शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

शेतकऱ्यांना युरोपात नेणारे शासनाचे विमान अद्याप जमिनीवरच, राज्यभरात १६० शेतकरी दौऱ्याच्या प्रतीक्षेत 

By संतोष भिसे | Updated: October 16, 2024 13:37 IST

संतोष भिसे सांगली : शेतकऱ्यांना परदेशी शेतीचा अभ्यास व्हावा, तेथील प्रयोग राज्यातही केले जावेत, या हेतूने शासनाने परदेशात कृषी ...

संतोष भिसेसांगली : शेतकऱ्यांना परदेशी शेतीचा अभ्यास व्हावा, तेथील प्रयोग राज्यातही केले जावेत, या हेतूने शासनाने परदेशात कृषी पर्यटनासाठी शेतकऱ्यांची निवड केली; पण आठ महिन्यांनंतरही परदेशात जाणाऱ्या विमानाने उड्डाण केलेले नाही. राज्यभरात १६० शेतकरी युरोप दौऱ्याच्या प्रतीक्षेत आहेत.परदेशी शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, कृषिमाल प्रक्रिया व पुरवठा साखळी यांची माहिती महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना व्हावी यासाठी कृषी विभागातर्फे हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. ही योजना काही वर्षे बंद होती. सन २०२४ मध्ये पुन्हा सुरू करण्यात आली. त्यासाठी कृषी विभागाच्या अंदाजपत्रकात १० कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली. फेब्रुवारीत सोडतीद्वारे पात्र शेतकरी निवडले गेले. सांगली जिल्ह्यात पाच, तर राज्यभरात १६० शेतकऱ्यांची यादी निश्चित झाली.दौऱ्याचा सुमारे एक लाख रुपये खर्च शासन करणार असून, उर्वरित लाखांचा खर्च शेतकऱ्याने करायचा आहे. यंदाच्या दौऱ्यासाठी युरोपीय देशांची निवड करण्यात आली आहे; पण सोडत निघून आठ महिने झाले, तरी शासनाचे विमान अद्याप जमिनीवरच आहे. या योजनेत सातत्य नसल्याने शेतकऱ्यांत नाराजी आहे.

१५ हजारांचा भुर्दंडपरदेश दौऱ्याला पात्र ठरण्यासाठी पारपत्र व विमा सक्तीचा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुमारे १५ हजार रुपयांचा खर्च केला. विमा व पारपत्र जोडून दौऱ्यासाठी अर्ज केला. आता दौराच अनिश्चित असल्याने १५ हजार रुपयांचा भुर्दंड सोसावा लागत आहे.

शेतीत आधुनिक तंत्राचा वापर करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शासनाची ही योजना अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे त्यात सातत्य असायला हवे. आम्ही युरोप दौऱ्यासाठी पात्र ठरलो असून प्रवास सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहोत. शासनाने त्वरित नियोजन करण्याची गरज आहे. - वैभवसिंह शिंदे, पात्र शेतकरी, म्हैसाळ (ता. मिरज) 

- परदेश दौऱ्यासाठी शेतकऱ्यांची निवड प्रक्रिया झाली आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच दौरा निघेल. ही योजना रद्द झालेली नाही. - विवेक कुंभार, जिल्हा कृषी अधिकारी

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीGovernmentसरकार