शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर, काही दिवसांपासून आयसीयूमध्ये सुरु आहेत उपचार; चाहते चिंतेत
3
दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा
5
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी
6
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
7
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
8
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
9
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
10
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
11
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
13
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
14
Manifestation: लाल पेन, पांढरा कागद, ११ नोव्हेंबरला इच्छापूर्तीसाठी Manifest करा ११:११ चे पोर्टल!
15
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
16
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
17
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
18
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
19
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
20
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी

राजारामबापू कारखान्याकडून ३0 कोटींचा अपहार : गौतम पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 15:09 IST

राजारामबापू पाटील कारखान्याने सर्वोदय कारखान्याच्या नावाचा वापर करत बनावट कागदपत्रे, लेटरहेड, शिक्के आणि बनावट सह्या करुन सर्वोदयच्या नावाने पेट्रोलियम पदार्थांची खरेदी, तर राजारामबापू कारखान्याच्या नावाने विक्री करून २५ ते ३0 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप माजी नगरसेवक गौतम पवार यांनी केला. ही फसवणूक आणि अपहाराबद्दल येत्या चार दिवसात गुन्हा दाखल न झाल्यास आष्टा पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

ठळक मुद्देराजारामबापू कारखान्याकडून ३0 कोटींचा अपहार माजी नगरसेवक गौतम पवार यांनी केला आरोप

इस्लामपूर : राजारामबापू पाटील कारखान्याने सर्वोदय कारखान्याच्या नावाचा वापर करत बनावट कागदपत्रे, लेटरहेड, शिक्के आणि बनावट सह्या करुन सर्वोदयच्या नावाने पेट्रोलियम पदार्थांची खरेदी, तर राजारामबापू कारखान्याच्या नावाने विक्री करून २५ ते ३0 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप माजी नगरसेवक गौतम पवार यांनी केला. ही फसवणूक आणि अपहाराबद्दल येत्या चार दिवसात गुन्हा दाखल न झाल्यास आष्टा पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.येथील भाजपच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार बैठकीत पवार बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष व जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष निशिकांत पाटील, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते.पवार म्हणाले, सर्वोदय कारखान्याच्या पेट्रोल पंपावरील अपहारप्रकरणी राजारामबापू कारखान्याच्या सर्व संचालकांसह कार्यकारी संचालक आणि सरव्यवस्थापक जबाबदार आहेत. या सर्वांनी संगनमत करुन २५ ते ३0 कोटी रुपयांचा अपहार केला आहे. पेट्रोलियम पदार्थांची व उपपदार्थांची खरेदी सर्वोदय कारखाना करत असल्याचे भासवून इंडियन आॅईल कॉर्पोरेशनचीही फसवणूक केली आहे. याबाबत आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज दिला आहे.ते म्हणाले, आमदार जयंत पाटील यांनी भावनिक होऊन आमच्या कारखान्याशी करार केला होता. त्यानंतर काही काळातच करारातील नियमावली पाळली नाही. कराराप्रमाणे देय असणारी रक्कम देण्याची तयारी होती. मात्र त्यांनी टाळाटाळ केली. पुढे जबरदस्तीने कायद्याचे व कराराचे उल्लंघन करुन कारखान्यासह संबंधित संस्थाही ताब्यात घेतल्या. उच्च न्यायालयाने, सर्वोदयप्रकरणी महाराष्ट्र शासनाने निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले.

त्यानुसार शासनाने हा कारखाना कायदेशीररित्या आमच्या ताब्यात देण्यासाठी प्रक्रिया सुरु केली. मात्र या प्रक्रियेला स्थगिती मळविण्यासाठी राजारामबापूच्या व्यवस्थापनाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तेथेही त्यांचे वकील वेगवेगळी कारणे सांगून गैरहजर राहत आहेत. या हंगामात कारखाना सुरू होेऊ नये, असा त्यांचा प्रयत्न आहे. ऊस उत्पादक व कामगारांचे मोठे नुकसान होत आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत हा हंगाम आम्ही सुरु करणार आहोत.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेSangliसांगली