शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

सांगलीत लम्पीने घेतला दिवसात १७ जनावरांचा बळी, बाधित जनावरांची संख्या पावणेपाच हजारांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 14:22 IST

या रोगामुळे आतापर्यंत ३२७ जनावरांचा मृत्यू झाला आहे.

सांगली : जिल्ह्यात मंगळवारी नव्याने १८९ जनावरांना लम्पी त्वचा रोगाची बाधा झाली आहे. तसेच १७ जनावरांना मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील बाधित जनावरांची संख्या पावणेपाच हजारांवर पोहोचली आहे. लम्पीचा संसर्ग रोखण्यात पशुसंवर्धन विभागाला यश कधी येणार, असा सवाल पशुपालकांमधून उपस्थित होत आहे.अडीच महिन्यांपासून सुरू असलेला लम्पीचा संसर्ग आटोक्यात येत नसल्याने पशुपालक चिंतेत आहेत. मंगळवारी नव्याने १८९ जनावरांना बाधा झाल्याचे आढळून आले. आतापर्यंत जिल्ह्यात तब्बल चार हजार ७५७ जनावरांना लम्पीचा संसर्ग झाला आहे. अद्यापही दोन हजार ८९७ जनावरांवर उपचार सुरू आहेत. मंगळवारी एका दिवसात जिल्ह्यात १७ जनावरांचा मृत्यू झाला. या रोगामुळे आतापर्यंत ३२७ जनावरांचा मृत्यू झाला आहे. एक हजार ५३३ जनावरेआजारातून बरी झालेली आहेत.आतापर्यंत बाधित झालेली तालुकानिहास संख्या पुढीलप्रमाणे आहे. मिरज तालुका १२९८, आटपाडी ५९०, पलूस ३६२, वाळवा ७०२, खानापूर ५३०, तासगाव ३६६, कडेगाव १२४, कवठेमहांकाळ २१६, जत ४६८, शिराळा तालुक्यात ६१ अशी एकूण चार हजार ७५७ जनावरांना बाधा झाली आहे. त्यापैकी ३२७ जनावरांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :SangliसांगलीLumpy Skin Disease Virusलम्पी त्वचारोग