शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

दमदार पावसामुळे सांगली जिल्ह्यातील पाण्याचे ५० टँकर बंद

By अशोक डोंबाळे | Updated: July 3, 2024 18:37 IST

चारा टंचाईचा प्रश्न सुटल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्टीकरण

सांगली : जिल्ह्यातील ८६ गावे आणि ६४१ वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांना १०९ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू हाेता. पण, जून महिन्यात झालेल्या पावसामुळे ५० टँकर बंद केले असून, सद्या ५९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यातील चारा टंचाईची तीव्रताही कमी झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.डॉ. राजा दयानिधी म्हणाले, ८६ गावे त्याखालील ६४१ वाड्या-वस्त्यांवरील दोन लाखांपर्यंतच्या लोकसंख्येला रोज १०९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. काही पशुधनालाही टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. पण, जून महिन्यात जिल्ह्यात सरासरी २११ मिलिमीटर पाऊस झाला आहे. सर्वाधिक चांगला पाऊस झाल्यामुळे ७१ टक्क्यांपर्यंत खरीप हंगामातील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.पाऊस चांगला झाल्यामुळे ३५ गावे आणि २३४ वाड्या-वस्त्यांवरील ५० टँकर कमी झाले आहेत. सद्या जिल्ह्यातील जत आणि आटपाडी तालुक्यातील ५१ गावे आणि ४०७ वाड्या-वस्त्यांवर ५९ टँकरद्वारे पाणीपुरवठा चालू आहे. जिल्ह्यात कुठेही चाराटंचाई नाही. पुरेसा चारा उपलब्ध आहे.

बोगस बियाणे, खत विक्रेत्यांवर कारवाईजिल्ह्यात खरीप हंगामातील पेरणीला गती मिळाली आहे. या पेरणीच्या गडबडीत बोगस बियाणे, रासायनिक खते आणि कीटकनाशकांची विक्री होऊ नये, यासाठी कृषी विभागाचे ११ पथके लक्ष ठेवून आहेत. यातून काही बोगस बियाणे, खते आढळून आल्यास शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय आणि कृषी विभागाकडे तत्काळ तक्रार करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसWaterपाणी