शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
2
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
3
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
4
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
5
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...
6
Swami Samartha: देवाजवळ दिवा लावताना काच फुटली, दिवा पडला तर स्वामींना करावी 'ही' प्रार्थना!
7
अतूट प्रेम! कोमात असलेल्या लेकीला शुद्धीवर आणण्यासाठी १० वर्ष आईने रोज केला डान्स अन्...
8
सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी! IT शेअर्समध्ये जोरदार खरेदी, एशियन पेंट्स टॉप गेनर, कुठे झाली घसरण?
9
Delhi Blast : "दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा
10
Shreeji Global FMCG Shares: पहिल्याच दिवशी शेअरची स्थिती खराब; १२५ रुपयांचा शेअर आला ९९ रुपयांवर, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ
11
बिहार निवडणुकीत NDA पराभूत झाल्यास निफ्टी ७% पर्यंत घसरू शकतो? ब्रोकरेज फर्मने दिला इशारा
12
सोनम-राजाचं लग्न ते बेवफाई अन् हत्या... सगळं समोर येणार! राजा रघुवंशी हत्या प्रकरणात कुणी दिली पहिली साक्ष?
13
जीएसटी रद्द झाल्यानं जीवन, आरोग्य विमा घेण्याचं प्रमाण वाढलं; प्रीमियम वाढून ३४,००७ कोटी रुपयांवर 
14
'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण?
15
दिल्ली नाही, टार्गेटवर होते अयोध्या-काशी; चौकशीत नवीन धक्कादायक माहिती समोर आली
16
Delhi Blast: शाहीन शाहीदचा महाराष्ट्रातील डॉ. हयात जफर सोबत घटस्फोट का झालेला, कोणत्या मुद्द्यावरून बिनसलेलं?
17
शेख हसीना बांगलादेशला परतण्यास तयार, परतीसाठीच्या अटी सांगितल्या; मोहम्मद युनूस यांच्यावर केली टीका
18
PM Modi: भूतानहून परतताच मोदींनी एलएनजेपी रुग्णालय गाठलं, दिल्ली बॉम्बस्फोटातील जखमींना भेटले!
19
दिल्ली स्फोटात 'डबल ॲटॅक'चा संशय! घटनास्थळी अमोनियम नायट्रेटसह 'दुसरे शक्तिशाली' स्फोटक आढळले
20
पार्सल, मनी ऑर्डर, इन्शुरन्स प्रीमिअम : सर्व कामं एका क्लिकवर; पोस्ट ऑफिसची नवी 'सेवा' 

कृष्णा नदीवर २१ पूल, मग कसा ओसरणार महापूर?, नवीन पूल जलसंपदा विभागाच्या परवानगीविनाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 18:41 IST

सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीवर सध्या पाच नवीन पुलांचे काम चालू असून यापैकी एकाही पुलास जलसंपदा विभागाचा परवानाच घेतलेला नाही.

अशोक डोंबाळे

सांगली : काँक्रिटीकरण, घाट बांधणी व त्यामुळे पात्राचा झालेला संकोच, नागरीकरणामुळे नदीपात्रात बांधलेले सुमारे २१ पूल व सांडवे, बिल्डरांनी बुजविलेल्या नाल्यांमुळे कृष्णा नदीला दिवसेंदिवस पुराचा धोका वाढला आहे. सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीवर सध्या पाच नवीन पुलांचे काम चालू असून यापैकी एकाही पुलास जलसंपदा विभागाचा परवानाच घेतलेला नाही.

शहरात निळी व लाल अशी पूररेषा रंगविली आहे. केंद्रीय जल आयोगाच्या निकषांनुसार, २५ वर्षांच्या परतीच्या पूर शक्यतेवर आधारित पूररेषा आखली आहे. निळ्या रेषेतील विभागात कोणतीही पक्क्या स्वरूपाची बांधकामे करण्यास मनाई आहे. हा विभाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून मानला जातो. लाल रेषेतील विभाग बंधनकारक क्षेत्र म्हणून मानला गेला असून, यात पूरपातळीच्या वर बांधकामांना मर्यादा घालून परवानगी दिली आहे. आपत्ती व्यवस्थापनातील तरतुदी, लोकांना सुरक्षितपणे व जलदरीत्या हलविण्याच्या तरतुदींच्या पालनाच्या अटी या विभागासाठी बंधनकारक आहेत.

