शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

राज्यातील २५ कुटुंबांकडे २०० साखर कारखान्यांची मक्तेदारी, रघुनाथदादा पाटील यांचा आरोप 

By अशोक डोंबाळे | Updated: June 24, 2023 15:34 IST

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी २६ जूनला सांगलीत शेतकरी संघटनेचा मेळावा

सांगली : राज्यातील २५ कुटुंबांकडेच २०० साखर कारखान्यांची मक्तेदारी असल्यामुळे ते ऊस उत्पादकांची संघटित पिळवणूक करत आहेत, असा आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी शुक्रवारी सांगलीतील पत्रकार परिषदेत केला. तसेच या साखर सम्राटांना धडा शिकविण्यासाठी साखर कारखाना आणि इथेनॉलसाठी २५ किलोमीटर अंतराची अट शासनाने शिथिल केली पाहिजे. शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठी दि. २६ जून रोजी सांगलीत शेतकरी मेळावा आयोजित केल्याचेही त्यांनी सांगितले.रघुनाथदादा पाटील म्हणाले, साखर कारखाना आणि इथेनॉल प्रकल्प उभा करण्यासाठी शासनाने अंतराची अट घातली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होत आहे. म्हणूनच २५ किलोमीटर अंतराची अट रद्द करण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. उत्तर प्रदेश, गुजरात राज्यांप्रमाणे शेतकऱ्यांना उसाचा दर मिळण्यासाठी शिल्लक असलेला एकच पर्याय आहे तो म्हणजे दोन साखर कारखान्यांतील अंतराची अट रद्द करणे.ऊस तोडणी मशिनसाठी प्रति टन ४११ रुपये दिले जातात आणि ऊसतोड मजुरांना २३० रुपये प्रति टन दिले जात आहेत. मशिनप्रमाणे ऊसतोड मजुरांनाही ४११ रुपये द्यावेत. तसेच गोपिनाथ मुंडे महामंडळासाठी ऊस उत्पादकांकडून प्रति टन १० रुपये कपात केली जात आहे, ती रद्द केली पाहिजे. शासनाने महामंडळाला थेट मदत करण्याची गरज आहे. शेती करताना ग्रामस्थांना वन्यप्राण्यांचा त्रास होत आहे. जिल्ह्यातील बहुतांशी भागात बिबट्याचे वास्तव्य आहे. बिबट्याने जनावरांवर व माणसांवर हल्ले केले आहेत. मूळच्या भारतीय संविधानात वन्यप्राणी संरक्षण कायदा नव्हता. नव्याने कायदा केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शिकारीवरील बंदी उठली तरच शेती करणे शक्य होईल, असेही ते म्हणाले.गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे शेतकरी आर्थिक संकटातशेतकऱ्यांच्या मुळावर असलेला गोवंश हत्याबंदी कायदा मुळापासून संपवला पाहिजे. याबद्दलही शेतकरी संघटनेकडून हा कायदा लागू झाल्यापासून आजपर्यंत वेगवेगळ्या जिल्ह्यांत जनजागरण सभा, मोर्चे शेतकरी, दलित, कुरेशी यांना घेऊन हा कायदा रद्द करण्याबाबत खटाटोप चालू आहे. गोवंश हत्याबंदी कायदा लागू झाल्यापासून शेतकरी ते विविध उद्योग करणाऱ्यावर बंधने आली आहेत. राजकीय पक्षांकडून मताच्या राजकारणासाठी या कायद्याचा उपयोग होत आहे. जर कायदा रद्द झाला नाही तर जनावरांची संख्या अत्यंत कमी होईल, असेही रघुनाथदादा पाटील म्हणाले.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखाने