शहरं
Join us  
Trending Stories
1
EXIT POLL मध्ये ठाकरे बंधूंना धक्का, संजय राऊतांचा खळबळजनक दावा; 'त्या' बैठकीत काय शिजलं?
2
PMC Election Exit Poll 2026: पुण्यात भाजपाच राहणार की, राष्ट्रवादी बसणार सत्तेत, कौल कुणाला?
3
मोठा दणका! निवडणूक ड्युटीवर 'दांडी' मारणाऱ्या १५५ कर्मचाऱ्यांवर छत्रपती संभाजीनगरात गुन्हा
4
BMC Election 2026: ३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा EXIT POLL
5
'निवडणूक मतदान प्रक्रियेत क्रांतिकारी बदल झाले पाहिजेत'; सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टच सांगितलं
6
Maharashtra BMC Election Exit Poll Result Live: मुंबईत ठाकरेंना झटका बसणार, युतीला किती जागा मिळणार?
7
TMC Election 2026 Exit Poll: ठाण्यात शिंदेसेना मारणार मुंसडी! उद्धवसेना, भाजपाला किती जागा मिळणार?
8
iPhone: आणखी स्वस्त झाला आयफोन; रिपब्लिक सेलआधीच मोठा धमाका! कुठं मिळतोय इतका स्वस्त?
9
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
10
महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान? मुंबईच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष
11
"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?
12
 10 Minute Delivery: १० मिनिटांत डिलिव्हरी बंद, पण 'इन्सेंटिव्ह'साठी जीवघेणी शर्यत सुरूच! 
13
मतदान सुरू असतानाच जळगाव शहरात गोळीबार; प्रकरण काय, पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
14
भयंकर, अटल आणि असह्य; लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर'चा नवीन व्हिडीओ आला समोर, पाकिस्तानचा विध्वंस
15
Vijay Hazare Trophy 1st Semi Final : करुण नायरची कडक खेळी; पण Ex समोर शतकी डाव फसला अन्... (VIDEO)
16
दोन मुलांचा बाप अन् ६ वर्ष लहान... फुटबॉलच्या मैदानातील 'गोलमेकर'ला डेट करतेय नोरा फतेही!
17
ऑपरेशन सिंदूरचा धसका! २२ मिनिटांत ९ तळ उद्ध्वस्त; हाफिज रऊफने मान्य केली भारतीय सैन्याची ताकद
18
कंटेनरची Air India च्या विमानाला जोरदार धडक; दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला
19
"नवी मुंबईत बाहेरून लोक आणून..."; शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्केंचा भाजपावर गंभीर आरोप
20
धक्कादायक! दिल्लीत ५ दिवसांत दुसरी मोठी सायबर फसवणूक; 'डिजिटल अरेस्ट' करुन महिलेची ७ कोटी रुपयांना फसवणूक
Daily Top 2Weekly Top 5

६५ हजार हेक्टर शेतीला दणका--अतिवृष्टीमुळे १८ हजार हेक्टरवरील पिके कुजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 19:25 IST

खरिपाची पिके हातातून गेली आणि रब्बीच्या पेरण्या करताच आल्या नाहीत, अशा दुहेरी संकटात शेतकरी अडकला आहे. रब्बीच्या ज्वारी, हरभरा, गहू आदी पेरण्या आता कोठे सुरू झाल्यात. ७०५ पैकी तब्बल ५७३ गावे अवकाळीच्या फेºयात अडकली. सव्वा लाख शेतकऱ्यांना कोट्यवधींचा फटका बसला.

ठळक मुद्देआॅक्टोबरच्या पावसाने सर्वाधिक हानी केल्याचे स्पष्ट झाले आहे. अजूनही ११ हजार २०७ हेक्टरचे पंचनामे व्हायचे आहेत.खानापूर तालुक्यातील शेतकºयांसाठी खरीप हंगाम महत्त्वाचा समजला जातो. त्यामुळे येथील शेतकºयांनी जून महिन्याच्या अखेरीस खरीप पेरण्या पूर्ण केल्या होत्या.

