शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

सांगली जिल्ह्यात ५२ बोगस खते, बियाण्यांबद्दल न्यायालयात दावा; कृषी विभागाची कारवाई 

By अशोक डोंबाळे | Updated: September 19, 2023 18:47 IST

चौदाशे नमुन्यांची कृषी विभागाकडून तपासणी

सांगली : जिल्ह्यात १०० टक्के पेरण्या झाल्या नसल्या तरी हंगामासाठी आलेले खते, बियाणे आणि किटकनाशकांमध्ये अप्रमाणितपणा (बोगस) आढळून आले आहेत. जिल्ह्यातील बहुतांशी दुकानांमध्ये विक्रीसाठी आलेल्या एक हजार ४०० नमुन्यांची तपासणी केली असून त्यामध्ये खतांचे ३८, बियाणे ९ आणि किटकनाशकांचे ५ नमुने बोगस असल्याचे स्पष्ट झाले. तपासणीमध्ये त्रुटी आढळल्याने ५२ नमुन्यांप्रकरणी न्यायालायत दावा दाखल केल्याचे कृषी विभागाने सांगितले.खरीप हंगामासाठी कृषी विभागाने खते आणि बियाण्यांची मागणी केली आहे. खतांचा पुरवठा आणि विक्री होताना शेतकर्यांना त्रास होणार नाही, याबाबतची दक्षता घेण्यात आली. जिल्ह्यात खताचे होलसेल व किरकोळ असे मिळून पाच हजार १७५ वितरक आहेत. हंगामाच्या पार्श्वभूमीवर मे महिन्यापासून नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले होते. निविष्ठा गुणनियंत्रण कामकाजासाठी जिल्ह्यात गुणनियंत्रण निरीक्षक व अकरा भरारी पथका मार्फत निविष्ठा वितरकांचे तपासणी व बियाणे खते औषधे नमुने काढण्याची कार्यवाही केली. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जे वितरक विहित कालमर्यादेत परवाना नुतनीकरण केलेले नसल्याचे स्पष्ट झाले. परवान्याची मुदत संपल्यानंतरही दुकानातून विक्री करण्यात आली त्यांच्यावर कारवाई केली होती.पेरण्या झाल्या नसल्या तरी कृषी सेवा केंद्रामध्ये विक्रीसाठी आलेल्या खते, बियाण्यांची तपासणी कृषी विभागाकडून करण्यात आली आहे. जिल्ह्यात तीन प्रकारच्या सुमारे चौदाशे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. तपासणीसाठी खतांचे तब्बल एक हजार १०० नमुने तपासले असून त्यापैकी ३८ नमुने अप्रमाणित असल्याचे आढळून आले. बियाण्यांचे ३३५ नमुन्यांनंतर ९ बोगस आणि किटकनाशकांचे २१३ नमुन्यांची तपासणी केली, त्यामध्ये पाच नमुने बोगस असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सदोष खते, बियाणे आणि किटकनाशकास विक्री बंदचे आदेश देण्यात असून याप्रकरणी संबंधित कंपन्यांविरोधात न्यायालयात दावा दाखल करण्यात आला असल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले.जादा दराने विक्री तरीही कारवाईकडे दुर्लक्षकृष्णा आणि वारणा नदीकाठी पाण्याची सुविधा असल्याने जिल्ह्याच्या पश्चिम भागात पेरण्या पूर्ण झाल्या. परंतु पूर्व भागाला पावसाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे एक लाख हेक्टर क्षेत्र नापेर राहिले. जिल्ह्यात युरिया खताचा मुबलक साठा उपलब्ध असतानाही वाळवा, शिराळा, तासगाव तालुक्यातील शेतकर्यांना युरियाची गोणी जादा दराने विकत घ्यावे लागली होती. याकडे कृषी विभागाने दुर्लक्ष का केले, असा सवालही शेतकऱ्यांनी केला आहे.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र