शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: नगरपरिषदेत चुरशीची लढाई: ठाकरेंच्या शिवसेनेने खाते उघडले, काँग्रेसही आघाडीवर; पहा लेटेस्ट अपडेट
2
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
3
Nagar Parishad Election Result: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
4
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
5
नात्याला काळीमा! विमा पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
6
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
7
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
8
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
9
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
10
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
11
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
12
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
13
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
14
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
15
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
16
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
17
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
18
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
19
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
20
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जीवापाड वाढविलेली द्राक्षबाग वटवाघुळांनी एका रात्रीत केली फस्त; लिंगनूर येथे लाखोंचे नुकसान

By संतोष भिसे | Updated: October 30, 2022 14:09 IST

लिंगनूर (ता. मिरज) येथे अवधूत आणि शिवदूत शंकर माळी या २०-२२ वर्षांच्या भावंडांनी जीवापाड वाढविलेली द्राक्षबाग वटवाघुळांनी एका रात्रीत फस्त केली.

लिंगनूर : लिंगनूर (ता. मिरज) येथे अवधूत आणि शिवदूत शंकर माळी या २०-२२ वर्षांच्या भावंडांनी जीवापाड वाढविलेली द्राक्षबाग वटवाघुळांनी एका रात्रीत फस्त केली. सुमारे सात लाख रुपयांची द्राक्षे नष्ट झाली. या दणक्याने तरुण शेतकरी कोलमडून गेले आहेत.

लिंगनूरमध्ये पाझर तलावानजिक त्यांची आरके जातीची द्राक्षबाग होती. गेली १०-१५ वर्षे माळी कुटूंब द्राक्षे पिकविते. यावर्षी वडील अंथरुणाला खिळून असल्याने भावंडांनीच बाग सांभाळली. चांगल्या दराच्या अपेक्षेने जूनमध्ये आगाप छाटणी घेतली. पाऊस, वाऱ्या-वादळापासून बचावासाठी छत घातले. बागेतील माती व चिखलामुळे द्राक्षघड खराब होऊ नयेत यासाठी सरींमध्येही कागद अंथरला. ट्रॅक्टर चालविल्यास, कागद फाटेल म्हणून पाईपने औषधे फवारली. बाग चांगलीच फळली. धुवॉंधार पावसातही टिकून राहिली. व्यापाऱ्यांनी ५३० रुपयांना चार किलो असा विक्रमी भाव सांगितला. दिवाळीनंतर  उतरणीचे नियोजन होते, तत्पूर्वीच वटवाघुळांचा हल्ला झाला.

शेकडो वटवाघळांनी एका रात्रीत बाग उध्वस्त केली. पक्व द्राक्षघड खाऊन, तोडून टाकले. बागेत रात्रभर धिंगाणा घातला. अवधूतला सकाळी बागेत    द्राक्षांचा सडा आणि चिखल दिसून आला. हा दणका न पेलवणारा ठरला आहे. दिवे लावा, जाळी मारा

माळी बंधूंची घराजवळच आणखी अर्धा एकर द्राक्षबाग आहे. तेथे जानेवारीत उत्पन्न सुरु होईल. वटवाघुळांचे हल्ले पाहता अवधूतने या बागेभोवती तातडीने जाळी मारली. बागेत रात्रभर प्रखर दिवे सुरु ठेवले. यामुळे वटवाघुळांच्या बंदोबस्ताची आशा आहे.

महामार्ग शेतकऱ्यांच्या जीवावर

रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्ग आणि हेरवाड-दिघंची राज्यमार्गासाठी मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यांत हजारो झाडांची कत्तल झाली. त्यामुळे वटवाघुळांची निवासस्थाने हरविली. विशेषत: अतिशय जुनी वडाची व पिंपळाची झाडे तोडण्यात आल्याने वटवाघुळांना निवारा राहिला नाही. सैरभैर झालेली वटवाघुळे आता शेतकऱ्यांच्या बागांत घुसू लागली आहेत. द्राक्षे, पपई, चिकू, पेरु, रामपळ, सिताफळ आदी फळबागांची नासाडी करत आहेत. महामार्ग शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे.

बागेसाठी सुमारे चार लाख रुपये खर्च केले होते. सहा-सात लाखांचे उत्पन्न अपेक्षित होते. पण साऱ्यावरच पाणी पडले. शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेली शेती आस्मानी संकटात अशी मातीमोल होत असेल, तर शासनाने मदतीचा हात पुढे करायला हवा. तरच शेतकरी तग धरेल.

- अवधूत माळी, लिंगनूर

टॅग्स :FarmerशेतकरीSangliसांगली