शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

सांगली जिल्हा परिषदेत वर्षभरात नव्या ५०४ ठेकेदारांची भर, ठेकेदार होण्याकडे तरुणांचा कल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 16:30 IST

नाेंदणीसाठी अशी लागतात कागदपत्रे

सांगली : सध्या सिव्हिल इंजिनिअरिंग आणि स्थापत्य अभियंता पदवी घेऊन ठेकेदार होण्याकडे तरुणांचा कल वाढल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षभरात ५०४ सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांची जिल्हा परिषदेकडे नोंदणी झाली असून, आतापर्यंत दोन हजार २२२ अभियंत्यांची नोंदणी झाली. सिव्हिल अभियंता पदवी व पदविका मिळवूनही नोकरी मिळत नसल्याने तरुण ठेकेदारीकडे वळल्याचे दिसत आहे.शासकीय कंत्राट घेण्यासाठी परवाना घेणे आवश्यक आहे. आर्थिक स्थिती चांगली आणि कामे करण्याचा काही वर्षांचा अनुभव गाठीशी असेल तर ठेकेदारी करण्याचे तरुण धाडस करत होते. आता चित्र बदलले आहे. कामाचा अनुभव असो की नसो सिव्हिल अभियंता पदवी घेतल्यानंतर तरुण शासकीय कामे घेण्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे येत आहेत.पूर्वी ठेकेदार होण्यासाठी नोंदणी करण्याचे प्रमाण कमी होते; पण सध्या वाढल्याचे शासकीय आकडेवारी सांगत आहे. २०२१-२२ मध्ये सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांची एक हजार ३६७ संख्या होती. यामध्ये ३५० सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांची भर पडून एक हजार ७१७ झाली. २०२२-२३ या वर्षात ५०४ सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांची नव्याने नोंदणी झाली आहे. यामुळे सध्या दोन हजार २२२ संख्या झाली आहे. सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांची नोंदणी वाढली आहे. दोन ते तीन वर्षांत दुप्पट नोंदणी झाली आहे; पण तेवढ्या प्रमाणात कामे मिळत नसल्याची त्यांची खंत आहे. नोंदणीच्या संख्येनुसार कामे मिळावीतशासनाने सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन कामे दिली पाहिजेत. मिरज तालुक्यातच पाचशेहून अधिक अभियंत्यांची नोंदणी आहे; परंतु जिल्हा परिषदेकडून केवळ दोन कामे मिळाली. उर्वरित अभियंत्यांनी काय करायचे, असा सवालही सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेचे अध्यक्ष महावीर पाटील यांनी उपस्थित केला.नाेंदणीसाठी अशी लागतात कागदपत्रेनियमित ठेकेदार म्हणून परवाना मिळविण्यासाठी इच्छुक ठेकेदारांना वय, रहिवासी दाखला, खासगी कामे केल्याच्या अनुभवाचे प्रमाणपत्र, जेवढ्या रकमेची कामे करायची त्या दुप्पट रकमेची कामे केल्याचे आर्किटेक्ट प्रमाणित प्रमाणपत्र आदी कागदपत्रे लागतात. या कागदपत्रांची पुर्तता हाेत असल्यासच परवाना दिला जाताे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.६१६ मजूर सोसायट्यांची नोंदणीजिल्ह्यात सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांची दोन हजार २२२ नोंदणी असून मजूर सोसायट्यांची संख्या ६१६ आहे. मजूर सोसायट्यांच्या तुलनेत अभियंत्यांची संख्या जास्त असूनही त्यांना ३३ टक्केच कामे मिळत होती. अभियंत्यांच्या तक्रारीनंतर शासनाने सध्या ४० टक्क्यांपर्यंत प्रमाण केले आहे.

टॅग्स :Sangliसांगलीzpजिल्हा परिषद