शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
3
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
4
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
5
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
6
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
7
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
8
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
9
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
11
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
12
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
13
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
14
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
15
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
16
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
17
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
18
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
19
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
20
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."

कारगिलमधील वीर पुत्रांच्या बलिदानाला २५ वर्षे पूर्ण; सांगली जिल्ह्यातील सुरेश चव्हाण, महादेव पाटील यांना वीरगती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 12:49 IST

सांगली : सांगली जिल्हा म्हणजे क्रांतिकारकांची भूमी. स्वातंत्र्य चळवळीत अनेकांनी प्राणांची आहुती दिली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही सांगली सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला ...

सांगली : सांगली जिल्हा म्हणजे क्रांतिकारकांची भूमी. स्वातंत्र्य चळवळीत अनेकांनी प्राणांची आहुती दिली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही सांगली सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. आजवर जिल्ह्यातील १६० सुपुत्र भारतमातेचे रक्षण करताना शहीद झाले. सद्य:स्थितीत जवळपास २० हजार सैनिक सैन्यदलात कार्यरत आहेत, तर तेवढेच माजी सैनिक आहेत. याच जिल्ह्यातील करोली टी (ता. कवठेमहांकाळ) चे जवान सुरेश चव्हाण आणि वडगाव (ता. तासगाव) चे महादेव पाटील हे १९९९ च्या कारगिल युद्धात शहीद झाले. त्यांच्या युद्धातील पराक्रमाला २५ वर्षे झाली. या वीर पुत्रांचे बलिदान आजही स्मरणात राहते.१९९९ च्या मे महिन्यात पाकिस्तानी सैन्याने भारतीय हद्दीत घुसखोरी केली. कारगिल भागावर अतिक्रमण केले. पाकिस्तानी सैन्याला हुसकावून लावण्यासाठी तब्बल ६० दिवस युद्ध चालले. जवळपास ३० हजार भारतीय सैनिक युद्धात सहभागी झाले होते. पाकिस्तानी लष्करातील वेगवेगळ्या रेजिमेंट यामध्ये सहभागी होत्या. त्यांनी तोफखान्याचा वापर केला. रोज बॉम्बगोळे, गोळीबार असा दोन्ही बाजूंनी वर्षाव सुरू होता. भारताने कडवी झुंज देत निकराचा प्रतिकार केला. यामध्ये ५२७ जवान कामी आले, तर १३६३ जवान शहीद झाले. ऑपरेशन विजय ६० दिवसांनंतर यशस्वी झाले. २६ जुलै १९९९ रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला.

कारगिल युद्धात त्यावेळी जिल्ह्यातील काही सैनिक सहभागी होते. युद्धाचा प्रसंग पाहून सैनिकांच्या कुटुंबातील सदस्य चिंतेत होते. दुर्दैवी बातमी कानावर पडू नये, अशी त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक प्रार्थना करत होते. त्याचवेळी करोली टी (ता. कवठेमहांकाळ) चे वीर पुत्र हवालदार सुरेश गणपती चव्हाण हे महार रेजिमेंटमधून पाकिस्तानी सैन्याला मुकाबला करताना शर्थीची झुंज देत होते. त्यांनी व त्यांच्या रेजिमेंटने अतुलनीय शौर्य गाजवत शेकडो पाकड्यांना यमसदनी पाठवले. सुरेश चव्हाण हे तब्बल दोन महिने शत्रूशी लढत होते. दि. ४ जुलै रोजी ते धारातिर्थी पडले. त्यांच्या शहीद होण्याची वार्ता समजताच करोली टी नव्हे तर जिल्हा शोकसागरात बुडाला.कारगिल युद्ध संपण्याची सर्वांनाच प्रतीक्षा असताना जिल्ह्यात आणखी एक दुर्दैवी बातमी येऊन धडकली. वडगाव (ता. तासगाव) येथील पॅरा रेजिमेंटचे शिपाई महादेव नामदेव पाटील हे कारगिलमध्ये युद्धात पराक्रम गाजवत होते. त्याचवेळी शत्रूच्या हल्ल्यात दि. २४ जुलै १९९९ रोजी वीरगती प्राप्त झाली. त्यामुळे जिल्हा पुन्हा शोकसागरात बुडाला. जिल्ह्यातील या दोन वीर पुत्रांनी युद्धात गाजवलेल्या पराक्रमाला आणि त्यांच्या वीरगतीला दि. २६ जुलै रोजी २५ वर्षे होत आहेत. त्यांच्या पराक्रमाच्या आठवणीही आज स्मरणात आहेत.

शौर्याची परंपरास्वातंत्र्यपूर्व काळात जिल्ह्यातील क्रांतिकारकांनी ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडले. हीच शौर्याची परंपरा जिल्ह्याने जपली आहे. सैन्यदलात सद्य:स्थितीत २० हजारांहून अधिक जवान कार्यरत आहेत, तर देशसेवा बजावलेले तेवढेच माजी सैनिक जिल्ह्यात आहेत.

आजवर १६० शहीदभारत-पाक, भारत-चीन युद्धासह वेगवेगळ्या ऑपरेशनमध्ये जिल्ह्यातील वीर जवानांनी अतुलनीय शौर्य दाखवले आहे. आजवर १६० जवान शहीद झाले. ७० जणांना शौर्यपदक मिळाले.

टॅग्स :SangliसांगलीKargil Vijay Diwasकारगिल विजय दिन