शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

दमदार पावसामुळे सांगली जिल्ह्यातील पाण्याचे ५० टँकर बंद

By अशोक डोंबाळे | Updated: July 3, 2024 18:37 IST

चारा टंचाईचा प्रश्न सुटल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्टीकरण

सांगली : जिल्ह्यातील ८६ गावे आणि ६४१ वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांना १०९ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू हाेता. पण, जून महिन्यात झालेल्या पावसामुळे ५० टँकर बंद केले असून, सद्या ५९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यातील चारा टंचाईची तीव्रताही कमी झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.डॉ. राजा दयानिधी म्हणाले, ८६ गावे त्याखालील ६४१ वाड्या-वस्त्यांवरील दोन लाखांपर्यंतच्या लोकसंख्येला रोज १०९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. काही पशुधनालाही टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. पण, जून महिन्यात जिल्ह्यात सरासरी २११ मिलिमीटर पाऊस झाला आहे. सर्वाधिक चांगला पाऊस झाल्यामुळे ७१ टक्क्यांपर्यंत खरीप हंगामातील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.पाऊस चांगला झाल्यामुळे ३५ गावे आणि २३४ वाड्या-वस्त्यांवरील ५० टँकर कमी झाले आहेत. सद्या जिल्ह्यातील जत आणि आटपाडी तालुक्यातील ५१ गावे आणि ४०७ वाड्या-वस्त्यांवर ५९ टँकरद्वारे पाणीपुरवठा चालू आहे. जिल्ह्यात कुठेही चाराटंचाई नाही. पुरेसा चारा उपलब्ध आहे.

बोगस बियाणे, खत विक्रेत्यांवर कारवाईजिल्ह्यात खरीप हंगामातील पेरणीला गती मिळाली आहे. या पेरणीच्या गडबडीत बोगस बियाणे, रासायनिक खते आणि कीटकनाशकांची विक्री होऊ नये, यासाठी कृषी विभागाचे ११ पथके लक्ष ठेवून आहेत. यातून काही बोगस बियाणे, खते आढळून आल्यास शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय आणि कृषी विभागाकडे तत्काळ तक्रार करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसWaterपाणी