शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

दमदार पावसामुळे सांगली जिल्ह्यातील पाण्याचे ५० टँकर बंद

By अशोक डोंबाळे | Updated: July 3, 2024 18:37 IST

चारा टंचाईचा प्रश्न सुटल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्टीकरण

सांगली : जिल्ह्यातील ८६ गावे आणि ६४१ वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांना १०९ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू हाेता. पण, जून महिन्यात झालेल्या पावसामुळे ५० टँकर बंद केले असून, सद्या ५९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यातील चारा टंचाईची तीव्रताही कमी झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.डॉ. राजा दयानिधी म्हणाले, ८६ गावे त्याखालील ६४१ वाड्या-वस्त्यांवरील दोन लाखांपर्यंतच्या लोकसंख्येला रोज १०९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. काही पशुधनालाही टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. पण, जून महिन्यात जिल्ह्यात सरासरी २११ मिलिमीटर पाऊस झाला आहे. सर्वाधिक चांगला पाऊस झाल्यामुळे ७१ टक्क्यांपर्यंत खरीप हंगामातील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.पाऊस चांगला झाल्यामुळे ३५ गावे आणि २३४ वाड्या-वस्त्यांवरील ५० टँकर कमी झाले आहेत. सद्या जिल्ह्यातील जत आणि आटपाडी तालुक्यातील ५१ गावे आणि ४०७ वाड्या-वस्त्यांवर ५९ टँकरद्वारे पाणीपुरवठा चालू आहे. जिल्ह्यात कुठेही चाराटंचाई नाही. पुरेसा चारा उपलब्ध आहे.

बोगस बियाणे, खत विक्रेत्यांवर कारवाईजिल्ह्यात खरीप हंगामातील पेरणीला गती मिळाली आहे. या पेरणीच्या गडबडीत बोगस बियाणे, रासायनिक खते आणि कीटकनाशकांची विक्री होऊ नये, यासाठी कृषी विभागाचे ११ पथके लक्ष ठेवून आहेत. यातून काही बोगस बियाणे, खते आढळून आल्यास शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय आणि कृषी विभागाकडे तत्काळ तक्रार करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसWaterपाणी