शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता सुरक्षा अभियान काळात ५० जणांचा बळी, सांगलीत अपघातांचे प्रमाण वाढले

By घनशाम नवाथे | Updated: February 7, 2025 16:08 IST

उसाच्या ट्रॅक्टरचे आठ बळी

घनशाम नवाथे सांगली : पूर्वी रस्ता सुरक्षा सप्ताह राबवला जात होता. नंतर सप्ताहाचा पंधरवडा झाला. आता महिनाभर रस्ता सुरक्षा अभियान राबवले गेले. परंतु या महिन्यात जिल्ह्यात एक दोन नव्हे तर तब्बल ५० जणांचा अपघाती बळी गेला. त्यामुळे हे अभियान सतत राबवण्याची आवश्यक आहे. वाढते अपघात रोखण्यासाठी सामाजिक चळवळ उभी राहण्याची गरज भासू लागली आहे.जिल्ह्यात पूर्वी वारंवार अपघात होणारे जवळपास ६० ते ७० ‘ब्लॅक स्पॉट’ होते. याठिकाणी वर्षानुवर्षे अपघाताचा धोका दर्शवणारे फलक होते. परंतु अपघातस्थळे नष्ट करण्यात आली नव्हती. न्यायालयाच्या आदेशानुसार सर्वत्र अपघात स्थळे नष्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. जिल्ह्यातील अपघात स्थळे नष्ट करण्यासाठी प्रयत्न झाले. त्यामुळे सध्या केवळ बोटावर मोजण्याइतपत अपघातस्थळे कायम आहेत.

एकीकडे अपघातस्थळे नष्ट केली जात असून रस्तेही मोठे झाले आहेत. पूर्वी नादुरुस्त रस्ते, खड्डे, गतिरोधक आदी कारणामुळे अपघात होत होते. परंतु आता मानवी चुकांमुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. वाहतुकीच्या नियमाचे पालन न करणे, बेदरकारपणे वाहन चालवणे, नशेत वाहन चालवणे आदी कारणामुळे अपघात होऊ लागलेत.नुकतेच जानेवारी महिन्यात रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात आले. आरटीओ, पोलिस, सार्वजनिक बांधकाम विभाग आदींच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवले गेले. परंतु याच महिन्याच्या काळात तब्बल ५० जणांचा अपघाती बळी गेला. तर शंभरहून अधिक जण जखमी झाले आहेत. त्यामुळे हे अभियान आता महिन्यापुरते नव्हे तर वर्षभर सामाजिक चळवळ म्हणून राबवण्याची गरज आहे.

उसाच्या ट्रॅक्टरचे आठ बळीरस्ता सुरक्षा अभियानात उसाच्या ट्रॅक्टरला रिफ्लेक्टर लावण्याची मोहीम हाती घेण्यात आली. परंतु ती शंभर टक्के पूर्ण झाली नाही. त्यामुळेच जानेवारी महिन्यात उसाच्या ट्रॅक्टर, ट्रॉलीमुळे आठ जणांचा बळी गेला. तसेच त्यापेक्षा जास्त वाहन चालक जखमी झाले. ट्रॅक्टर मालक, चालकांच्या बेदरकारपणामुळे दरवर्षी अनेकांचा बळी जातो.

जत तालुक्यात अपघात वाढलेजानेवारी महिन्यात जत तालुक्यात आठ जणांचा अपघाती बळी गेला. त्यापाठोपाठ इस्लामपूरमध्ये सहा जणांचा अपघातात मृत्यू झाला. भिलवडी (५), आटपाडी (४), तासगाव (३), विटा (३), कडेगाव (३), पलूस (३) याप्रमाणे १८ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ५० जणांचा बळी गेला.

अपघाताची कारणेचुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे, वेगाने वाहन चालवणे, दारू पिऊन वाहन चालवणे, स्वत: बद्दल फाजिल आत्मविश्वास बाळगून वाहन चालवणे, हेल्मेट न वापरणे, सीटबेल्ट न लावणे आदी प्रमुख कारणांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून येते.

आजार, युद्धापेक्षा जास्त बळीरस्ता सुरक्षा अभियानाच्या प्रारंभी जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांनी अपघाताचे प्रमाण वाढल्याबद्दल चिंता व्यक्त केली. एखाद्या आजाराच्या साथीमध्ये किंवा युद्धात ही जात नाहीत इतके बळी अपघातात जातात असे सांगितले गेले. त्यामुळे आता अपघात रोखण्यासाठी चळवळीची गरज भासू लागली आहे.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातDeathमृत्यू