शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

महापूर नियंत्रणासाठी २७ पानी अहवाल सादर, सांगलीत आजपासून साखळी उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 13:31 IST

प्रशासनाचा हलगर्जीपणा ठरतोय मारक

सांगली : सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांतील महापूर नियंत्रणासाठी नागरी कृती समितीने २७ पानांचा अभ्यास अहवाल शासनाला सादर केला आहे. त्यातील शिफारशींकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारपासून (दि. २२) कार्यकर्ते व पूरग्रस्त भागातील नागरिक सांगलीत साखळी उपोषण करणार आहेत.सकाळी ११ वाजता आरती गणपती करून मंदिरासमोर आंदोलनाची सुरुवात होईल. समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील यांनी सांगितले की, महापुरामुळे पश्चिम महाराष्ट्राची अब्जावधी रुपयांची हानी झाली आहे. महापुरावर नियंत्रण करता येऊ शकते असा समितीचा दावा आहे. त्यासाठी शास्त्रशुद्ध अभ्यास केला आहे. अभ्यासाअंती आढळलेली निरीक्षणे, उपायांचा अहवाल मुख्य सचिव व जलसंपदाच्या सचिवांना सादर केला आहे. त्यातील शिफारशींची अंमलबजावणी केल्यास पूर नियंत्रण आणता येईल. त्यासाठी बिनखर्चाचे आणि खर्चाचेही पर्याय सुचविले आहेत.पाटील म्हणाले, अहवालासाठी जलअभ्यासक, शास्त्रज्ञ, अभियंते, स्पंदन संस्था, आंदोलन अंकुश, शिवाजी विद्यापीठ, ज्येष्ठ नागरिकांचे अनुभव, ड्रोन सर्वेक्षण, कंटूर सर्वेक्षण, प्रत्यक्ष नदीकाठावरील परिस्थितीचा अभ्यास आदींचा आधार घेतला आहे. त्यातील शिफारशी वास्तवाशी निगडीत आहेत. राज्य शासन व पाटबंधारेने काही शिफारशींची अंमलबजावणी केली, मात्र बऱ्याच बाबींवर कार्यवाही झालेली नाही.याकडे लक्ष वेधण्यासाठीच नागरी साखळी उपोषणाची हाक दिली आहे. शिरोळमधून "आंदोलन अंकुश" चे कार्यकर्तेही सहभागी होणार आहेत. यावेळी विजयकुमार दिवाण, प्रभाकर केंगार, प्रदीप वायचळ, हणमंतराव पवार, संजय कोरे, नीलेश पवार, सचिन सगरे, दिनकर पवार आदी उपस्थित होते.

प्रशासनाचा हलगर्जीपणा ठरतोय मारक

समितीने दावा केला की, धरण व्यवस्थापनाविषयी केंद्र सरकारच्या काही नियमांवर अंकुश गरजेचा आहे. मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे. राज्याची व जिल्ह्याची महापूर नियंत्रण सुरक्षा समिती अद्याप गठीत केलेली नाही. अलमट्टी धरणातील पाणीसाठा व विसर्गाविषयी नियमांचे पालन कर्नाटक सरकार करत नाही. धरणांच्या एकात्मिक व्यवस्थापनाकडे कानाडोळा केला जातो. सांगलीत शामरावनगरमध्ये गेल्या पावसाळ्यातील पाण्याचा निचरा अजूनही झालेला नाही. नाले स्वच्छ केलेले नाहीत. रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाखालून पाण्याला वाट ठेवलेली नाही. बेंच मार्क चुकीचे आहेत. बंधाऱ्यांतील बरंगे पावसाळ्यापूर्वी वेळेवर काढले व बसविले जात नाहीत..

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरfloodपूर