगाने या जनावरांसह मेंढ्या, बकरी, म्हैस अशा इतर प्राण्यांच्या बाजारास आठवडाभर बंदी घातली आहे.मिरजेचा मंगळवार व बुधवारी भरणारा जनावर बाजार जिल्ह्यात सर्वात मोठा असून बकरी ईदसाठी बकरी व जनावरे खरेदीसाठी आसपासचे जिल्हे व कोकणातून लोक मिरजेत येतात.आयोगाच्या आदेशाने मिरजेतील जनावर बाजार बंद ठेवणार नसल्याचे बाजार समिती सभापती सुजय शिंदे यांनी स्पष्ट केले. यास सामाजिक कार्यकर्त्यांनी विरोध करीत सभापती शिंदे यांची भेट घेतली. यामुळे शेतकरी, व संबंधित व्यावसायिकांचे नुकसान होणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.मिरजेतील बाजार बंद केल्यास कर्नाटकातील बाजारात येथील शेतकरी व खरेदीदारांना जावे लागणार आहे. त्यामुळे संपूर्ण बाजार बंद ठेवू नये, अशी मागणी मिरजेतील मुस्तफा बुजरूक, मौला कुरणे, युनूस चाबूकस्वार, कामील बागवान यांनी सभापती शिंदे यांच्याकडे केली.

१० कोटीची उलाढालगतवर्षी जूनमध्ये मिरजेत जनावरांच्या बाजारात १० कोटी २९ लाख ५ हजाराची उलाढाल होऊन बाजार समितीला १ लाख ३९ हजार सेस मिळाला होता. यावर्षी २८ मे रोजी बाजारात ४ कोटी ९३ लाख रुपये किमतीच्या जनावरे खरेदी विक्रीपासून ५२ हजार उत्पन्न मिळाले. मंगळवार बाजारात ही मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे.

त्यांना अधिकार कोणी दिला ?गोसेवा आयोग आम्हाला थेट आदेश देऊ शकत नाही. पणन संचालकांचे याबाबत कोणतेही आदेश नसल्याने मिरजेचा जनावरांचा बाजार सुरू राहील. या बाजारात गोवंश विक्रीस प्रतिबंध करण्यात येईल, असे सभापती सुजय शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीAnimalप्राणी