शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

ढगाळ हवामान आणि पावसाचा फटका, सांगली जिल्ह्यातील ६५ हजार एकर द्राक्षबागा उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2021 15:54 IST

दत्ता पाटील तासगाव : जिल्ह्यात आठवडाभर सलग ढगाळ हवामान आणि पाऊस सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील ८० हजार एकरांपैकी तब्बल ...

दत्ता पाटीलतासगाव : जिल्ह्यात आठवडाभर सलग ढगाळ हवामान आणि पाऊस सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील ८० हजार एकरांपैकी तब्बल ६५ हजार एकरांवरील द्राक्षबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. घडकूज, मणीगळ, दावण्या (डाऊनी) रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. फुलोऱ्यातील द्राक्षबागांना मोठा फटका बसला असून, ७० टक्के द्राक्षांचे नुकसान झाले आहे.

गतवर्षीच्या हंगामात आगाप पीक छाटणी घेतलेल्या बागांचे खराब हवामानामुळे नुकसान झाले होते. त्यामुळे या वर्षी बहुतांश शेतकऱ्यांनी आगाप छाटणी घेतली नाही. जिल्ह्यात ७९ हजार ४४० एकर क्षेत्रावर द्राक्षबाग आहे. त्यापैकी सुमारे ६५ हजार एकरांवरील बागांची छाटणी उशिरा झाली. मात्र, पुन्हा निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसला आहे.

जिल्ह्यात आठ दिवसांपासून ढगाळ हवामानासह पाऊस सुरू आहे. त्यामुळे फुलोरा अवस्थेतील, तसेच १ नोव्हेंबरपर्यंत पीक छाटणी घेतलेल्या द्राक्षबागांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. सततच्या खराब हवामानामुळे द्राक्षघडांची कुज आणि मणीगळ झाली आहे. अनेक बागांत दावण्याने थैमान घातले आहे. आतापर्यंत ६५ हजार एकरांवरील द्राक्षबागांचे ७० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे. उरलीसुरली बाग वाचविण्यासाठी महागड्या औषधांची दिवसरात्र फवारणी सुरू आहे. मात्र, आणखी चार दिवस ढगाळ हवामान राहणार असल्याने, बागायतदारांचा जीव टांगणीला लागला आहे.

ढगाळ हवामान आणि पावसामुळे पांढऱ्या मुळीची वाढ थांबते. पीक छाटणीनंतर फुलोरावस्थेत असणाऱ्या द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले आहे. ३५ ते ४० दिवसांच्या टप्प्यामध्ये एसएसएन, सोनाक्का, सुपर माणिक चमन या जातींच्या द्राक्षांत नुकसानीचे प्रमाण जास्त आहे. पीक छाटणीनंतर पंधरा दिवसांनी झिंक, बोरॉन, मिथाइलची फवारणी केली असल्यास, फुलोरावस्थेत नुकसान टाळता येऊ शकते. नुकसानीचा आढावा घेतला जात असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना फळ विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी कार्यवाही सुरू आहे.- मनोज वेताळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

जिल्ह्यातील तालुकानिहाय द्राक्षक्षेत्र (हेक्टरमध्ये)

खानापूर : १,१२५

कवठेमहांकाळ : २,८७१

कडेगाव : २२९

पलूस : १,५६१

तासगाव : ९,२३६

मिरज : ८,२६८

जत : ६,९०६

वाळवा : १,२१५

आटपाडी : ३६५

एकूण : ३१,७७६

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊस