शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

सांगली जिल्ह्यात पाच महिन्यांत ११२ अपघातात ६९ ठार, १२६ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 16:21 IST

बऱ्याचदा एकाने केलेल्या चुकीमुळे दुसऱ्या व्यक्तीच्या कुटुंबावर आघात

अविनाश कोळीसांगली : विना हेल्मेट, सीटबेल्ट, मद्यपान करून वाहन चालविणे, वेगमर्यादा ओलांडणे यासह अनेक मानवी चुकांमुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सांगली जिल्ह्यात गेल्या १५७ दिवसांमध्ये ११२ अपघात घडले असून त्यात ६९ जणांचा बळी, तर १२६ लोक गंभीररीत्या जखमी झाले आहेत. अपघातात ठार झालेल्या व अपंगत्व आलेल्या अनेकांच्या कुटुंबावर मोठे आघातही या अपघातांमुळे झाले आहेत. काही चुका टाळल्यास अपघातही टाळता येऊ शकतात.सांगली जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत अपघातांचा आलेख वाढत आहे. हा आलेख कमी करण्यासाठी वाहतूक पोलीस व प्रशासन प्रयत्न करीत असले, तरी नागरिकांचा अपेक्षित प्रतिसाद त्यांना मिळत नसल्याचे चित्र आहे. नियम मोडून दंड भरून पुन्हा बेशिस्त वाहनचालक सुसाट सुटतात. त्यामुळे अपघातांची मालिका सुरूच आहे.एका क्षणात कुटुंबे उद्ध्वस्तअपघातात बळी पडलेल्या लोकांची, तसेच अपघातात अपंगत्व आलेल्या शेकडाे लोकांची कुटुंबे क्षणात उद्ध्वस्त होत आहेत. याची कल्पना वाहन चालविणाऱ्याला नसते. बऱ्याचदा एकाने केलेल्या चुकीमुळे दुसऱ्या व्यक्तीच्या कुटुंबावर आघात होतो, याचेही भान वाहनचालक ठेवत नाहीत.कोणत्या चुकांमुळे अपघात होताहेतसीटबेल्ट, हेल्मेट न वापरणे, मद्यपान करुन वाहन चालविणे, वेगमर्यादा ओलांडणे, जादा प्रवासी वाहतूक, चुकीच्या दिशेने वाहन चालविणे, सिग्नल तोडणे अशा चुकांमुळे ९९ टक्के अपघात होत असल्याचे निरीक्षण वाहतूक विभागाने नोंदविले आहे. या चुका टाळता येऊ शकतात.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघात