शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

सांगलीत ७९ वर्षांच्या ‘तरुणा’ची जलतरणात बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 00:04 IST

सांगली : वय वर्षे अवघे ७९... त्यांचा दिनक्रम सुरू होतो पहाटे आणि संपतो रात्री... दिवसभर स्विमिंग पूलवर मुलांना जलतरणाचे ...

सांगली : वय वर्षे अवघे ७९... त्यांचा दिनक्रम सुरू होतो पहाटे आणि संपतो रात्री... दिवसभर स्विमिंग पूलवर मुलांना जलतरणाचे धडे आणि स्वत: देशभरातील स्पर्धांमध्ये सहभाग... हा ७९ वर्षांचा तरुण म्हणजे उल्हास बाबूराव तामगावे. वय वाढल्यानंतर शारीरिक व्याधींनी त्रास होणे आलेच; पण त्यावरही मात करून तामगावे या वयातही देशभर जलतरणातील स्पर्धा गाजवित आहेत. आजवर शंभरावर सुवर्ण, रौप्य आणि कास्य पदकांचे ते मानकरी ठरले आहेत.मूळचे कवठेपिरानचे असलेल्या तामगावे यांना बालपणापासूनच जलतरणाची आवड होती. शिक्षणाच्या निमित्ताने सांगलीत आलेल्या तामगावेंनी ती आवड जोपासली, वाढवली. भिडे जलतरण केंद्रावर प्रशिक्षक म्हणून काम करत असताना, तेथे इतर मुलांना शिकविणाऱ्या आंतरराष्ट्रीय कोच एस. के. कावले यांच्याकडून जलतरणातील प्रकार आत्मसात केले. त्यानुसार फ्री स्टाईल, ब्रेस स्ट्रोक, बॅक स्ट्रोक आणि मिडले रिलेमध्ये त्यांनी प्राविण्य मिळविले. २००५ ला राजकोट येथे झालेल्या स्पर्धेत त्यांनी विक्रम प्रस्थापित केला. आजवर त्यांनी देशभर विविध शहरात झालेल्या जलतरण स्पर्धांमध्ये यश मिळविले आहे. बेंगळुरू, राजकोट, हैदराबाद, इंदोर, गुलबर्गा येथील सहभाग त्यांचा उल्लेखनीय आहे. त्यांनी आजवर ३० सुवर्ण, २५ रौप्य, तर कांस्य पदकांचीही कमाई केली आहे.सध्या वयाच्या ७९ व्या वर्षीही ते जलतरण क्षेत्रात कार्यरत आहेत. शहरातील आप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूलमध्ये ते जलतरण प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. सकाळी साडेआठपासून सायंकाळी पाचपर्यंत ते मुलांना जलतरणातील धडे देत असतात. शनिवार व रविवारी अधिक सराव करून त्यांनी जलतरणातील सराव कायम ठेवला आहे. तामगावे यांनी स्वत:तर क्रीडा प्रकारात प्राविण्य मिळविलेच शिवाय आपल्या दोन मुलींनाही त्यांनी खेळाडू बनविले. त्यांची कन्या अरुणाने जलतरणात राष्ट्रीय पातळीवर मजल मारली, तर दुसरी कन्या राजमती यांनी हॉकीमध्ये राष्ट्रीय स्तरावर आपली चमक दाखविली आहे. त्यांच्या पत्नी इंदूमती यांचे बारकाईने लक्ष असते.पूर्ण शाकाहार आणि सरावात सातत्य हेच यशाचे गमकवयाच्या ७९ व्या वर्षीही जलतरण स्पर्धेत सहभागी होणाºया उल्हास तामगावे यांना याचे गमक विचारले असता, त्यांनी पूर्ण शाकाहारी असणे व सरावातील सातत्यतेवर भर दिला. पूर्ण शाकाहाराबरोबरच मर्यादीत सकस आहार, मोड आलेल्या धान्याचा वापर आणि पूर्ण वर्ज्य केलेल्या भातामुळे शरीरयष्टी अद्याप दणकट असल्याचे सांगितले.