शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

आले पिकाच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांची डोकदुखी वाढली, कंदकुजमुळे उत्पादनही घटले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 12:46 IST

विक्रीसाठी व्यापाऱ्यांना साकडे

प्रताप महाडिककडेगाव : कडेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर आता आर्थिक संकट उभे ठाकले आहे. आले पिकाच्या दरात मोठी घट झाल्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल विकण्यासाठीदेखील संघर्ष करावा लागतो आहे. सातारा आणि सांगली जिल्ह्यात आले उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असताना मागील महिन्यापासून आल्याच्या दरात सुरू झालेली घसरण शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरली आहे.सध्या आले पिकास प्रतिगाडी (५०० किलो) १२ ते १५ हजार रुपये दर मिळत आहे, जो मागील महिन्याच्या तुलनेत निम्म्याहून कमी आहे. मागील दोन वर्षांमध्ये आले उत्पादक शेतकऱ्यांना १०० ते १२५ रुपये किलो दर मिळत होता. त्यामुळे आले लागवड योजना मोठ्या प्रमाणावर वाढली. यावर्षी दमदार पाऊस झाल्यामुळे शेतात पाणी साचल्याने कंदकुज सुरू झाली.यामुळे एकूण लागवडीच्या ३० ते ३५ टक्के आले पिकाचे क्षेत्र बाधित झाले. शेतकऱ्यांनी आले टिकवण्यासाठी औषध फवारणीसह सर्व प्रयत्न केले. यामुळे त्यांचा खर्चही वाढला आहे. दरातील घट आणि कंदकुजमुळे शेतकऱ्यांना आले लवकर काढावे लागत आहे.व्यापारी कमी दरात आले विकत घेत आहेत. काही व्यापाऱ्यांनी तर खरेदी बंद केली आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन आले खरेदी करणारे स्थानिक व्यापारी आवक वाढल्याने दर कमी झाल्याचे शेतकऱ्यांना सांगत आहेत. मात्र, हा आले दर कमी करण्यासाठीचा नियोजनबद्ध कार्यक्रम असल्याची शेतकरी वर्गात चर्चा आहे. दर घसरल्याने शेतकरी मात्र कर्जाच्या ओझ्याखाली दबले जात आहेत.कंदकुज आणि उत्पादन घटशेतकरी कंदकुज सुरू झालेले आले पीक जास्त दिवस जमिनीत ठेवू शकत नाहीत. त्यामुळे कंदकुजपासून वाचलेला चांगला माल काढून मिळेल त्या दरात विकण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. शेतकऱ्यांची ही व्यथा आहे.कृत्रिम दर घटआले पिकाच्या दरात झालेली घट ही कृत्रिम असल्याची शंका शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी बंद केली आहे आणि काही व्यापाऱ्यांकडून दर कमी करण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबविला जात असल्याची शेतकऱ्यांत चर्चा आहे.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीMarketबाजार