शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

सांगली जिल्ह्यात २२ हजार हेक्टरवरील पिकांची ४२ कोटींची हानी, शासनाकडे अहवाल जाणार

By अशोक डोंबाळे | Updated: November 25, 2022 12:32 IST

भरपाईसाठी ४२ कोटी २५ लाख ८५ हजार रुपयांचा निधी लागणार

सांगली : जिल्ह्यात सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे ४५ हजार ८६८ शेतकऱ्यांचे २१ हजार ८८७.३५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना भरपाईसाठी ४२ कोटी २५ लाख ८५ हजार रुपयांचा निधी लागणार आहे. यासंबंधीचा अहवाल जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे पाठविला आहे.जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली होती. वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. प्रशासनाने दि. २४ नोव्हेंबर २०२२ रोजी अतिवृष्टी, अतिपावसामुळे नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्याचा अहवाल अंतिम केला आहे. यामध्ये शिराळा तालुक्यातील एकाही शेतकऱ्याचे नुकसान झाले नाही. उर्वरित नऊ तालुक्यांतील ४५ हजार ८६८ शेतकऱ्यांच्या २१ हजार ८८७.३५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे.या नुकसान भरपाईसाठी जिल्हा प्रशासनाने ४२ कोटी २५ लाख १५ हजार रुपये निधीची मागणी शासनाकडे केली आहे. यामध्ये जिरायत पिकाखालील २८ हजार ४९४ शेतकऱ्यांचे १४ हजार २७१.६२ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून त्यासाठी १९ कोटी ४२ लाख ७८ हजार रुपये लागणार आहेत. तसेच बागायत पिकाखालील बाधित क्षेत्र पाच हजार ७४.४९ हेक्टर क्षेत्रातील ११ हजार ९४६ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे.या शेतकऱ्यांच्या भरपाईसाठी १३ कोटी ७१ लाख ११२ रुपये निधीची गरज आहे. ५ हजार ४२८ शेतकऱ्यांचे २ हजार ५३३.२४ हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष, डाळींब, केळी, पेरु, नारळ, पपई या फळ पिकांचे नुकसान झाले आहे. यासाठी ९ कोटी ११ लाख ९६६ रुपये निधी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे मागितला आहे.

खरीप पिकावर रोटाव्हेटर फिरवला त्यांचे काय ?खरीप हंगामातील सोयाबीन, मका, ज्वारी, तूर, भुईमूग, उडीद, मूग, सूर्यफूल, बाजरी, हरभरा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करण्याची वाट पाहून अनेक शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर फिरवून रब्बीची पेरणी केली. या पिकाचे पंचनामे झाले नाहीत. या शेतकऱ्यांना शासनाकडून न्याय देण्याची गरज आहे. परंतु, प्रशासनाने पिकच नसल्यामुळे आम्ही पंचनामे करणार नाही, असा पवित्रा घेतला आहे.

खरीप पिकांचे तालुकानिहाय क्षेत्र

तालुकाशेतकरी संख्याक्षेत्र हेक्टरअपेक्षित निधी (लाखात)
मिरज२१३७ १४१८.३१३६२.३३०
वाळवा४२२५१३२४.७१३६१.०३७
पलूस१५८४७५३.३७२०५.२२०
खानापूर४५२७१५६६.९०२४१.५६९
कडेगाव२८४७५.९३१५.२३९
तासगाव१७९६९१०४८१.२७१४६३.५६६
आटपाडी९८४२.६० १५.३३६
जत४०९९१७१७.६५३९१.२८८
क.महांकाळ१०९४५४५०३.५३ ११६९.५७१
एकूण४५८६८२१८८७.३५४२२५.१५७
टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी