जिल्ह्यात १९ तळीरामांना अटक

By Admin | Updated: May 26, 2014 01:18 IST2014-05-26T00:38:50+5:302014-05-26T01:18:14+5:30

जिल्हाभर नाकाबंदी : पोलिसांची पुन्हा मोहीम सुरू; मद्यपींची वाहने जप्त

19 Tali Ram arrested in the district | जिल्ह्यात १९ तळीरामांना अटक

जिल्ह्यात १९ तळीरामांना अटक

सांगली : दारुच्या नशेत वाहन चालविणार्‍या तळीरामांची शनिवारी रात्री पुन्हा धरपकड करण्यात आली. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यात १९ जणांना अटक करण्यात आली. त्यांची वाहने जप्त करण्यात आली आहेत. रात्री दहा ते बारा या वेळेत ही मोहीम राबविली. अटक केलेल्यांमध्ये सचिन बाबासाहेब शिरतोडे (वय ३२, रा. कवठेएकंद, ता. तासगाव), अशोक जगन्नाथ कावरे (५२, पलूस), जीवन विठ्ठल गडदे (३०, कुंडल), संदीप सखाराम पाखरे (२८, रामानंदनगर, ता. पलूस), तात्यासाहेब गणपती बिळासकर (३०, रा. बिऊर, ता. शिराळा), प्रमोद मुकुंद पटवर्धन (रा. टिंबर एरिया, सांगली), वामन भानुदास लवटे (अहिल्यादेवी होळकर चौक, सांगली), नेताजी भीमराव केंगार (२६, जाखापूर, ता. कवठेमहांकाळ), भरत आनंदा मोरे (४३, रा. कृष्णाघाट, सांगली), विजय भाऊसाहेब लांडे (४०, रा. मौजे डिग्रज, ता. मिरज), बाळासाहेब मुरा पडळकर (३७, रा. वारणाली, विश्रामबाग), सिद्धाप्पा गुराप्पा बिरादार (३८, संजयनगर, सांगली), नामदेव मल्हारी कोकणे (६५, भारत सूतगिरणीजवळ, सांगली), दयानंद लिंगाप्पा ढवळेश्वर (४८, कुपवाड), प्रकाश रावसाहेब बंडोरे (३०, उदनवाडी, ता. सांगोला), विद्याधर वसंत फणबट (४५, रा. विवेकानंद सोसायटी, कुपवाड), अतुल आनंदराव दळवी (२७, रा. मंगसुळी, ता. अथणी), शफिक मालेकर (३०, बागणी), लालासाहेब पांडुरंग कदम (रा. आष्टा, ता. वाळवा) यांचा समावेश आहे. जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी शनिवारी रात्री संपूर्ण जिल्हाभर नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी व दारुच्या नशेत वाहन चालविणार्‍या तळीरामांची धरपकड करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील २२ पोलीस ठाणे हद्दीत नाकाबंदी लावली होती. सांगली शहर, विश्रामबाग, वाहतूक नियंत्रण शाखा, तासगाव, आष्टा, शिराळा, कवठेमहांकाळ, कुंडल या पोलिसांनाच तळीराम सापडले. अन्य पोलीस ठाण्यांच्या पोलिसांची मात्र एकही कारवाई न केल्याने सावंत यांनी नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी) अब्दुलकरीम खाँ संगीत सभेस प्रारंभ मिरजेत आयोजन : दिग्गज कलाकारांच्या आविष्काराने श्रोते मंत्रमुग्ध मिरज : मिरजेत दर्गा उरूसानिमित्त संगीतरत्न अब्दुलकरीम खाँ संगीत सभेस आज सकाळी सुरुवात झाली. किराना घराण्याच्या दिग्गजांनी सादर केलेल्या गायन व वादनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. सकाळी दहा वाजता मीरासाहेब दर्गा पटांगणातील चिंचेच्या झाडाखाली संगीत सभेस सुरुवात झाली. संगीत सभेत डोंबीवलीचे समीर अभ्यंकर, पुणे येथील पंडित संजीव जहागीरदार, मुंबईचे पंडित चंद्रशेखर वझे, कोल्हापूरचे पंडित किशोर कागलकर व पंडित सहदेव झेंडे यांचे गायन व पुणे येथील चंद्रशेखर गाडगीळ यांचे गझल गायन झाले. समीर अभ्यंकर यांनी कोमल रिषभ आसावरी हा राग आळविला. विलंबित एकतालात री मे सुन पिया की बात व त्रितालात बढैय्या लावो लावो रे लावो या रचना सादर केल्या. त्यांना अजित पुरोहित यांनी हार्मोनियम व जितेंद्र भोसले यांनी तबलासाथ केली. पंडित संजीव जहागीरदार यांनी राग आसावरी तोडी सादर केला. विलंबित एकतालात सब मेरा वोही सकल जगत को पैदा करे व त्रितालात मै तो तुम्हारा दास या रचना सादर केल्या. त्यांना कल्याण देशपांडे यांनी तबला व अजित पुरोहित यांनी हार्मोनियमसाथ केली. पंडित चंद्रशेखर वझे यांनी राग भटियार सादर केला. विलंबित एकतालात महादेव शिवशंकर व द्रुत त्रितालात बेचैन हुई तेरे कारण या रचना सादर केल्या. त्यांना मनमोहन कुंभारे यांनी तबला व मधुकर कदम यांनी हार्मोनियमसाथ केली. पंडित किशोर कागलकर यांनी विलंबित एकतालात निले घुंगरीया हा राग बिलास खानी तोडी व द्रुत त्रितालात बलमा मोरी छोडी कलाईया हे राग सादर केले. त्यांना संदीप तावरे यांनी हार्मोनियम व दादा मुळे यांनी तबलासाथ केली. पंडित चंद्रशेखर गाडगीळ यांच्या वक्तसे पहले या गझल गायनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. पंडित सहदेव झेंडे यांनी सूर मल्हार हा राग आळविला. पिलवित एकतालात गरजत आये व द्रुत त्रितालात बदलवा बरसन लागी सादर केले. त्यांच्या गायनाने मैफिलीचा समारोप झाला. (वार्ताहर)

Web Title: 19 Tali Ram arrested in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.