शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

जिल्ह्यातील ९५ टक्के परप्रांतीय थांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : गतवर्षातील अनुभवातून शिकत उद्योजकांनी अनेक उपाययोजना केल्यामुळे यंदा परप्रांतीय कामगारांचे गावी परतण्याचे प्रमाण घटले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : गतवर्षातील अनुभवातून शिकत उद्योजकांनी अनेक उपाययोजना केल्यामुळे यंदा परप्रांतीय कामगारांचे गावी परतण्याचे प्रमाण घटले आहे. यावेळी केवळ ५ टक्के कामगार लॉकडाऊन काळात परतले असून, ९५ टक्के कामगारांनी जिल्ह्यात थांबून उद्योगचक्राला बळ दिले आहे.

सांगली जिल्ह्यातील ६० टक्के उद्योग सध्या सुरू आहेत. ऑक्सिजनअभावी बंद पडलेल्या फॅब्रिकेशन उद्योगांसह ४० टक्के कारखाने सध्या बंद आहेत. गतवेळी अचानक लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे तसेच भीतीचे सर्वत्र वातावरण असल्याने परप्रांतीय कामगार मोठ्या प्रमाणावर गावी परतले होते. यंदा अल्प कालावधीसाठी लॉकडाऊन व उद्योजकांनी कामगारांच्या राहण्याची, जेवणाची सोय केल्यामुळे परप्रांतीयांची पावले थांबली आहेत. साडेचार हजार कामगारांपैकी केवळ २०० कामगार परतले आहेत. त्यामुळे त्याचा फारसा परिणाम उद्योगांवर झाला नाही.

निर्यातदार उद्योगांचे चक्रही सध्या सुरळीत सुरू आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणीत घट झाल्याने २५ टक्के निर्यात घटली आहे. तरीही मागील कोरोना लाटेवेळी काही काळ पूर्णपणे निर्यात उद्योग ठप्प झाले होते. यंदाची परिस्थिती तुलनेते खूप चांगली आहे. त्यामुळे उद्योजकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. बांधकाम क्षेत्रातही तशीच परिस्थिती आहे. या क्षेत्रातील १० टक्केच परप्रांतीय कामगार परतले आहेत. त्यामुळे कामावर त्याचा फारसा परिणाम झालेला नाही.

चौकट

औद्योगिक वसाहतींमधील एकूण कामगार संख्या २९,०००

परप्रांतीय कामगारांची संख्या ४,५००

परतलेले कामगार २५०

थांबलेले कामगार ४२५०

औद्योगिक वसाहतींमधील कारखाने १२००

सुरू असलेले उद्योग ७२०

निर्यातदार उद्योजक १५०

प्रतिमाह जिल्ह्यातील केवळ औद्योगिक वसाहतींमधील निर्यात उलाढाल ५०० कोटींची आहे. यात सध्या २५ टक्के घट झाली आहे.

कोट

मागील वर्षापेक्षा यंदा परिस्थिती चांगली आहे. परप्रांतीय कामगार परतण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. कामगारांसाठी सर्व सोयी-सुविधा करून देतानाच कोरोना नियमांचे पालन करीत ६० टक्के उद्योग सुरू आहेत. शासनाने घेतलेल्या चांगल्या निर्णयांचाही हा परिणाम आहे.

- सतीश मालू, अध्यक्ष कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीज

कोट

निर्यात उद्योजकांना सध्या काही अडचण येत नाही. मागील वर्षापेक्षा स्थिती चांगली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी संलग्नता थांबली, तर मोठी अडचण येते. त्यामुळे ही संलग्नता कायम ठेवून निर्यात उद्योग सुरळीत आहे.

- संजय अराणके, अध्यक्ष, सांगली, मिरज एमआयडीसी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन

चौकट

बांधकाम क्षेत्राला ५० टक्के फटका

जिल्ह्यात बांधकामाला लागणाऱ्या साहित्याची दुकाने बंद असल्याने या क्षेत्राला ५० टक्के फटका बसला आहे. एकूण सुमारे २ हजार ५०० परप्रांतीय कामगारांपैकी केवळ १० टक्के कामगार परतले आहेत, अशी माहिती क्रेडाईचे दीपर्क सूर्यवंशी यांनी दिली.