शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

रस्ता सुरक्षा अभियान काळात ५० जणांचा बळी, सांगलीत अपघातांचे प्रमाण वाढले

By घनशाम नवाथे | Updated: February 7, 2025 16:08 IST

उसाच्या ट्रॅक्टरचे आठ बळी

घनशाम नवाथे सांगली : पूर्वी रस्ता सुरक्षा सप्ताह राबवला जात होता. नंतर सप्ताहाचा पंधरवडा झाला. आता महिनाभर रस्ता सुरक्षा अभियान राबवले गेले. परंतु या महिन्यात जिल्ह्यात एक दोन नव्हे तर तब्बल ५० जणांचा अपघाती बळी गेला. त्यामुळे हे अभियान सतत राबवण्याची आवश्यक आहे. वाढते अपघात रोखण्यासाठी सामाजिक चळवळ उभी राहण्याची गरज भासू लागली आहे.जिल्ह्यात पूर्वी वारंवार अपघात होणारे जवळपास ६० ते ७० ‘ब्लॅक स्पॉट’ होते. याठिकाणी वर्षानुवर्षे अपघाताचा धोका दर्शवणारे फलक होते. परंतु अपघातस्थळे नष्ट करण्यात आली नव्हती. न्यायालयाच्या आदेशानुसार सर्वत्र अपघात स्थळे नष्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. जिल्ह्यातील अपघात स्थळे नष्ट करण्यासाठी प्रयत्न झाले. त्यामुळे सध्या केवळ बोटावर मोजण्याइतपत अपघातस्थळे कायम आहेत.

एकीकडे अपघातस्थळे नष्ट केली जात असून रस्तेही मोठे झाले आहेत. पूर्वी नादुरुस्त रस्ते, खड्डे, गतिरोधक आदी कारणामुळे अपघात होत होते. परंतु आता मानवी चुकांमुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. वाहतुकीच्या नियमाचे पालन न करणे, बेदरकारपणे वाहन चालवणे, नशेत वाहन चालवणे आदी कारणामुळे अपघात होऊ लागलेत.नुकतेच जानेवारी महिन्यात रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात आले. आरटीओ, पोलिस, सार्वजनिक बांधकाम विभाग आदींच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवले गेले. परंतु याच महिन्याच्या काळात तब्बल ५० जणांचा अपघाती बळी गेला. तर शंभरहून अधिक जण जखमी झाले आहेत. त्यामुळे हे अभियान आता महिन्यापुरते नव्हे तर वर्षभर सामाजिक चळवळ म्हणून राबवण्याची गरज आहे.

उसाच्या ट्रॅक्टरचे आठ बळीरस्ता सुरक्षा अभियानात उसाच्या ट्रॅक्टरला रिफ्लेक्टर लावण्याची मोहीम हाती घेण्यात आली. परंतु ती शंभर टक्के पूर्ण झाली नाही. त्यामुळेच जानेवारी महिन्यात उसाच्या ट्रॅक्टर, ट्रॉलीमुळे आठ जणांचा बळी गेला. तसेच त्यापेक्षा जास्त वाहन चालक जखमी झाले. ट्रॅक्टर मालक, चालकांच्या बेदरकारपणामुळे दरवर्षी अनेकांचा बळी जातो.

जत तालुक्यात अपघात वाढलेजानेवारी महिन्यात जत तालुक्यात आठ जणांचा अपघाती बळी गेला. त्यापाठोपाठ इस्लामपूरमध्ये सहा जणांचा अपघातात मृत्यू झाला. भिलवडी (५), आटपाडी (४), तासगाव (३), विटा (३), कडेगाव (३), पलूस (३) याप्रमाणे १८ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ५० जणांचा बळी गेला.

अपघाताची कारणेचुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे, वेगाने वाहन चालवणे, दारू पिऊन वाहन चालवणे, स्वत: बद्दल फाजिल आत्मविश्वास बाळगून वाहन चालवणे, हेल्मेट न वापरणे, सीटबेल्ट न लावणे आदी प्रमुख कारणांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून येते.

आजार, युद्धापेक्षा जास्त बळीरस्ता सुरक्षा अभियानाच्या प्रारंभी जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांनी अपघाताचे प्रमाण वाढल्याबद्दल चिंता व्यक्त केली. एखाद्या आजाराच्या साथीमध्ये किंवा युद्धात ही जात नाहीत इतके बळी अपघातात जातात असे सांगितले गेले. त्यामुळे आता अपघात रोखण्यासाठी चळवळीची गरज भासू लागली आहे.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातDeathमृत्यू