‘राजारामबापू’चे २५ शेतकरी प्रशिक्षणासाठी रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:21 IST2021-01-14T04:21:11+5:302021-01-14T04:21:11+5:30
इस्लामपूर : राजारामबापू साखर कारखान्याच्यावतीने व्हीएसआय, पुणे यांच्या ‘ज्ञानयोग’या पाच दिवसांच्या प्रशिक्षण वर्गास राजारामबापू सहकारी साखर कारखान्याकडून २५ शेतकऱ्यांचे ...

‘राजारामबापू’चे २५ शेतकरी प्रशिक्षणासाठी रवाना
इस्लामपूर : राजारामबापू साखर कारखान्याच्यावतीने व्हीएसआय, पुणे यांच्या ‘ज्ञानयोग’या पाच दिवसांच्या प्रशिक्षण वर्गास राजारामबापू सहकारी साखर कारखान्याकडून २५ शेतकऱ्यांचे पथक रवाना झाले.
राजारामबापू कारखान्याच्या शेती समितीचे अध्यक्ष श्रेणीक कबाडे यांनी शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. कृषीभूषण पुरस्कार विजेते अशोक खोत, संजय पाटील, कोंडीराम माने, नीलेश पाटील, राहुल पाटील,जगन्नाथ धुमाळ, हणमंत पाटील, अशोक पाटील, मोहन लोहार, मयूर पाटील, शुभम माळी, योगेश शिंदे, महेश माने यांच्यासह अन्य शेतकऱ्यांचा समावेश आहे. नवनाथ सावंत हे व्यवस्थापन करणार आहेत.
यावेळी माजी संचालक शिवाजीराव साळुंखे, राजारामबापू ग्रुप ऑफ कंपनीचे उपाध्यक्ष सुभाषराव जमदाडे, मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील, जलसिंचन अधिकारी डी. एम. पाटील, मुख्य लेखापाल अमोल पाटील, ऊस विकास अधिकारी सुजय पाटील उपस्थित होते.
फोटो - १३०१२०२१-आयएसएलएम-राजारामबापू न्यूज
ओळ : राजारामनगर येथे व्हीएसआयच्या प्रशिक्षणास रवाना होणाऱ्या शेतकऱ्यांना निरोप देण्यात आला. यावेळी श्रेणीक कबाडे, शिवाजी साळुंखे, सुभाष जमदाडे, प्रशांत पाटील, सुजय पाटील, डी. एम. पाटील, अमोल पाटील उपस्थित होते.