शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ९५ टक्के परप्रांतीय थांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : गतवर्षातील अनुभवातून शिकत उद्योजकांनी अनेक उपाययोजना केल्यामुळे यंदा परप्रांतीय कामगारांचे गावी परतण्याचे प्रमाण घटले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : गतवर्षातील अनुभवातून शिकत उद्योजकांनी अनेक उपाययोजना केल्यामुळे यंदा परप्रांतीय कामगारांचे गावी परतण्याचे प्रमाण घटले आहे. यावेळी केवळ ५ टक्के कामगार लॉकडाऊन काळात परतले असून, ९५ टक्के कामगारांनी जिल्ह्यात थांबून उद्योगचक्राला बळ दिले आहे.

सांगली जिल्ह्यातील ६० टक्के उद्योग सध्या सुरू आहेत. ऑक्सिजनअभावी बंद पडलेल्या फॅब्रिकेशन उद्योगांसह ४० टक्के कारखाने सध्या बंद आहेत. गतवेळी अचानक लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे तसेच भीतीचे सर्वत्र वातावरण असल्याने परप्रांतीय कामगार मोठ्या प्रमाणावर गावी परतले होते. यंदा अल्प कालावधीसाठी लॉकडाऊन व उद्योजकांनी कामगारांच्या राहण्याची, जेवणाची सोय केल्यामुळे परप्रांतीयांची पावले थांबली आहेत. साडेचार हजार कामगारांपैकी केवळ २०० कामगार परतले आहेत. त्यामुळे त्याचा फारसा परिणाम उद्योगांवर झाला नाही.

निर्यातदार उद्योगांचे चक्रही सध्या सुरळीत सुरू आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणीत घट झाल्याने २५ टक्के निर्यात घटली आहे. तरीही मागील कोरोना लाटेवेळी काही काळ पूर्णपणे निर्यात उद्योग ठप्प झाले होते. यंदाची परिस्थिती तुलनेते खूप चांगली आहे. त्यामुळे उद्योजकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. बांधकाम क्षेत्रातही तशीच परिस्थिती आहे. या क्षेत्रातील १० टक्केच परप्रांतीय कामगार परतले आहेत. त्यामुळे कामावर त्याचा फारसा परिणाम झालेला नाही.

चौकट

औद्योगिक वसाहतींमधील एकूण कामगार संख्या २९,०००

परप्रांतीय कामगारांची संख्या ४,५००

परतलेले कामगार २५०

थांबलेले कामगार ४२५०

औद्योगिक वसाहतींमधील कारखाने १२००

सुरू असलेले उद्योग ७२०

निर्यातदार उद्योजक १५०

प्रतिमाह जिल्ह्यातील केवळ औद्योगिक वसाहतींमधील निर्यात उलाढाल ५०० कोटींची आहे. यात सध्या २५ टक्के घट झाली आहे.

कोट

मागील वर्षापेक्षा यंदा परिस्थिती चांगली आहे. परप्रांतीय कामगार परतण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. कामगारांसाठी सर्व सोयी-सुविधा करून देतानाच कोरोना नियमांचे पालन करीत ६० टक्के उद्योग सुरू आहेत. शासनाने घेतलेल्या चांगल्या निर्णयांचाही हा परिणाम आहे.

- सतीश मालू, अध्यक्ष कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीज

कोट

निर्यात उद्योजकांना सध्या काही अडचण येत नाही. मागील वर्षापेक्षा स्थिती चांगली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी संलग्नता थांबली, तर मोठी अडचण येते. त्यामुळे ही संलग्नता कायम ठेवून निर्यात उद्योग सुरळीत आहे.

- संजय अराणके, अध्यक्ष, सांगली, मिरज एमआयडीसी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन

चौकट

बांधकाम क्षेत्राला ५० टक्के फटका

जिल्ह्यात बांधकामाला लागणाऱ्या साहित्याची दुकाने बंद असल्याने या क्षेत्राला ५० टक्के फटका बसला आहे. एकूण सुमारे २ हजार ५०० परप्रांतीय कामगारांपैकी केवळ १० टक्के कामगार परतले आहेत, अशी माहिती क्रेडाईचे दीपर्क सूर्यवंशी यांनी दिली.