शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १६ हजारांवर शेतकरी कर्जमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 23:56 IST

सांगली : जिल्ह्यातील कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या १९ हजार ७७४ शेतकºयांपैकी १६ हजार ६०३ शेतकºयांच्या खात्यावर बुधवारअखेर ६५ कोटी ४६ लाख रुपये वर्ग झाले. अंतिम टप्प्यात २ हजार ४६ शेतकरी तांत्रिक त्रुटींमुळे अपात्र ठरल्याने त्यांचे ६ कोटी ३४ लाख रुपये शासनाकडे परत जाणार आहेत. किरकोळ त्रुटी असलेल्या अन्य शेतकºयांचे पैसे दोन ...

सांगली : जिल्ह्यातील कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या १९ हजार ७७४ शेतकºयांपैकी १६ हजार ६०३ शेतकºयांच्या खात्यावर बुधवारअखेर ६५ कोटी ४६ लाख रुपये वर्ग झाले. अंतिम टप्प्यात २ हजार ४६ शेतकरी तांत्रिक त्रुटींमुळे अपात्र ठरल्याने त्यांचे ६ कोटी ३४ लाख रुपये शासनाकडे परत जाणार आहेत. किरकोळ त्रुटी असलेल्या अन्य शेतकºयांचे पैसे दोन दिवसात वर्ग होण्याची चिन्हे आहेत.कर्जमाफीच्या शेवटच्या टप्प्यातही काही त्रुटींचा सामना प्रशासनाला करावा लागत आहे. त्यामुळेच बुधवारी ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. जिल्ह्यातील ४० हजार ८५९ शेतकºयांना एकूण १०८ कोटी ५८ लाख रुपयांच्या कर्जमाफीचा व अनुदानाचा लाभ मिळणार आहे. त्यासंदर्भातील ‘ग्रीन लिस्ट’ जाहीर झाली असून, प्रत्यक्ष खात्यावर पैसे वर्ग करण्याची प्रक्रिया सहकार विभागामार्फत सुरू झाली आहे. गेल्या चार दिवसात ६५ कोटी ४६ लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत. अजूनही तीन हजार १७१ शेतकरी त्रुटींअभावी कर्जमाफीच्या कक्षेपासून दूर आहेत. यातील २0४६ शेतकरी पूर्णत: अपात्र ठरल्याने त्यांची यादी व ६ कोटी ३४ लाख रुपये शासनाकडे परत पाठविण्यात येणार आहेत. किरकोळ त्रुटी असलेल्या काही शेतकºयांच्या रकमा दोन दिवसात वर्ग होण्याची शक्यता आहे. नियमित कर्ज भरणाºया जिल्ह्यातील २१ हजार ८५ शेतकºयांना ३६ लाख ३८ हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान वर्ग होत आहे. प्रोत्साहन अनुदानाचे पैसे थेट शेतकºयांच्या खात्यावर वर्ग केले जाणार आहेत. त्यामुळे दोन्ही स्तरावर आता कर्जमाफी योजना अंतिम टप्प्यात आली आहे.दीड लाखांपर्यंत कर्ज असणाºया १९ हजार शेतकºयांचा सात-बारा कोरा होणार असून, त्यांना एकूण ७२ कोटी 0४ लाख रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. दीड लाखांच्या आतील शेतकºयांची मंजूर झालेली रक्कम खात्यांवर वर्ग होत असून, सात-बारा कोरे होत आहेत.आजपासून मोबाईलवर मेसेजकर्जमुक्तीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्यानंतर आता गुरुवारपासून पात्र प्रत्येक शेतकºयाच्या मोबाईलवर कर्जमुक्तीचे संदेश जाण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे येत्या आठवड्याभरात ही प्रक्रिया संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे अपात्र यादीची फेरपडताळणी शासनाकडून होऊन परत येण्याचीही शक्यता आहे.तालुकानिहाय कर्जमाफी (कोटीत)तालुका शेतकरी कर्जमाफीआटपाडी ७५६ ३,२५९५६८८जत ४६६८ १९,८0,६४,२८४क. महांकाळ २0१६ ५,११,८४,८८६कडेगाव ६४२ २,५0,२८,0३२खानापूर १0८१ ३,३६,८२१६८मिरज २३७५ ८,९७,४७,१८३पलूस १२२0 ४,३३,२६,४00शिराळा ४६२ १,३८,२८,७४७तासगाव ४८0३ १८,५६,२७,१७७वाळवा १७५१ ४,७३,३५,९३३एकूण १९७७४ ७२,0४,२0,५0२

टॅग्स :Farmerशेतकरी