शहरं
Join us  
Trending Stories
1
निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
2
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
3
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
4
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
5
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
6
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
7
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
8
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
9
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
10
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
11
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
12
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
13
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
14
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
15
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
16
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
17
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
18
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
19
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
20
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल

राजारामबापू कारखान्याकडून ३0 कोटींचा अपहार : गौतम पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 15:09 IST

राजारामबापू पाटील कारखान्याने सर्वोदय कारखान्याच्या नावाचा वापर करत बनावट कागदपत्रे, लेटरहेड, शिक्के आणि बनावट सह्या करुन सर्वोदयच्या नावाने पेट्रोलियम पदार्थांची खरेदी, तर राजारामबापू कारखान्याच्या नावाने विक्री करून २५ ते ३0 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप माजी नगरसेवक गौतम पवार यांनी केला. ही फसवणूक आणि अपहाराबद्दल येत्या चार दिवसात गुन्हा दाखल न झाल्यास आष्टा पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

ठळक मुद्देराजारामबापू कारखान्याकडून ३0 कोटींचा अपहार माजी नगरसेवक गौतम पवार यांनी केला आरोप

इस्लामपूर : राजारामबापू पाटील कारखान्याने सर्वोदय कारखान्याच्या नावाचा वापर करत बनावट कागदपत्रे, लेटरहेड, शिक्के आणि बनावट सह्या करुन सर्वोदयच्या नावाने पेट्रोलियम पदार्थांची खरेदी, तर राजारामबापू कारखान्याच्या नावाने विक्री करून २५ ते ३0 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप माजी नगरसेवक गौतम पवार यांनी केला. ही फसवणूक आणि अपहाराबद्दल येत्या चार दिवसात गुन्हा दाखल न झाल्यास आष्टा पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.येथील भाजपच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार बैठकीत पवार बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष व जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष निशिकांत पाटील, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते.पवार म्हणाले, सर्वोदय कारखान्याच्या पेट्रोल पंपावरील अपहारप्रकरणी राजारामबापू कारखान्याच्या सर्व संचालकांसह कार्यकारी संचालक आणि सरव्यवस्थापक जबाबदार आहेत. या सर्वांनी संगनमत करुन २५ ते ३0 कोटी रुपयांचा अपहार केला आहे. पेट्रोलियम पदार्थांची व उपपदार्थांची खरेदी सर्वोदय कारखाना करत असल्याचे भासवून इंडियन आॅईल कॉर्पोरेशनचीही फसवणूक केली आहे. याबाबत आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज दिला आहे.ते म्हणाले, आमदार जयंत पाटील यांनी भावनिक होऊन आमच्या कारखान्याशी करार केला होता. त्यानंतर काही काळातच करारातील नियमावली पाळली नाही. कराराप्रमाणे देय असणारी रक्कम देण्याची तयारी होती. मात्र त्यांनी टाळाटाळ केली. पुढे जबरदस्तीने कायद्याचे व कराराचे उल्लंघन करुन कारखान्यासह संबंधित संस्थाही ताब्यात घेतल्या. उच्च न्यायालयाने, सर्वोदयप्रकरणी महाराष्ट्र शासनाने निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले.

त्यानुसार शासनाने हा कारखाना कायदेशीररित्या आमच्या ताब्यात देण्यासाठी प्रक्रिया सुरु केली. मात्र या प्रक्रियेला स्थगिती मळविण्यासाठी राजारामबापूच्या व्यवस्थापनाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तेथेही त्यांचे वकील वेगवेगळी कारणे सांगून गैरहजर राहत आहेत. या हंगामात कारखाना सुरू होेऊ नये, असा त्यांचा प्रयत्न आहे. ऊस उत्पादक व कामगारांचे मोठे नुकसान होत आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत हा हंगाम आम्ही सुरु करणार आहोत.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेSangliसांगली