शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून मिळालेले 2000 रुपये शेतीसाठी वापरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 12:12 IST

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात 2 हजार रुपये मिळाले आहेत. ही मदत आम्ही शेतीसाठी वापरणार, अशी प्रतिक्रिया मिरज तालुक्यातील पाटगाव तालुक्यातील लाभार्थी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देप्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून मिळालेले 2000 रुपये शेतीसाठी वापरणारपाटगावमधील लाभार्थींची प्रतिक्रिया

सांगली : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात 2 हजार रुपये मिळाले आहेत. ही मदत आम्ही शेतीसाठी वापरणार, अशी प्रतिक्रिया मिरज तालुक्यातील पाटगाव तालुक्यातील लाभार्थी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत प्रति अल्प व अत्यल्प भूधारकशेतकरी कुटुंबाला प्रति वर्ष 6 हजार रूपये इतके आर्थिक सहाय्य 3 टप्प्यांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यातील पहिला टप्पा जमा होण्याच्या कार्यवाहीला दि. 24 फेब्रुवारीपासून सुरवात झाली आहे.

मिरज तालुक्यातील पाटगाव येथील काही शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात 2 हजार रुपये जमा झाल्याचा संदेश भ्रमणध्वनीवर प्राप्त झाला आहे. त्यावर या लाभार्थींनी प्रतिक्रिया देत शासनाचे आभार मानले आहेत.पाटगावच्या नामदेव नाना चव्हाण यांच्या कुटुंबात पत्नी दोन अविवाहित मुले आणि एक अविवाहित मुलगी आहे. एक मुलगा आणि एका मुलीचा विवाह झाला आहे. त्यांची 54 गुंठे शेती आहे. शेतात शाळू, गहू ते लावतात. मात्र, शेती करताना निसर्गाच्या अनियमिततेचा फटका त्यांना अनेक वेळा बसला. त्यामुळे एवढे मोठे कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी ते शेतीसोबत मिरज एमआयडीसीत कामालाही जातात. त्यामुळे वर्षाला 6 हजार रुपये मिळणारी रक्कम त्यांना मदतपूर्ण ठरणार आहे.

यातील पहिल्या हप्त्यातील 2 हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. ही रक्कम शेतीसाठी बी-बियाणे याच्यासाठी पूरक ठरणार आहे. याबद्दल त्यांनी शासनाचे आभार व्यक्त केले आहेत.गजानन ज्ञानदेव सावंत यांचे वडील, पत्नी आणि मुलगा असे चौकोनी कुटुंब. त्यांना परंपरागत अर्धा एकर शेती मिळाली आहे. त्यात ते केळीची लागवड करतात. बारावी शिक्षण असूनही परंपरागत शेती ते करतात. त्याच्या जोडीला कपडे शिलाईचे कामही करतात.

सांगली येथे 24 फेब्रुवारीला प्रधानमंत्री किसान योजनेच्या उद्घाटन कार्यक्रमातच त्यांना त्यांची निवड झाल्याचा संदेश प्राप्त झाला. तर त्यांच्या बँकेत 2 हजार रुपये प्राप्त झाल्याचाही संदेश त्यांच्या भ्रमणध्वनीवर आला आहे. यातून शेतीसाठी त्यांच्या खिशातील काही रक्कम वाचणार आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.पाटगावमधीलच शिवाजी शंकर सावंत यांच्या घरी पत्नी, एक विवाहित व एक अविवाहित अशी 2 मुले, सून, 2 नातवंडे आहेत. त्यांची 27 गुंठे शेती असून, ते पूर्णवेळ शेती करतात. शेतात शाळू, सोयाबीन लागवड करतात. त्यांचे विवाहित चिरंजीव प्रकाश पंपावर कामाला जातो. तर एक मुलगा शिक्षण घेत आहे. त्यांच्या भ्रमणध्वनीवर 2 हजार रुपये जमा झाल्याचा संदेश प्राप्त झाल्याची माहिती प्रकाश सावंत यांनी दिली.

पाटगावचे 83 वर्षीय सदाशिव निवृत्ती पाटील यांनीही इतर शेतकऱ्यांप्रमाणे आपल्या खात्यावर पैसे जमा होतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. शासनाने योग्य वेळी मदत केली असून, आपल्या शेतीसाठी ती पूरक ठरणार असल्याची प्रतिक्रिया या शेतकऱ्यांनी दिली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीSangliसांगली