शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

सांगलीत ७९ वर्षांच्या ‘तरुणा’ची जलतरणात बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 00:04 IST

सांगली : वय वर्षे अवघे ७९... त्यांचा दिनक्रम सुरू होतो पहाटे आणि संपतो रात्री... दिवसभर स्विमिंग पूलवर मुलांना जलतरणाचे ...

सांगली : वय वर्षे अवघे ७९... त्यांचा दिनक्रम सुरू होतो पहाटे आणि संपतो रात्री... दिवसभर स्विमिंग पूलवर मुलांना जलतरणाचे धडे आणि स्वत: देशभरातील स्पर्धांमध्ये सहभाग... हा ७९ वर्षांचा तरुण म्हणजे उल्हास बाबूराव तामगावे. वय वाढल्यानंतर शारीरिक व्याधींनी त्रास होणे आलेच; पण त्यावरही मात करून तामगावे या वयातही देशभर जलतरणातील स्पर्धा गाजवित आहेत. आजवर शंभरावर सुवर्ण, रौप्य आणि कास्य पदकांचे ते मानकरी ठरले आहेत.मूळचे कवठेपिरानचे असलेल्या तामगावे यांना बालपणापासूनच जलतरणाची आवड होती. शिक्षणाच्या निमित्ताने सांगलीत आलेल्या तामगावेंनी ती आवड जोपासली, वाढवली. भिडे जलतरण केंद्रावर प्रशिक्षक म्हणून काम करत असताना, तेथे इतर मुलांना शिकविणाऱ्या आंतरराष्ट्रीय कोच एस. के. कावले यांच्याकडून जलतरणातील प्रकार आत्मसात केले. त्यानुसार फ्री स्टाईल, ब्रेस स्ट्रोक, बॅक स्ट्रोक आणि मिडले रिलेमध्ये त्यांनी प्राविण्य मिळविले. २००५ ला राजकोट येथे झालेल्या स्पर्धेत त्यांनी विक्रम प्रस्थापित केला. आजवर त्यांनी देशभर विविध शहरात झालेल्या जलतरण स्पर्धांमध्ये यश मिळविले आहे. बेंगळुरू, राजकोट, हैदराबाद, इंदोर, गुलबर्गा येथील सहभाग त्यांचा उल्लेखनीय आहे. त्यांनी आजवर ३० सुवर्ण, २५ रौप्य, तर कांस्य पदकांचीही कमाई केली आहे.सध्या वयाच्या ७९ व्या वर्षीही ते जलतरण क्षेत्रात कार्यरत आहेत. शहरातील आप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूलमध्ये ते जलतरण प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. सकाळी साडेआठपासून सायंकाळी पाचपर्यंत ते मुलांना जलतरणातील धडे देत असतात. शनिवार व रविवारी अधिक सराव करून त्यांनी जलतरणातील सराव कायम ठेवला आहे. तामगावे यांनी स्वत:तर क्रीडा प्रकारात प्राविण्य मिळविलेच शिवाय आपल्या दोन मुलींनाही त्यांनी खेळाडू बनविले. त्यांची कन्या अरुणाने जलतरणात राष्ट्रीय पातळीवर मजल मारली, तर दुसरी कन्या राजमती यांनी हॉकीमध्ये राष्ट्रीय स्तरावर आपली चमक दाखविली आहे. त्यांच्या पत्नी इंदूमती यांचे बारकाईने लक्ष असते.पूर्ण शाकाहार आणि सरावात सातत्य हेच यशाचे गमकवयाच्या ७९ व्या वर्षीही जलतरण स्पर्धेत सहभागी होणाºया उल्हास तामगावे यांना याचे गमक विचारले असता, त्यांनी पूर्ण शाकाहारी असणे व सरावातील सातत्यतेवर भर दिला. पूर्ण शाकाहाराबरोबरच मर्यादीत सकस आहार, मोड आलेल्या धान्याचा वापर आणि पूर्ण वर्ज्य केलेल्या भातामुळे शरीरयष्टी अद्याप दणकट असल्याचे सांगितले.