शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

पुस्तकांचे रुखवत, विज्ञानवादी विचारांचा जागर; सांगलीत पार पडला सत्यशोधक विवाह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2023 17:39 IST

सांगली : अन्न-धान्याची नासाडी टाळण्यासाठी तांदळांऐवजी फुलांच्या अक्षता, किमती भेटवस्तूंऐवजी प्रगतीशील विचारांच्या पुस्तकांचे रुखवत सजवून, विज्ञानवादी विचारांचा जागर अन् ...

सांगली : अन्न-धान्याची नासाडी टाळण्यासाठी तांदळांऐवजी फुलांच्या अक्षता, किमती भेटवस्तूंऐवजी प्रगतीशील विचारांच्या पुस्तकांचे रुखवत सजवून, विज्ञानवादी विचारांचा जागर अन् प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचा गौरव करीत सांगलीत सत्यशोधक विवाह पार पडला.  बिसूर येथील सुभाष सदाशिव पाटील यांची कन्या संपदा व मिरज तालुक्यातील करोली (एम) येथील अभियंता अतुल काकासाहेब पाटील यांचे पुत्र अभिनव यांचा सत्यशोधक पद्धतीने विवाह झाला. संविधान सोबत घेऊन वधू-वरांचे आगमन झाले. घटनेतील प्रास्ताविकेचे वाचन, स्वातंत्र्य आणि समानतेच्या वागणुकीची शपथ घेत दोघांनी एकमेकांना जीवनसाथी म्हणून स्वीकारले. तुताऱ्यांच्या निनादात वधू-वरांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन केले. आंब्याच्या रोपाला पाणी घालून वृक्षारोपणाचा संदेश दिला. डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी विज्ञानवादी विचारांसह जगण्याचे आवाहन केले. डॉ. विजय गायकवाड यांनी सत्यशोधक विधी केले. ए. डी. पाटील, धोंडीराम पाटील यांनी संयोजन केले. महापौर दिग्विजय सूर्यवंशी, डॉ. जितेश कदम, डॉ. संजय पाटील, प्रणिता पवार, अनंत सावंत, सुभाष सावंत, जयवंत सावंत, संभाजी पोळ, राहुल थोरात, प्रा. प्रताप पाटील, प्रा. नंदा पाटील उपस्थित होते.

टॅग्स :Sangliसांगलीmarriageलग्न