संतोष भिसे ।सांगली : सलग चार महिने कोसळलेल्या पावसामुळे जिल्ह्याच्या कृषीक्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे. बागायत शेतीची दशकभराची पिछेहाट झाली असून, शेकडो एकर द्राक्षबागा यंदा सोडून द्याव्या लागल्या आहेत. शासनयंत्रणा प्रत्यक्ष मदतीऐवजी अद्याप पंचनाम्यातच गुंतली आहे. विशेष म्हणजे तब्बल लाखभर शेतकऱ्यांचा पीकविमाच नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

खरिपाची पिके हातातून गेली आणि रब्बीच्या पेरण्या करताच आल्या नाहीत, अशा दुहेरी संकटात शेतकरी अडकला आहे. रब्बीच्या ज्वारी, हरभरा, गहू आदी पेरण्या आता कोठे सुरू झाल्यात. ७०५ पैकी तब्बल ५७३ गावे अवकाळीच्या फेºयात अडकली. सव्वा लाख शेतकऱ्यांना कोट्यवधींचा फटका बसला. पंचनामे अजूनही सुरूच आहे.

अतिवृष्टीमुळे १८ हजार हेक्टरवरील पिके कुजलीविटा : गेल्या दोन ते तीन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीचा खानापूर तालुक्यातील शेतकºयांना मोठा फटका बसला असून, परतीच्या पावसाने हाता-तोंडाला आलेली  सुमारे १८ हजार हेक्टर क्षेत्रातील    पिके कुजली आहेत. या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका खरीप ज्वारीला बसला असून, १३ हजार हेक्टर क्षेत्रातील खरीप ज्वारी पूर्णपणे वाया गेल्याने शेतकºयांत चिंतेचे वातावरण पसरले आहे.

खानापूर तालुक्यातील शेतकºयांसाठी खरीप हंगाम महत्त्वाचा समजला जातो. त्यामुळे येथील शेतकºयांनी जून महिन्याच्या अखेरीस खरीप पेरण्या पूर्ण केल्या होत्या.   परंतु, आॅगस्ट महिन्यापासून पावसाने हाहाकार उडविला. या महिन्यात पोषक ठरलेला पाऊस नंतरच्या दोन महिन्यात मात्र बंद झाला नाही. त्यामुळे खरीप ज्वारी, सोयाबीन, द्राक्षबागा, भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

  • या अतिवृष्टीमुळे खानापूर तालुक्यातील १४ हजार ४५१ शेतकºयांची १२ हजार ९८३ हेक्टर क्षेत्रातील खरीप ज्वारी कुजून गेली आहे. पाऊस बंद झाला नसल्याने ज्वारीची कणसे उगवून ज्वारी काळी पडली आहे, तर सुमारे ३ हजार ७९ हेक्टरवरील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील १ हजार ६४२ बाधित शेतकºयांच्या १ हजार १८० हेक्टर क्षेत्रातील भाजीपालाही परतीच्या पावसाने नष्ट झाला आहे. तसेच १ हजार ७९८ शेतकºयांच्या ९८४ हेक्टर क्षेत्रातील फळपिकेही पावसाने वाया गेली आहेत.

 

  • सव्वा लाख शेतकºयांनी ३ लाख ७७ हजार ११९ हेक्टर पेरण्या केल्या होत्या; त्यापैकी ६५ हजार २६७ हेक्टर शेतीचे कंबरडे पावसाने मोडले. पाऊस थांबताच पंचनामे सुरू झाले. आजवर ९५ हजार ८८१ शेतकºयांच्या ५४ हजार हेक्टर शेतीचे पंचनामे पूर्ण झालेत. आॅक्टोबरच्या पावसाने सर्वाधिक हानी केल्याचे स्पष्ट झाले आहे. अजूनही ११ हजार २०७ हेक्टरचे पंचनामे व्हायचे आहेत. 
टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीfloodपूर