शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

जिल्ह्यातील ९५ टक्के परप्रांतीय थांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : गतवर्षातील अनुभवातून शिकत उद्योजकांनी अनेक उपाययोजना केल्यामुळे यंदा परप्रांतीय कामगारांचे गावी परतण्याचे प्रमाण घटले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : गतवर्षातील अनुभवातून शिकत उद्योजकांनी अनेक उपाययोजना केल्यामुळे यंदा परप्रांतीय कामगारांचे गावी परतण्याचे प्रमाण घटले आहे. यावेळी केवळ ५ टक्के कामगार लॉकडाऊन काळात परतले असून, ९५ टक्के कामगारांनी जिल्ह्यात थांबून उद्योगचक्राला बळ दिले आहे.

सांगली जिल्ह्यातील ६० टक्के उद्योग सध्या सुरू आहेत. ऑक्सिजनअभावी बंद पडलेल्या फॅब्रिकेशन उद्योगांसह ४० टक्के कारखाने सध्या बंद आहेत. गतवेळी अचानक लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे तसेच भीतीचे सर्वत्र वातावरण असल्याने परप्रांतीय कामगार मोठ्या प्रमाणावर गावी परतले होते. यंदा अल्प कालावधीसाठी लॉकडाऊन व उद्योजकांनी कामगारांच्या राहण्याची, जेवणाची सोय केल्यामुळे परप्रांतीयांची पावले थांबली आहेत. साडेचार हजार कामगारांपैकी केवळ २०० कामगार परतले आहेत. त्यामुळे त्याचा फारसा परिणाम उद्योगांवर झाला नाही.

निर्यातदार उद्योगांचे चक्रही सध्या सुरळीत सुरू आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणीत घट झाल्याने २५ टक्के निर्यात घटली आहे. तरीही मागील कोरोना लाटेवेळी काही काळ पूर्णपणे निर्यात उद्योग ठप्प झाले होते. यंदाची परिस्थिती तुलनेते खूप चांगली आहे. त्यामुळे उद्योजकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. बांधकाम क्षेत्रातही तशीच परिस्थिती आहे. या क्षेत्रातील १० टक्केच परप्रांतीय कामगार परतले आहेत. त्यामुळे कामावर त्याचा फारसा परिणाम झालेला नाही.

चौकट

औद्योगिक वसाहतींमधील एकूण कामगार संख्या २९,०००

परप्रांतीय कामगारांची संख्या ४,५००

परतलेले कामगार २५०

थांबलेले कामगार ४२५०

औद्योगिक वसाहतींमधील कारखाने १२००

सुरू असलेले उद्योग ७२०

निर्यातदार उद्योजक १५०

प्रतिमाह जिल्ह्यातील केवळ औद्योगिक वसाहतींमधील निर्यात उलाढाल ५०० कोटींची आहे. यात सध्या २५ टक्के घट झाली आहे.

कोट

मागील वर्षापेक्षा यंदा परिस्थिती चांगली आहे. परप्रांतीय कामगार परतण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. कामगारांसाठी सर्व सोयी-सुविधा करून देतानाच कोरोना नियमांचे पालन करीत ६० टक्के उद्योग सुरू आहेत. शासनाने घेतलेल्या चांगल्या निर्णयांचाही हा परिणाम आहे.

- सतीश मालू, अध्यक्ष कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीज

कोट

निर्यात उद्योजकांना सध्या काही अडचण येत नाही. मागील वर्षापेक्षा स्थिती चांगली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी संलग्नता थांबली, तर मोठी अडचण येते. त्यामुळे ही संलग्नता कायम ठेवून निर्यात उद्योग सुरळीत आहे.

- संजय अराणके, अध्यक्ष, सांगली, मिरज एमआयडीसी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन

चौकट

बांधकाम क्षेत्राला ५० टक्के फटका

जिल्ह्यात बांधकामाला लागणाऱ्या साहित्याची दुकाने बंद असल्याने या क्षेत्राला ५० टक्के फटका बसला आहे. एकूण सुमारे २ हजार ५०० परप्रांतीय कामगारांपैकी केवळ १० टक्के कामगार परतले आहेत, अशी माहिती क्रेडाईचे दीपर्क सूर्यवंशी यांनी दिली.