शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

जीवापाड वाढविलेली द्राक्षबाग वटवाघुळांनी एका रात्रीत केली फस्त; लिंगनूर येथे लाखोंचे नुकसान

By संतोष भिसे | Updated: October 30, 2022 14:09 IST

लिंगनूर (ता. मिरज) येथे अवधूत आणि शिवदूत शंकर माळी या २०-२२ वर्षांच्या भावंडांनी जीवापाड वाढविलेली द्राक्षबाग वटवाघुळांनी एका रात्रीत फस्त केली.

लिंगनूर : लिंगनूर (ता. मिरज) येथे अवधूत आणि शिवदूत शंकर माळी या २०-२२ वर्षांच्या भावंडांनी जीवापाड वाढविलेली द्राक्षबाग वटवाघुळांनी एका रात्रीत फस्त केली. सुमारे सात लाख रुपयांची द्राक्षे नष्ट झाली. या दणक्याने तरुण शेतकरी कोलमडून गेले आहेत.

लिंगनूरमध्ये पाझर तलावानजिक त्यांची आरके जातीची द्राक्षबाग होती. गेली १०-१५ वर्षे माळी कुटूंब द्राक्षे पिकविते. यावर्षी वडील अंथरुणाला खिळून असल्याने भावंडांनीच बाग सांभाळली. चांगल्या दराच्या अपेक्षेने जूनमध्ये आगाप छाटणी घेतली. पाऊस, वाऱ्या-वादळापासून बचावासाठी छत घातले. बागेतील माती व चिखलामुळे द्राक्षघड खराब होऊ नयेत यासाठी सरींमध्येही कागद अंथरला. ट्रॅक्टर चालविल्यास, कागद फाटेल म्हणून पाईपने औषधे फवारली. बाग चांगलीच फळली. धुवॉंधार पावसातही टिकून राहिली. व्यापाऱ्यांनी ५३० रुपयांना चार किलो असा विक्रमी भाव सांगितला. दिवाळीनंतर  उतरणीचे नियोजन होते, तत्पूर्वीच वटवाघुळांचा हल्ला झाला.

शेकडो वटवाघळांनी एका रात्रीत बाग उध्वस्त केली. पक्व द्राक्षघड खाऊन, तोडून टाकले. बागेत रात्रभर धिंगाणा घातला. अवधूतला सकाळी बागेत    द्राक्षांचा सडा आणि चिखल दिसून आला. हा दणका न पेलवणारा ठरला आहे. दिवे लावा, जाळी मारा

माळी बंधूंची घराजवळच आणखी अर्धा एकर द्राक्षबाग आहे. तेथे जानेवारीत उत्पन्न सुरु होईल. वटवाघुळांचे हल्ले पाहता अवधूतने या बागेभोवती तातडीने जाळी मारली. बागेत रात्रभर प्रखर दिवे सुरु ठेवले. यामुळे वटवाघुळांच्या बंदोबस्ताची आशा आहे.

महामार्ग शेतकऱ्यांच्या जीवावर

रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्ग आणि हेरवाड-दिघंची राज्यमार्गासाठी मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यांत हजारो झाडांची कत्तल झाली. त्यामुळे वटवाघुळांची निवासस्थाने हरविली. विशेषत: अतिशय जुनी वडाची व पिंपळाची झाडे तोडण्यात आल्याने वटवाघुळांना निवारा राहिला नाही. सैरभैर झालेली वटवाघुळे आता शेतकऱ्यांच्या बागांत घुसू लागली आहेत. द्राक्षे, पपई, चिकू, पेरु, रामपळ, सिताफळ आदी फळबागांची नासाडी करत आहेत. महामार्ग शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे.

बागेसाठी सुमारे चार लाख रुपये खर्च केले होते. सहा-सात लाखांचे उत्पन्न अपेक्षित होते. पण साऱ्यावरच पाणी पडले. शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेली शेती आस्मानी संकटात अशी मातीमोल होत असेल, तर शासनाने मदतीचा हात पुढे करायला हवा. तरच शेतकरी तग धरेल.

- अवधूत माळी, लिंगनूर

टॅग्स :FarmerशेतकरीSangliसांगली