प्रत्यक्षात या रेषांचा महापालिकेकडून कोठेच गांभीर्याने विचार होत नाही. पूरपट्ट्यात सिमेंटची जंगले उभी राहिली आहेत. नाले नगरसेवकांनीच भराव टाकून बंद केले आहेत. या पुराचे ज्या विभागाकडे नियंत्रण आहे, त्यांनीही सांगलीत कृष्णा घाटाच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली काँक्रिटीकरण केले आहे. नदीचे पात्र प्रचंड जाडीच्या थराने काँक्रीटमध्ये बांधून काढले आहे. नदीवर नवीन पूल बांधण्यासाठी जलसंपदा विभागाच्या परवानगीची गरज आहे. यासाठी नाशिक येथे स्वतंत्र विभाग कार्यरत आहे.

याबाबत विधिमंडळाने कायदा केला आहे. पण २०१८ मध्ये नवीन शासन आदेश काढला आहे. सार्वजनिक हितासाठी आणि जनतेची तातडीची मागणी असेल तर त्यासाठी जलसंपदा विभागाच्या परवानगीची गरज नाही, असे त्यात म्हटले आहे. याचाच आधार घेऊन सध्या कृष्णा नदीवर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नवीन पाच पुलांच्या बांधकामास सुरुवात झाली आहे. प्रवाहास अडथळा होईल, असे कोणतेही काम करणे बेकायदेशीरच आहे.

कृष्णा नदीवर कऱ्हाड ते कोल्हापूर जिल्ह्यातील नरसिंहवाडीपर्यंत २१ पूल आहेत. यामध्ये नवीन सहा पुलांचा समावेश आहे. त्यातील सांगलीत दहा किलोमीटरच्या अंतरावर हरिपूर, सांगली आयर्विन पूल आणि मौजे डिग्रज असे तीन पूल आहेत. हरिपूर आणि सांगलीच्या पुलाला सर्वाधिक धोका हरिपूरच्या पुराचा आहे. पाण्याच्या प्रवाहाचा विचार न करता हरिपूर आणि कोथळीच्या दोन्ही बाजूला मोठा भराव टाकून कृष्णा आणि वारणा नदीच्या संगमाला अडथळा केला आहे. या अडथळ्याची किंमत नदीकाठाला मोजावी लागणार आहे.

नदीवर पूल बांधण्यासाठी परवानगी घेतलीच पाहिजे. पण, २०१८ मध्ये नवीन शासन आदेशामध्ये सार्वजनिक हितासाठी नदीवर एखादा पूल तातडीने बांधण्यासाठी परवानगीची गरज नाही, असा उल्लेख आहे. यामुळे कृष्णा नदीवरील नवीन पूल बांधण्यासाठीचे प्रस्ताव आलेले नाहीत. -ज्योती देवकर, कार्यकारी अभियंता, जलसंपदा

 

नदीवर पूल बांधण्यासाठी जलसंपदा विभागाची परवानगी घेण्याबाबतचा विधिमंडळात कायदा झाला आहे. तो कायदा एखाद्या शासन आदेशाने बदलता येत नाही. त्यासाठी विधिमंडळातच दुरुस्त झाला पाहिजे. केवळ विकासाच्या नावाखाली पळवाट काढून नदीचा प्रवाह चुकीच्या पद्धतीने बंद केल्यामुळे पुराचा धोका वाढला आहे. -विजयकुमार दिवाण, सेवानिवृत्त अभियंता

टॅग्स :Sangliसांगलीriverनदीfloodपूर