शहरं
Join us  
Trending Stories
1
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
2
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
5
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
6
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
7
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
8
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
9
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
10
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
11
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
12
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
13
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
14
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील २२0७ विद्यार्थी संख्या घटली-शिक्षकांची शंभर पदे होणार रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 1:07 AM

सांगली : मागील दीड वर्षापासून प्रलंबित असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची संचमान्यता अखेर पूर्ण झाली. जानेवारी २०१८ अखेर विद्यार्थी संख्येनुसार संचमान्यता करण्यात आली

ठळक मुद्देशिक्षण उपसंचालकांकडून संचमान्यता निश्चित, अतिरिक्त शिक्षकांची रिक्त जागी वर्णी लागणार

सांगली : मागील दीड वर्षापासून प्रलंबित असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची संचमान्यता अखेर पूर्ण झाली. जानेवारी २०१८ अखेर विद्यार्थी संख्येनुसार संचमान्यता करण्यात आली असून, दोन हजार २०७ विद्यार्थी संख्या घटल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे जवळपास शंभर शिक्षकांची पदे कमी होणार आहेत.

जिल्हा परिषदेतील विद्यार्थी संख्येनुसार दरवर्षी सप्टेंबरअखेर पट निश्चिती केली जाते. चालू शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मध्ये निश्चिती झाली नव्हती. त्यानुसार संचमान्यताही रखडली होती. गेल्या तीन महिन्यांपासून संचनिश्चिती करण्याचे काम सुरू होते. अखेर जानेवारी २०१८ च्या पटसंख्येच्या विद्यार्थी संख्येनुसार संचमान्यता देण्यात आली. सप्टेंबर २०१६ मध्ये करण्यात आलेल्या पटसंख्येत एक लाख २६ हजार विद्यार्थी संख्या होती, ती एक लाख २३ हजार ७९३ आहे. दीड वर्षात दोन हजार २०७ विद्यार्थी संख्या घटल्याचे स्पष्ट झाले.

विद्यार्थी संख्या घटत चालल्यामुळे सुमारे शंभर शिक्षक अतिरिक्त झाले आहेत. या शिक्षकांना रिक्त पदांवर नियुक्त्या दिल्या जाणार आहेत.

शिक्षक, मुख्याध्यापकांची सहा हजार ४३१ पदे असून, पाच हजार ८०६ कार्यरत आहेत. संचमान्यतेनुसार ५२५ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामध्ये उपशिक्षकांची पाच हजार २४ पदे मंजूर आहेत. सध्या चार हजार ६४५ पदे कार्यरत आहेत. पदवधीर शिक्षक एक हजार ४९ असून, ९३१ कार्यरत, तर मुख्याध्यापकांची ३५८ पदे मंजूर असली तरी, २२० कार्यरत आहेत. संचमान्यता निश्चित झाल्याने शिक्षक समायोजन प्रक्रिया होणार आहे. मात्र ही समायोजन प्रकिया शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला करावी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करू नये, असे यापूर्वीचे आदेश आहेत. त्यामुळे समायोजन प्रक्रिया तात्काळ पूर्ण होणार का? याबाबत शिक्षकांत उत्सुकता असणार आहे.खासगी शाळांचा झेडपीच्या शाळांना फटकाखासगी अनुदानित शाळा १८०, विनाअनुदानित शाळा २२, कायम विनाअनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळा ८६ आणि स्वयंअर्थसहाय्यता शाळा १२४ अशा २३१ शाळांची संख्या झाली आहे. खासगी शाळांची संख्या वाढत चालल्याचा सर्वाधिक फटका जिल्हा परिषद शाळांना बसत असून, वर्षाला शंभर शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. भविष्यात या शिक्षकांच्या नोकऱ्याही टिकणे कठीण होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.