शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

सांगलीत ७९ वर्षांच्या ‘तरुणा’ची जलतरणात बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 00:04 IST

सांगली : वय वर्षे अवघे ७९... त्यांचा दिनक्रम सुरू होतो पहाटे आणि संपतो रात्री... दिवसभर स्विमिंग पूलवर मुलांना जलतरणाचे ...

सांगली : वय वर्षे अवघे ७९... त्यांचा दिनक्रम सुरू होतो पहाटे आणि संपतो रात्री... दिवसभर स्विमिंग पूलवर मुलांना जलतरणाचे धडे आणि स्वत: देशभरातील स्पर्धांमध्ये सहभाग... हा ७९ वर्षांचा तरुण म्हणजे उल्हास बाबूराव तामगावे. वय वाढल्यानंतर शारीरिक व्याधींनी त्रास होणे आलेच; पण त्यावरही मात करून तामगावे या वयातही देशभर जलतरणातील स्पर्धा गाजवित आहेत. आजवर शंभरावर सुवर्ण, रौप्य आणि कास्य पदकांचे ते मानकरी ठरले आहेत.मूळचे कवठेपिरानचे असलेल्या तामगावे यांना बालपणापासूनच जलतरणाची आवड होती. शिक्षणाच्या निमित्ताने सांगलीत आलेल्या तामगावेंनी ती आवड जोपासली, वाढवली. भिडे जलतरण केंद्रावर प्रशिक्षक म्हणून काम करत असताना, तेथे इतर मुलांना शिकविणाऱ्या आंतरराष्ट्रीय कोच एस. के. कावले यांच्याकडून जलतरणातील प्रकार आत्मसात केले. त्यानुसार फ्री स्टाईल, ब्रेस स्ट्रोक, बॅक स्ट्रोक आणि मिडले रिलेमध्ये त्यांनी प्राविण्य मिळविले. २००५ ला राजकोट येथे झालेल्या स्पर्धेत त्यांनी विक्रम प्रस्थापित केला. आजवर त्यांनी देशभर विविध शहरात झालेल्या जलतरण स्पर्धांमध्ये यश मिळविले आहे. बेंगळुरू, राजकोट, हैदराबाद, इंदोर, गुलबर्गा येथील सहभाग त्यांचा उल्लेखनीय आहे. त्यांनी आजवर ३० सुवर्ण, २५ रौप्य, तर कांस्य पदकांचीही कमाई केली आहे.सध्या वयाच्या ७९ व्या वर्षीही ते जलतरण क्षेत्रात कार्यरत आहेत. शहरातील आप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूलमध्ये ते जलतरण प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. सकाळी साडेआठपासून सायंकाळी पाचपर्यंत ते मुलांना जलतरणातील धडे देत असतात. शनिवार व रविवारी अधिक सराव करून त्यांनी जलतरणातील सराव कायम ठेवला आहे. तामगावे यांनी स्वत:तर क्रीडा प्रकारात प्राविण्य मिळविलेच शिवाय आपल्या दोन मुलींनाही त्यांनी खेळाडू बनविले. त्यांची कन्या अरुणाने जलतरणात राष्ट्रीय पातळीवर मजल मारली, तर दुसरी कन्या राजमती यांनी हॉकीमध्ये राष्ट्रीय स्तरावर आपली चमक दाखविली आहे. त्यांच्या पत्नी इंदूमती यांचे बारकाईने लक्ष असते.पूर्ण शाकाहार आणि सरावात सातत्य हेच यशाचे गमकवयाच्या ७९ व्या वर्षीही जलतरण स्पर्धेत सहभागी होणाºया उल्हास तामगावे यांना याचे गमक विचारले असता, त्यांनी पूर्ण शाकाहारी असणे व सरावातील सातत्यतेवर भर दिला. पूर्ण शाकाहाराबरोबरच मर्यादीत सकस आहार, मोड आलेल्या धान्याचा वापर आणि पूर्ण वर्ज्य केलेल्या भातामुळे शरीरयष्टी अद्याप दणकट असल्याचे सांगितले.